आज पुणे येथे भाजपा पुणे दक्षिणच्या वतीने आयोजित 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचे' उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या विशेष प्रसंगी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी हा पक्ष विचारधारेवर चालणारा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संवाद साधताना स्वर्गीय अटलजींच्या विचारांची आठवण करून दिली. अटलजी नेहमी सांगायचे, "नेता तोच असतो, जो इतरांना सोबत घेऊन पुढे जातो." भाषणांपेक्षा नेत्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातून आणि वर्तनातून कार्यकर्ता घडत असतो. ‘ज्योतीने ज्योत वाढवणं’ हा आपल्या पक्षाचा मूळ मंत्र आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने व नेत्याने आपल्या वर्तनातून सहकाऱ्यांना नेहमीच जपले पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यालयाचे मुख्य प्रभारी रवीजी अनासपुरे, सदाशिव खाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, दक्षिणचे अध्यक्ष शेखर वडणे, आमदार योगेशजी टिळकेर, बाळासाहेब गरुड, वासुदेव नाना काळे, शिवाजीराव बुचडे, पांडुरंग बोजरकर यांच्यासह भाजपा ग्रामीणचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायदेवता, कर्मफलदाते भगवान श्री शनिदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! श्री शनिदेवांची कृपा आपल्यावर सदैव राहो, हीच प्रार्थना..!
आज पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. राज्यातील २६ जिल्ह्यांमधून ३०० हून अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, युवा खेळाडूंमधील बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्पर्धात्मकता पाहून अत्यंत समाधान वाटले.
दुसऱ्या फेरीअखेर मुलांच्या गटात वीरेश शरणार्थी, मानस गायकवाड आणि राम परब यांनी आघाडी कायम राखली असून, मुलींच्या गटात श्रेया हिप्परगी, श्रद्धा बजाज आणि सई पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!
बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून संयम, नियोजन आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. राज्यातील युवा खेळाडूंना अशा दर्जेदार स्पर्धांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मोठी संधी मिळेल, असा विश्वास आहे.
केपीआयटी टेक्नॉलॉजीचे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. केवळ व्यवसायच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही ते अग्रस्थानी होते. अनेक पर्यावरणपूरक उपक्रम आणि शैक्षणिक प्रकल्पांना त्यांनी पाठबळ दिले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा तंत्रज्ञान क्षेत्रात सदैव प्रेरणा देत राहील.
आज रवीजींच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या कठीण प्रसंगी पंडित परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'डिजिटल इंडिया'च्या आवाहनाला प्रतिसाद देत, आज उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोथरुड येथील निवासस्थानावरून ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे वेळेची बचत आणि प्रशासकीय खर्चात काटकसर करत एक सकारात्मक संदेश देण्याचा हा प्रयत्न होता.
या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील आपल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा मी अत्यंत गांभीर्याने मांडला. नसरापूर येथील घटनेसारखी पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि विद्यार्थिनींच्या सुलभ प्रवासासाठी 'सीएसआर' निधीतून तातडीने विशेष बससेवा सुरू करावी, अशी आग्रही सूचना प्रशासनाला दिली.
यासोबतच, शाळांना संरक्षक भिंती बांधणे, प्रत्येक गावात सुसज्ज स्मशानभूमीची सुविधा आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात 'बचत गट मॉल' उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्याचा विकास आणि जनसामान्यांची सुरक्षितता यालाच सर्वोच्च प्राधान्य देऊन, शासकीय संसाधनांचा योग्य विनियोग व्हावा, हाच या चर्चेचा मुख्य उद्देश आहे.
आज बाणेर येथे पुणे महानगरपालिका आणि डोंबिवलीच्या ‘आपुलकी मेडिकल सेंटर’च्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ‘आपुलकी सेंटर’ला भेट देत तेथील आरोग्यसेवा आणि सुविधांची पाहणी केली.
पीपीपी तत्वावर साकारण्यात आलेल्या या रुग्णालयामध्ये कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे केंद्र निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे, याचा विशेष आनंद आणि समाधान वाटले.
या प्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, प्रभाग अध्यक्षा रोहिणीताई चिमटे, मयुरी कोकाटे, भाजपाचे पदाधिकारी तसेच ‘आपुलकी’ संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कोथरूड येथील मयूर कॉलनीमधील एमईएस बालशिक्षण ऑडिटोरियममध्ये आयोजित ‘सुमिरन’ या भावगीत आणि भक्तिगीतांच्या सुरेल कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. देवगांवकर फाऊंडेशनच्या संयोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. संगीत, भावना आणि भक्तिरसाने नटलेली ही मैफल उपस्थित प्रत्येक रसिकाला मंत्रमुग्ध करून गेली.
माझ्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले, याचा विशेष आनंद आहे. अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध अडचणींमुळे कलाकारांना स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे यावेळी नमूद केले.
संगीत आणि संस्कृती समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्य करतात. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे कला जपली जाते, कलाकारांना नवी ओळख मिळते आणि रसिकांनाही अविस्मरणीय अनुभव मिळतो, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहिलो.
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासाला चालना देणे तसेच शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, सहकारी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मंगलप्रभातजी लोढा, उदयजी सामंत, आशिषजी जयस्वाल, इंद्रनीलजी नाईक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून सर्व नवनिर्वाचित सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी जनसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संसदीय लोकशाहीच्या परंपरेचे जतन करत, सर्व नवनिर्वाचित सदस्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उत्तम कार्य घडो, हीच सदिच्छा!
या शपथविधी सोहळ्यास विधानपरिषद सभापती रामजी शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शंभुराज देसाई, विधिमंडळ सचिव डॉ. विलास आठवले यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Chandrakant Patil
आज पुणे येथे भाजपा पुणे दक्षिणच्या वतीने आयोजित 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचे' उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या विशेष प्रसंगी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी हा पक्ष विचारधारेवर चालणारा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संवाद साधताना स्वर्गीय अटलजींच्या विचारांची आठवण करून दिली. अटलजी नेहमी सांगायचे, "नेता तोच असतो, जो इतरांना सोबत घेऊन पुढे जातो." भाषणांपेक्षा नेत्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातून आणि वर्तनातून कार्यकर्ता घडत असतो. ‘ज्योतीने ज्योत वाढवणं’ हा आपल्या पक्षाचा मूळ मंत्र आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने व नेत्याने आपल्या वर्तनातून सहकाऱ्यांना नेहमीच जपले पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यालयाचे मुख्य प्रभारी रवीजी अनासपुरे, सदाशिव खाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, दक्षिणचे अध्यक्ष शेखर वडणे, आमदार योगेशजी टिळकेर, बाळासाहेब गरुड, वासुदेव नाना काळे, शिवाजीराव बुचडे, पांडुरंग बोजरकर यांच्यासह भाजपा ग्रामीणचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 १६ मे २०२६ | पुणे
#Pune #BJP #DeendayalUpadhyay #TrainingCamp #BJPMaharashtra #AtalBihariVajpayee #IdeologyFirst #Karyakarta
1 day ago | [YT] | 3
View 0 replies
Chandrakant Patil
॥ ओम शं शनैश्चराय नमः ॥
न्यायदेवता, कर्मफलदाते भगवान श्री शनिदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! श्री शनिदेवांची कृपा आपल्यावर सदैव राहो, हीच प्रार्थना..!
#शनिदेवजयंती #ShaniJayanti #ShaniDev #ShaniDevJayanti #शनीदेव
2 days ago | [YT] | 3
View 0 replies
Chandrakant Patil
आज पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. राज्यातील २६ जिल्ह्यांमधून ३०० हून अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, युवा खेळाडूंमधील बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्पर्धात्मकता पाहून अत्यंत समाधान वाटले.
दुसऱ्या फेरीअखेर मुलांच्या गटात वीरेश शरणार्थी, मानस गायकवाड आणि राम परब यांनी आघाडी कायम राखली असून, मुलींच्या गटात श्रेया हिप्परगी, श्रद्धा बजाज आणि सई पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!
बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून संयम, नियोजन आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. राज्यातील युवा खेळाडूंना अशा दर्जेदार स्पर्धांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मोठी संधी मिळेल, असा विश्वास आहे.
📍१५ मे २०२६ | पुणे
#ChessTournament #FIDE #MaharashtraChess #Pune #YouthTalent #Buddhibal #पुणे #बुद्धिबळ
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
Chandrakant Patil
भावपूर्ण श्रद्धांजली..!
केपीआयटी टेक्नॉलॉजीचे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. केवळ व्यवसायच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही ते अग्रस्थानी होते. अनेक पर्यावरणपूरक उपक्रम आणि शैक्षणिक प्रकल्पांना त्यांनी पाठबळ दिले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा तंत्रज्ञान क्षेत्रात सदैव प्रेरणा देत राहील.
आज रवीजींच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या कठीण प्रसंगी पंडित परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#RaviPandit #Pune #TechIndustry #पुणे #श्रद्धांजली
2 days ago | [YT] | 4
View 0 replies
Chandrakant Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'डिजिटल इंडिया'च्या आवाहनाला प्रतिसाद देत, आज उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोथरुड येथील निवासस्थानावरून ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे वेळेची बचत आणि प्रशासकीय खर्चात काटकसर करत एक सकारात्मक संदेश देण्याचा हा प्रयत्न होता.
या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील आपल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा मी अत्यंत गांभीर्याने मांडला. नसरापूर येथील घटनेसारखी पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि विद्यार्थिनींच्या सुलभ प्रवासासाठी 'सीएसआर' निधीतून तातडीने विशेष बससेवा सुरू करावी, अशी आग्रही सूचना प्रशासनाला दिली.
यासोबतच, शाळांना संरक्षक भिंती बांधणे, प्रत्येक गावात सुसज्ज स्मशानभूमीची सुविधा आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात 'बचत गट मॉल' उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्याचा विकास आणि जनसामान्यांची सुरक्षितता यालाच सर्वोच्च प्राधान्य देऊन, शासकीय संसाधनांचा योग्य विनियोग व्हावा, हाच या चर्चेचा मुख्य उद्देश आहे.
📍१५ मे २०२६ | कोथरूड
#DigitalMeeting #StudentSafety #RuralDevelopment #BachatGat
2 days ago | [YT] | 1
View 1 reply
Chandrakant Patil
आज बाणेर येथे पुणे महानगरपालिका आणि डोंबिवलीच्या ‘आपुलकी मेडिकल सेंटर’च्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ‘आपुलकी सेंटर’ला भेट देत तेथील आरोग्यसेवा आणि सुविधांची पाहणी केली.
पीपीपी तत्वावर साकारण्यात आलेल्या या रुग्णालयामध्ये कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे केंद्र निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे, याचा विशेष आनंद आणि समाधान वाटले.
या प्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, प्रभाग अध्यक्षा रोहिणीताई चिमटे, मयुरी कोकाटे, भाजपाचे पदाधिकारी तसेच ‘आपुलकी’ संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
📍१५ मे २०२६ | बाणेर
#Pune #Baner #AapulkiCenter #Healthcare #CancerCare
2 days ago | [YT] | 2
View 0 replies
Chandrakant Patil
कोथरूड येथील मयूर कॉलनीमधील एमईएस बालशिक्षण ऑडिटोरियममध्ये आयोजित ‘सुमिरन’ या भावगीत आणि भक्तिगीतांच्या सुरेल कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. देवगांवकर फाऊंडेशनच्या संयोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. संगीत, भावना आणि भक्तिरसाने नटलेली ही मैफल उपस्थित प्रत्येक रसिकाला मंत्रमुग्ध करून गेली.
माझ्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले, याचा विशेष आनंद आहे. अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध अडचणींमुळे कलाकारांना स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे यावेळी नमूद केले.
संगीत आणि संस्कृती समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्य करतात. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे कला जपली जाते, कलाकारांना नवी ओळख मिळते आणि रसिकांनाही अविस्मरणीय अनुभव मिळतो, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
📍१४ मे २०२६ | कोथरूड
#Kothrud #Sumiran #CulturalPune #MarathiCulture
#कोथरूड
3 days ago | [YT] | 13
View 0 replies
Chandrakant Patil
आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहिलो.
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासाला चालना देणे तसेच शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, सहकारी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मंगलप्रभातजी लोढा, उदयजी सामंत, आशिषजी जयस्वाल, इंद्रनीलजी नाईक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📍१४ मे २०२६ | मुंबई
#Maharashtra #HigherEducation #MAHED #SkillDevelopment #Education #मुंबई
3 days ago | [YT] | 3
View 0 replies
Chandrakant Patil
निर्णय महायुती सरकारचे, जनतेच्या हिताचे !
आज दिनांक १४ मे २०२६ रोजी झालेले मंत्रिमंडळ निर्णय.
#मंत्रिमंडळ_निर्णय
#महाराष्ट्र_शासन
#maharashtra
3 days ago | [YT] | 8
View 0 replies
Chandrakant Patil
आज विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून सर्व नवनिर्वाचित सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी जनसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संसदीय लोकशाहीच्या परंपरेचे जतन करत, सर्व नवनिर्वाचित सदस्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उत्तम कार्य घडो, हीच सदिच्छा!
या शपथविधी सोहळ्यास विधानपरिषद सभापती रामजी शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शंभुराज देसाई, विधिमंडळ सचिव डॉ. विलास आठवले यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
📍१४ मे २०२६ | मुंबई
#Maharashtra #VidhanParishad
#मुंबई #विधानपरिषद_सदस्य #शपथविधी #OathCeremony
3 days ago | [YT] | 4
View 0 replies
Load more