Sajjangad Sansthan

श्रीसमर्थ रामदास स्वामीनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाणवली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा श्रीसमर्थांचा विश्वास होता. त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर जि. सातारा येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. अशा रीतीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्रीरामदास स्वामींनीच केली. हेच संस्थान श्रीरामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.


1:27:17

Shared 3 years ago

897 views

1:53:43

Shared 3 years ago

733 views