शालेय शिक्षणात गणिताला महत्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावी पर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढवण्यासाठी गणितमित्र या संकल्पनेची फेब्रुवारी २०१९ पासून सुरवात केली आहे. या गणितमित्र मंचाचे एका छोट्याच्या रोपट्यातुन वटवृक्षात रुपांतर होत आहे. आतापर्यंत जवळपास १०,०००+ शिक्षक, ५०००+ पालक विद्यार्थी या सेवेचा लाभ घेत आहेत. याचा नियमित वापर करणाऱ्या शिक्षक पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद नियमितपणे मिळत आहे.