महाबळेश्वरच्या थंड वातावरणात पिकलेली हि स्ट्रॉबेरी जशी मोहक वाटते तशीच चवीलाही उत्तम अगदी गोड. पुर्ण देशभरातून व महाराष्टातून या स्ट्रॉबेरीला उत्तम मागणी असते. काहि ग्राहक या स्ट्रॉबेरीची कुरीयर मार्फत मागवण्यासाठी विनंती करतात . स्ट्रॉबेरी ची शेल्फ लाइफ हि अवघी तीन दिवसाचीच असल्याने कुरियर मार्फत आपल्याला स्ट्रॉबेरी पाठवता येत नाही कारण कुरियर पोहोचायला किमान चार ते पाच दिवस लागतात. म्हणून तर या उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरी वर प्रोसेसिंग करून आपण स्ट्रॉबेरी जॅम बनवतो व तो ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. जामची प्रोसेस एवढी नॅचरल ठेवलेली आहे की त्यामध्ये कोणताच कलर प्रिझर्वेटिव्ह किंवा लॅब मेड फ्लेवर न वापरता आपण ओरिजनल अशी आपल्या महाबळेश्वर मधील शेतातील स्ट्रॉबेरीची चव ही ग्राहकांपर्यंत पोहचवतो. स्ट्रॉबेरी तर लांब दूर पोहोचवणे थोडे अशक्य होतं मात्र जाम हा आपण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो. एक शेतकरी ते व्यावसायिक असा प्रवास कशासाठी? तर फक्त हे सिद्ध करण्यासाठी की शेतकरी जो जन्मजातच हुशार आहेतू कोणत्या क्षेत्रात मागे पडू शकत नाही. त्याला समृद्ध होण्यासाठी सरकारचा तर काही सपोर्ट नाही मात्र स्वतःच्या बुद्धी कौशल्याने तो परिस्थितीवर मात करू शकतोहे दाखवणे हाच माझा उद्देश आहे.
हे फोटो गुजरात , राजकोटमधल्या रेसकोर्स गार्डनमधील 4 वर्षापूर्वीचे म्हणजे 2022 मधले आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर पुर्ण देशात हे भिकारी बिझनेसचे सिंडिकेट आहे. भारतात भिकारीपणाची समस्या ही केवळ गरिबीची नाही, तर काही ठिकाणी ती एक संघटित गुन्हेगारी प्रक्रिया आहे, ज्यात लहान मुलांचा शोषण केला जातो. हे भिकाऱ्यांचे 'माफिया' किंवा 'सिंडिकेट' म्हणून ओळखले जाते, जे मुलांना भाड्याने घेऊन, त्यांना नशेची औषधे देऊन किंवा कधीकधी अपंग बनवून भिक मागण्यासाठी वापरतात. हे सिंडिकेट शहरांमध्ये, विशेषतः ट्रॅफिक सिग्नल, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असतात. भारतात भिकारीपण हे एक 'वेल-ऑइल्ड रॅकेट' (सुसंगत गुन्हेगारी यंत्रणा) बनले आहे, ज्यात मुलांचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जातात. हे सिंडिकेट मुलांना अपहरण करून किंवा गरीब कुटुंबांकडून भाड्याने घेऊन त्यांचा शोषण करतात. काही प्रकरणांमध्ये मुलांना नशेची औषधे देऊन पेंगाळलेले (झोपाळलेले) बनवले जाते, जेणेकरून ते दयनीय दिसतील आणि लोक अधिक दान देतील. यामुळे हे सिंडिकेट दररोज हजारो रुपये कमावतात, पण मुलांना त्याचा फायदा होत नाही. उलट त्यांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होते. आज नविन वर्षाची सुरुवात. या नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी या मुलांसाठी किंवा हि भिकारीपणाची समस्या नष्ट करण्यासाठी काही पावले उचलण्याची गरज आहे. मग आपण काय करू शकतो तर कोठे असे भिकारी पैश्याची भिक मागताना आढळल्यास आपण त्यास पैशाऐवजी अन्न किंवा पेय देऊ शकतो. हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे मुलांना थेट फायदा होईल आणि सिंडिकेटला पैशाचा फायदा होणार नाही. उदाहरणार्थ, फळे, ब्रेड किंवा पाणी देऊ शकतो. हे मुलांचे हाल कमी करेल आणि गुन्हेगारीला आळा बसवेल . 🙏 चला नविन वर्षाची सुरुवात या संकल्पाने करूया .🙏 बाकी महाराष्ट्रातील सर्व लहान थोरांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🙏
डोंगराळ भाग , निळं आकाश, लाल मातीत बहरलेली हि स्ट्रॉबेरी शेती. नारंगी आणि पिवळ्या कलरची झेंडूची झाडे शेतात मधोमध त्यामुळे शेताचे सौदर्य आनखीनच मनमोहक झाले आहे . माझ्या हातात चिल्ह ची रानभाजी , थंड वातावरण म्हणजे जणू हे आमचे साठी स्वर्ग सुख. या सौदर्या मागे अथक परिश्रमाची कहाणी लपलेली असते. बहरलेली शेती हे शेतकऱ्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे. त्यांचे कष्ट ओळखून त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हा आनंद केवळ पाहण्यापुरता नसून, तो समजून घेण्याचा आहे! शेतकऱ्याचा चेहरा हसतमुख दिसतो पण त्यामागे चिंता असते. पिक कधी येईल, विक्री कशी होईल, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल. शेतकरी एकटे काम करत नाहीत. कुटुंबातील सर्व सदस्य सामील होतात. महिलाही पुरुषांइतकीच मेहनत करतात. यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाचा जर सन्मान करायचा असेल तर ग्राहकाची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी अपेक्षित आहे. यासाठी शासन कधीही प्रयत्न करणार नाही. कारण शासनास शेतकरी समृद्ध होणे हे कधीच पचनी पडत नाही. तेव्हा भेट ग्राहक ते शेतकरी आणि शेतकरी ते ग्राहक हि विक्रिव्यवस्था आपल्यालाच उभरावी लागणार आहे.🙏
आज योगायोगाने वाई येथे जाऊन दगडे अण्णांशी भेटण्याचा योग आला. शेतकरी बापाच्या पोटी जन्मलेले अण्णांनी अनेक वर्षे नोकरी केली व आता ते रिटायर्ड झाले आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षी देखील शेतकरी पुत्र असल्यामुळे मातीशी नाळ काहि त्यांची तुटलेली नाही. शेतीची प्रचंड आवड आणि शिकत राहण्याची जिद्द यामुळे हे अण्णा एवढे अनुभव संपन्न झालेले आहेत की कृषी क्षेत्राविषयी त्यांचं बोलणं ऐकतच रहावसं वाटतं. एवढे अनुभव संपन्न व्यक्तिमत्त्वा पुढे जर मी माझी तुलना केली तर मी कशात जमा.. आज अण्णांचा मोठेपणा आहे की त्यांनी मला त्यांचे आयुष्यातील , शेतीक्षेत्रातील सिद्ध अशा गोष्टी सांगितल्या. हा फोटो शेअर करण्याचा एवढ्याच उद्देश आहे की शिक्षणाने सगळ्या गोष्टी समजत नाहीत तर त्यासाठी शिक्षणाच्या ही पुढे जाऊन प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करत राहावं लागतं आणि त्यातून बारीक-बारीक गोष्टींचा निष्कर्ष नोंदवावा लागतो. सातत्य काय असतं हे मी आज अण्णांकडून शिकले. एक गोष्ट मात्र खरी वयस्कर लोक फक्त वयाने मोठी नसतात तर त्यांच्या जवळच्याअनुभवाच्या शिदोरीने ते मोठे झालेले असतात आणि आपली जागा ही नेहमी त्यांच्या चरणाजवळ असते.🙏
अभ्यासपूर्ण शेतीबरोबरच शेतमाला विक्रिचे योग्य नियोजन कसे करायचे? अजून किती दिवस शेतकऱ्यानं व्यापारी, आडते, कार्पोरेट कंपन्यांचा फायदा करून दयायचा? शेतकरी मुलांनी आपल्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेचा भाग होणे गरजेचे आहे. मोठमोठे उद्योगांची आणि ब्रँडची मोनोपोली ओळखून शेतकऱ्याच्या मुलांनी स्वतः शेती प्रक्रिया उद्योगात उतरून बाजारात येणे गरजेचे आहे. जेवढे पिकवणे महत्त्वाचे आहे तेवढेच त्याची योग्य विक्री व्यवस्थापन करणे हेही महत्त्वाचं आहे. सरळ शेतमाल व्यापाऱ्यांना विकायला गेलं तर आपल्या हातात काहीच उरत नाही थोडसं डोकं चालवूया आणि शेती प्रक्रिया उद्योगात जास्तीत जास्त मुलांनी उतरूया. आमच्या शेतकरी बांधवांसाठी मदतीला मी सदैव आहेच. आणि याच विचारातून मी जो शेती प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे. फार्मर्स प्रोड्यूस डीहायड्रेशन अँड प्रोसेसिंग. दसऱ्याच्या दिवशी मी आपला नॅचरल स्ट्रॉबेरी🍓 जाम घेऊन बाजारात आले आणि खरं सांगू मंडळी महाराष्ट्रातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे कारण शेतकऱ्याने बनवलेला प्रॉडक्ट आहे स्वतः हाताने पिकवलेल्या शेतमालाचा प्रॉडक्ट आहे आणि याची तोड कोणताच मोठा ब्रँड वाला देऊ शकत नाही इतके क्वालिटीचे प्रॉडक्ट आपण तयार केलेला आहे. ना कोणत्या रासायनिक केमिकल न कोणता प्रिझर्वेटिव्ह पूर्णपणे लहानग्यांच्या आणि मोठ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच हा प्रॉडक्ट आपण बाजारात आणलेला आहे. मंडळी तुम्हाला व्यवसायात उतरायचं असेल तर मी सदैव तुमची मदत करायला तयार आहे. आपल्या प्रॉडक्ट विषयी जर काही माहिती हवी असेल किंवा ऑर्डर करायचे असेल तर तर 9405836623 या नंबर वरती नक्कीच व्हाट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा.🙏
स्ट्रॉबेरी शेती मार्गदर्शनासाठी हिंगोली, नांदेड व परभणी वरून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताला व्हिजीट दिली. माझ्याकडे जे काही स्ट्रॉबेरी शेतीविषयी नॉलेज असेल तेवढे मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी हा आपल्यासाठी सर्वतोपरी आहे शेतकऱ्याने फक्त शेती करूनच थांबायचं नाही तर शेती बरोबर शेतीतील जे उत्पादन आहे त्याच्या आधारे शेती प्रक्रिया उद्योग करून आपल्याला कसे व्यवसायात पुढे जाता येईल हेही मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या व्यवसायाच्या रूपाने मी ज्या या गोष्टी प्रत्यक्षात कृतीत आणल्या आहेत हे देखील दाखवले. माझं हेच म्हणणं आहे की शेतकरी फक्त उत्पादकच न राहता तो शेती प्रक्रिया उद्योगातआपले पाय रोवून उद्योजक झाला पाहिजे आणि यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि इतर शेतकऱ्यांनाही सांगण्याचा शिकवण्याचा माझा सदैव प्रयत्न आहे आणि सदैव राहील. बाकी मंडळी या शेतकरी कन्याने एका शेती प्रक्रिया उद्योगात उतारून आपले स्थान तयार करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि यात मला खूप चांगला प्रतिसादही मिळत आहे. जर तुम्हाला आम्ही डेव्हलप केलेल्या स्ट्रॉबेरी जाम खायचा असेल किंवा हवा असेल तर नक्की मला 9405836623 Wefpro customer care या नंबरवरती मॅसेज करा किंवा कॉल करा.🙏
भले सीजनच्या सुरुवातीला पहिल्यांदा शेतातून चार फळे मिळाली. तर हि केवळ चार फळे नाहीत तर शेतकऱ्याने केलेलं कष्ट, ठेवलेला संयम याचा आनंदरूपी परतावा आहे. केवळ हि चार फळे आहेत पण आनंद या शेतीने ४०० किलो फळे दिल्यासारखा एवढा मोठा आहे. नक्कीच आपण फक्त अभ्यासपूर्ण प्रामाणिक कष्ट करत रहायचे. हि शेती आपल्याला कधीच नाराज करणार नाही. शेती पिकवायचीही अभ्यासपूर्वक आणि विक्रिव्यवस्था स्वतः आपण तयार करायची. कोणा आडते, दलालांच्या भरवशावर न राहता. आणि हेच मी करते. पिकवतेही स्वतः आणि पिकवलेल्या मालावर प्रोसेस करून विकतेही स्वतः मी आज शेती प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. Farmers produce dehydration and processing. एक गोष्ट खरी सांगू का शेतकरी हा उत्पादक आहे आणि त्याने स्वतःचा माल जर डायरेक्ट कस्टमर कडे पोहोचवला तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. लाख अडचणी येतात, बँका शेतकरी म्हणलं तर कर्ज प्रकरण करत नाहीत परंतु न हटता न भिता पुढे लागून त्या गोष्टी करणे गरजेचे आहे. या शेतकऱ्याला कर्ज न देणाऱ्या बँका आपल्या मागे लागले पाहिजेत सर कर्ज घ्या, मॅडम कर्ज घ्या आमच्या बँकेतून. एवढा आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाताना अनेक अडथळे येतील, अनेक लोक मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, डी मोटिवेशन देतील परंतु कोणाचेही न ऐकता जे आपल्या मनात आहे ते आपण करणं खूप गरजेचे आहे. काही कर्तुत्व करायला पैसाच लागत नाही तर फक्त इच्छाशक्ती लागते, इच्छाशक्ती जर मजबूत असेल तर कोणतीच गोष्ट आम्हा शेतकऱ्यांसाठी अवघड नाही. . .🙏
अगदी गावखेड्यातील शेतकरी ते मुंबईतील मध्यमवर्गीय लोकं सर्वांनी पु. ल. देशपांडे यांना आपलाच माणूस मानले. त्यांच्या एकांकिका, नाटके, चित्रपट, लेख यांतून दैनंदिन जीवनातील खरे-खोटे, हसणे-रडणे इतके सहजतेने उलगडले की, ऐकणारा/वाचणारा स्वतःचाच आयना पाहतो असा भास होतो. पु. ल. हे फक्त हसवत नव्हते; ते हसवत-हसवत रडवत होते, विचार करायला लावत होते, आणि माणूस म्हणून उंच उभे करत होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात त्यांचे पुस्तक किंवा आठवण आजही जिवंत आहे – कारण ते आपले होते, आपले राहिले. माझे आवडते लेखक जर कोन असं विचारले तर मी गर्वाने पु. ल. यांचे नाव घेते. खरे पाहता पु.ल. नी "हसत खेळत जगावे, पण माणूसकी सोडू नये" हा संदेश दिला. अभिजात भाषा, अभिजात भाषा म्हणून आजचे राजकारणी श्रेय घेतात पण ही मराठी भाषा अभिजात बनवण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर यात पु. ल. यांचा वाटा खुप मोठा आहे . आंतरराष्ट्रीय दर्जावर मराठी भाषा नेण्यासाठी पु.ल. यांचं कार्य खुप मोलाचे आहे.🙏
शेतकऱ्याने पिकवणे आणि भलत्यानेच पिकविलेला कच्च्या माल कवडीमोल दरात घेऊन त्या मालावर प्रोसेसिंग करून, त्यात केमीकल मिसळून आपले लेबल लावून तो माल बाजारात आणणे आणि अवाईच्या सवाय दरात विक्री करून रगड नफा मिळवणे. अहो आज आम्ही या लोकांना आणि व्यवस्थेला ओळखून बसलोय. आज आमच्या शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसाय मार्फत बाजारात उतरणे खूप गरजेचे झाले आहे आणि याच विचाराने एक आदर्श निर्माण करत मी शेतीपूरक व्यवसाय सुरू करून बाजारामध्ये पूर्ण तयारीनिशी उतरलेली आहे. संपूर्ण भारतात असे कोणतेही ब्रँड नाही जे आपल्या जाम प्रॉडक्ट मध्ये 74% पेक्षा जास्त स्ट्रॉबेरी देऊ शकते आणि केमिकल विरहित तर कोणीही प्रॉडक्ट बनवतच नाही कारण केमिकल मुळे यांना ते प्रॉडक्ट खूप स्वस्त पडतं. मी एक शेतकरी आहे आणि मी संपूर्ण अभ्यास करूनच हा केमिकल विरहित प्रॉडक्ट बाजारात आणलेला आहे. काही ब्रँड कडून मलाही आता विरोध चालू झालेला आहे मी कुणालाही जुमानत नाही कारणमाझ्या अंगात शेतकऱ्याचे रक्त आहे आणि शेतकरी हा कधीच मागे हटत नाही. मला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज माझ्या अनेक ऑर्डर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जात आहेत संपूर्ण राज्यातून मला सकारात्मक प्रतिसाद आहे. आपण जो मला प्रेम आणि सपोर्ट देत आहात त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने प्रसिद्ध होत असलेल्या या ब्रँडचा नॅचरल स्ट्रॉबेरी जाम (पुर्णपणे केमीकल विरहित) जर तुम्हाला आपल्या लहानग्या आणि मोठ्यांसाठी घ्यायचा असेल तर नक्कीच या 9405836623 नंबर वरती मेसेज करा आणि आपली ऑर्डर नोंदवा.🙏
आजपर्यंत शेती हाच ध्यास होता, आहे आणि यापुढेही राहणार आहे. काही चुकीच्या शासकीय धोरणांमुळे फक्त शेतीतूनच आर्थिक स्थिरता मिळणंकठीण होऊन बसलेले असल्याने शेतीला व्यवसायाची जोड आवश्यक असते. या विचाराने मी एक शेतीपुरक व्यवसाय चालू केलेला आहे. सध्या व्यवसाय छोटासा आहे पण समाधान मिळते. आज थोडे डोके चालवले तर अनेक व्यवसायाच्या संधी आहेत. कदाचित सोपे नसेल. माझ्यासाठीही नव्हते. आता सुद्धा नाही पण शेती सोडून महिन्याला काहि फिक्स पैसे मिळतील म्हणून नोकरी किंवा चाकरी करणे यात समाधान कुठले? मजा तर आपल्या व्यवसायातच आहे जिथे रोज आव्हानांना सामोरे जावे लागते.🙂 आज या भाऊबिजेच्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातील सर्व भाऊ बहिणींचे नाते, स्नेह आयुष्यभर अतूट राहु दे, ही सदिच्छा. रक्षणाचे वचन आणि प्रेमाचे बंध जपणाऱ्या भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !🌸 बाकी या दिपवालीत घरी बनवलेल्या फराळाबरोबरच आपल्या लहानग्यांचं , मोठ्यांचं तोंड अजून गोड करण्यासाठी आपल्या Wefpro कंपनीचा natural strawberry jam आपण नक्की ऑर्डर करू शकता. ऑर्डरसाठी कस्टमर केअर नंबर 9405836623 . नक्की WhatsApp मॅसेज करा. पुन्हा एकदा भाऊबिज सणाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा...🙏
Brand Shetkari
महाबळेश्वरच्या थंड वातावरणात पिकलेली हि स्ट्रॉबेरी जशी मोहक वाटते तशीच चवीलाही उत्तम अगदी गोड. पुर्ण देशभरातून व महाराष्टातून या स्ट्रॉबेरीला उत्तम मागणी असते. काहि ग्राहक या स्ट्रॉबेरीची कुरीयर मार्फत मागवण्यासाठी विनंती करतात . स्ट्रॉबेरी ची शेल्फ लाइफ हि अवघी तीन दिवसाचीच असल्याने कुरियर मार्फत आपल्याला स्ट्रॉबेरी पाठवता येत नाही कारण कुरियर पोहोचायला किमान चार ते पाच दिवस लागतात. म्हणून तर या उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरी वर प्रोसेसिंग करून आपण स्ट्रॉबेरी जॅम बनवतो व तो ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. जामची प्रोसेस एवढी नॅचरल ठेवलेली आहे की त्यामध्ये कोणताच कलर प्रिझर्वेटिव्ह किंवा लॅब मेड फ्लेवर न वापरता आपण ओरिजनल अशी आपल्या महाबळेश्वर मधील शेतातील स्ट्रॉबेरीची चव ही ग्राहकांपर्यंत पोहचवतो. स्ट्रॉबेरी तर लांब दूर पोहोचवणे थोडे अशक्य होतं मात्र जाम हा आपण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो.
एक शेतकरी ते व्यावसायिक असा प्रवास कशासाठी? तर फक्त हे सिद्ध करण्यासाठी की शेतकरी जो जन्मजातच हुशार आहेतू कोणत्या क्षेत्रात मागे पडू शकत नाही. त्याला समृद्ध होण्यासाठी सरकारचा तर काही सपोर्ट नाही मात्र स्वतःच्या बुद्धी कौशल्याने तो परिस्थितीवर मात करू शकतोहे दाखवणे हाच माझा उद्देश आहे.
2 weeks ago | [YT] | 5,469
View 131 replies
Brand Shetkari
हे फोटो गुजरात , राजकोटमधल्या रेसकोर्स गार्डनमधील 4 वर्षापूर्वीचे म्हणजे 2022 मधले आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर पुर्ण देशात हे भिकारी बिझनेसचे सिंडिकेट आहे. भारतात भिकारीपणाची समस्या ही केवळ गरिबीची नाही, तर काही ठिकाणी ती एक संघटित गुन्हेगारी प्रक्रिया आहे, ज्यात लहान मुलांचा शोषण केला जातो. हे भिकाऱ्यांचे 'माफिया' किंवा 'सिंडिकेट' म्हणून ओळखले जाते, जे मुलांना भाड्याने घेऊन, त्यांना नशेची औषधे देऊन किंवा कधीकधी अपंग बनवून भिक मागण्यासाठी वापरतात. हे सिंडिकेट शहरांमध्ये, विशेषतः ट्रॅफिक सिग्नल, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असतात. भारतात भिकारीपण हे एक 'वेल-ऑइल्ड रॅकेट' (सुसंगत गुन्हेगारी यंत्रणा) बनले आहे, ज्यात मुलांचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जातात. हे सिंडिकेट मुलांना अपहरण करून किंवा गरीब कुटुंबांकडून भाड्याने घेऊन त्यांचा शोषण करतात. काही प्रकरणांमध्ये मुलांना नशेची औषधे देऊन पेंगाळलेले (झोपाळलेले) बनवले जाते, जेणेकरून ते दयनीय दिसतील आणि लोक अधिक दान देतील. यामुळे हे सिंडिकेट दररोज हजारो रुपये कमावतात, पण मुलांना त्याचा फायदा होत नाही. उलट त्यांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होते. आज नविन वर्षाची सुरुवात. या नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी या मुलांसाठी किंवा हि भिकारीपणाची समस्या नष्ट करण्यासाठी काही पावले उचलण्याची गरज आहे. मग आपण काय करू शकतो तर कोठे असे भिकारी पैश्याची भिक मागताना आढळल्यास आपण त्यास पैशाऐवजी अन्न किंवा पेय देऊ शकतो. हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे मुलांना थेट फायदा होईल आणि सिंडिकेटला पैशाचा फायदा होणार नाही. उदाहरणार्थ, फळे, ब्रेड किंवा पाणी देऊ शकतो. हे मुलांचे हाल कमी करेल आणि गुन्हेगारीला आळा बसवेल . 🙏
चला नविन वर्षाची सुरुवात या संकल्पाने करूया .🙏
बाकी महाराष्ट्रातील सर्व लहान थोरांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🙏
1 month ago | [YT] | 509
View 8 replies
Brand Shetkari
डोंगराळ भाग , निळं आकाश, लाल मातीत बहरलेली हि स्ट्रॉबेरी शेती. नारंगी आणि पिवळ्या कलरची झेंडूची झाडे शेतात मधोमध त्यामुळे शेताचे सौदर्य आनखीनच मनमोहक झाले आहे . माझ्या हातात चिल्ह ची रानभाजी , थंड वातावरण म्हणजे जणू हे आमचे साठी स्वर्ग सुख.
या सौदर्या मागे अथक परिश्रमाची कहाणी लपलेली असते. बहरलेली शेती हे शेतकऱ्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे. त्यांचे कष्ट ओळखून त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हा आनंद केवळ पाहण्यापुरता नसून, तो समजून घेण्याचा आहे! शेतकऱ्याचा चेहरा हसतमुख दिसतो पण त्यामागे चिंता असते. पिक कधी येईल, विक्री कशी होईल, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल. शेतकरी एकटे काम करत नाहीत. कुटुंबातील सर्व सदस्य सामील होतात. महिलाही पुरुषांइतकीच मेहनत करतात. यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाचा जर सन्मान करायचा असेल तर ग्राहकाची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी अपेक्षित आहे. यासाठी शासन कधीही प्रयत्न करणार नाही. कारण शासनास शेतकरी समृद्ध होणे हे कधीच पचनी पडत नाही. तेव्हा भेट ग्राहक ते शेतकरी आणि शेतकरी ते ग्राहक हि विक्रिव्यवस्था आपल्यालाच उभरावी लागणार आहे.🙏
1 month ago | [YT] | 1,599
View 26 replies
Brand Shetkari
आज योगायोगाने वाई येथे जाऊन दगडे अण्णांशी भेटण्याचा योग आला. शेतकरी बापाच्या पोटी जन्मलेले अण्णांनी अनेक वर्षे नोकरी केली व आता ते रिटायर्ड झाले आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षी देखील शेतकरी पुत्र असल्यामुळे मातीशी नाळ काहि त्यांची तुटलेली नाही. शेतीची प्रचंड आवड आणि शिकत राहण्याची जिद्द यामुळे हे अण्णा एवढे अनुभव संपन्न झालेले आहेत की कृषी क्षेत्राविषयी त्यांचं बोलणं ऐकतच रहावसं वाटतं. एवढे अनुभव संपन्न व्यक्तिमत्त्वा पुढे जर मी माझी तुलना केली तर मी कशात जमा.. आज अण्णांचा मोठेपणा आहे की त्यांनी मला त्यांचे आयुष्यातील , शेतीक्षेत्रातील सिद्ध अशा गोष्टी सांगितल्या. हा फोटो शेअर करण्याचा एवढ्याच उद्देश आहे की शिक्षणाने सगळ्या गोष्टी समजत नाहीत तर त्यासाठी शिक्षणाच्या ही पुढे जाऊन प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करत राहावं लागतं आणि त्यातून बारीक-बारीक गोष्टींचा निष्कर्ष नोंदवावा लागतो. सातत्य काय असतं हे मी आज अण्णांकडून शिकले. एक गोष्ट मात्र खरी वयस्कर लोक फक्त वयाने मोठी नसतात तर त्यांच्या जवळच्याअनुभवाच्या शिदोरीने ते मोठे झालेले असतात आणि आपली जागा ही नेहमी त्यांच्या चरणाजवळ असते.🙏
2 months ago | [YT] | 1,338
View 28 replies
Brand Shetkari
अभ्यासपूर्ण शेतीबरोबरच शेतमाला विक्रिचे योग्य नियोजन कसे करायचे? अजून किती दिवस शेतकऱ्यानं व्यापारी, आडते, कार्पोरेट कंपन्यांचा फायदा करून दयायचा? शेतकरी मुलांनी आपल्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेचा भाग होणे गरजेचे आहे. मोठमोठे उद्योगांची आणि ब्रँडची मोनोपोली ओळखून शेतकऱ्याच्या मुलांनी स्वतः शेती प्रक्रिया उद्योगात उतरून बाजारात येणे गरजेचे आहे. जेवढे पिकवणे महत्त्वाचे आहे तेवढेच त्याची योग्य विक्री व्यवस्थापन करणे हेही महत्त्वाचं आहे. सरळ शेतमाल व्यापाऱ्यांना विकायला गेलं तर आपल्या हातात काहीच उरत नाही थोडसं डोकं चालवूया आणि शेती प्रक्रिया उद्योगात जास्तीत जास्त मुलांनी उतरूया. आमच्या शेतकरी बांधवांसाठी मदतीला मी सदैव आहेच. आणि याच विचारातून मी जो शेती प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे. फार्मर्स प्रोड्यूस डीहायड्रेशन अँड प्रोसेसिंग. दसऱ्याच्या दिवशी मी आपला नॅचरल स्ट्रॉबेरी🍓 जाम घेऊन बाजारात आले आणि खरं सांगू मंडळी महाराष्ट्रातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे कारण शेतकऱ्याने बनवलेला प्रॉडक्ट आहे स्वतः हाताने पिकवलेल्या शेतमालाचा प्रॉडक्ट आहे आणि याची तोड कोणताच मोठा ब्रँड वाला देऊ शकत नाही इतके क्वालिटीचे प्रॉडक्ट आपण तयार केलेला आहे. ना कोणत्या रासायनिक केमिकल न कोणता प्रिझर्वेटिव्ह पूर्णपणे लहानग्यांच्या आणि मोठ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच हा प्रॉडक्ट आपण बाजारात आणलेला आहे. मंडळी तुम्हाला व्यवसायात उतरायचं असेल तर मी सदैव तुमची मदत करायला तयार आहे. आपल्या प्रॉडक्ट विषयी जर काही माहिती हवी असेल किंवा ऑर्डर करायचे असेल तर तर 9405836623 या नंबर वरती नक्कीच व्हाट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा.🙏
2 months ago | [YT] | 1,116
View 39 replies
Brand Shetkari
स्ट्रॉबेरी शेती मार्गदर्शनासाठी हिंगोली, नांदेड व परभणी वरून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताला व्हिजीट दिली. माझ्याकडे जे काही स्ट्रॉबेरी शेतीविषयी नॉलेज असेल तेवढे मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी हा आपल्यासाठी सर्वतोपरी आहे शेतकऱ्याने फक्त शेती करूनच थांबायचं नाही तर शेती बरोबर शेतीतील जे उत्पादन आहे त्याच्या आधारे शेती प्रक्रिया उद्योग करून आपल्याला कसे व्यवसायात पुढे जाता येईल हेही मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या व्यवसायाच्या रूपाने मी ज्या या गोष्टी प्रत्यक्षात कृतीत आणल्या आहेत हे देखील दाखवले. माझं हेच म्हणणं आहे की शेतकरी फक्त उत्पादकच न राहता तो शेती प्रक्रिया उद्योगातआपले पाय रोवून उद्योजक झाला पाहिजे आणि यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि इतर शेतकऱ्यांनाही सांगण्याचा शिकवण्याचा माझा सदैव प्रयत्न आहे आणि सदैव राहील. बाकी मंडळी या शेतकरी कन्याने एका शेती प्रक्रिया उद्योगात उतारून आपले स्थान तयार करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि यात मला खूप चांगला प्रतिसादही मिळत आहे. जर तुम्हाला आम्ही डेव्हलप केलेल्या स्ट्रॉबेरी जाम खायचा असेल किंवा हवा असेल तर नक्की मला 9405836623 Wefpro customer care या नंबरवरती मॅसेज करा किंवा कॉल करा.🙏
2 months ago | [YT] | 870
View 11 replies
Brand Shetkari
भले सीजनच्या सुरुवातीला पहिल्यांदा शेतातून चार फळे मिळाली. तर हि केवळ चार फळे नाहीत तर शेतकऱ्याने केलेलं कष्ट, ठेवलेला संयम याचा आनंदरूपी परतावा आहे. केवळ हि चार फळे आहेत पण आनंद या शेतीने ४०० किलो फळे दिल्यासारखा एवढा मोठा आहे. नक्कीच आपण फक्त अभ्यासपूर्ण प्रामाणिक कष्ट करत रहायचे. हि शेती आपल्याला कधीच नाराज करणार नाही. शेती पिकवायचीही अभ्यासपूर्वक आणि विक्रिव्यवस्था स्वतः आपण तयार करायची. कोणा आडते, दलालांच्या भरवशावर न राहता. आणि हेच मी करते. पिकवतेही स्वतः आणि पिकवलेल्या मालावर प्रोसेस करून विकतेही स्वतः मी आज शेती प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. Farmers produce dehydration and processing. एक गोष्ट खरी सांगू का शेतकरी हा उत्पादक आहे आणि त्याने स्वतःचा माल जर डायरेक्ट कस्टमर कडे पोहोचवला तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. लाख अडचणी येतात, बँका शेतकरी म्हणलं तर कर्ज प्रकरण करत नाहीत परंतु न हटता न भिता पुढे लागून त्या गोष्टी करणे गरजेचे आहे. या शेतकऱ्याला कर्ज न देणाऱ्या बँका आपल्या मागे लागले पाहिजेत सर कर्ज घ्या, मॅडम कर्ज घ्या आमच्या बँकेतून. एवढा आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाताना अनेक अडथळे येतील, अनेक लोक मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, डी मोटिवेशन देतील परंतु कोणाचेही न ऐकता जे आपल्या मनात आहे ते आपण करणं खूप गरजेचे आहे. काही कर्तुत्व करायला पैसाच लागत नाही तर फक्त इच्छाशक्ती लागते, इच्छाशक्ती जर मजबूत असेल तर कोणतीच गोष्ट आम्हा शेतकऱ्यांसाठी अवघड नाही. . .🙏
2 months ago (edited) | [YT] | 1,318
View 44 replies
Brand Shetkari
अगदी गावखेड्यातील शेतकरी ते मुंबईतील मध्यमवर्गीय लोकं सर्वांनी पु. ल. देशपांडे यांना आपलाच माणूस मानले. त्यांच्या एकांकिका, नाटके, चित्रपट, लेख यांतून दैनंदिन जीवनातील खरे-खोटे, हसणे-रडणे इतके सहजतेने उलगडले की, ऐकणारा/वाचणारा स्वतःचाच आयना पाहतो असा भास होतो.
पु. ल. हे फक्त हसवत नव्हते; ते हसवत-हसवत रडवत होते, विचार करायला लावत होते, आणि माणूस म्हणून उंच उभे करत होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात त्यांचे पुस्तक किंवा आठवण आजही जिवंत आहे – कारण ते आपले होते, आपले राहिले. माझे आवडते लेखक जर कोन असं विचारले तर मी गर्वाने पु. ल. यांचे नाव घेते. खरे पाहता पु.ल. नी "हसत खेळत जगावे, पण माणूसकी सोडू नये" हा संदेश दिला. अभिजात भाषा, अभिजात भाषा म्हणून आजचे राजकारणी श्रेय घेतात पण ही मराठी भाषा अभिजात बनवण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर यात पु. ल. यांचा वाटा खुप मोठा आहे . आंतरराष्ट्रीय दर्जावर मराठी भाषा नेण्यासाठी पु.ल. यांचं कार्य खुप मोलाचे आहे.🙏
2 months ago (edited) | [YT] | 607
View 7 replies
Brand Shetkari
शेतकऱ्याने पिकवणे आणि भलत्यानेच पिकविलेला कच्च्या माल कवडीमोल दरात घेऊन त्या मालावर प्रोसेसिंग करून, त्यात केमीकल मिसळून आपले लेबल लावून तो माल बाजारात आणणे आणि अवाईच्या सवाय दरात विक्री करून रगड नफा मिळवणे. अहो आज आम्ही या लोकांना आणि व्यवस्थेला ओळखून बसलोय.
आज आमच्या शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसाय मार्फत बाजारात उतरणे खूप गरजेचे झाले आहे आणि याच विचाराने एक आदर्श निर्माण करत मी शेतीपूरक व्यवसाय सुरू करून बाजारामध्ये पूर्ण तयारीनिशी उतरलेली आहे. संपूर्ण भारतात असे कोणतेही ब्रँड नाही जे आपल्या जाम प्रॉडक्ट मध्ये 74% पेक्षा जास्त स्ट्रॉबेरी देऊ शकते आणि केमिकल विरहित तर कोणीही प्रॉडक्ट बनवतच नाही कारण केमिकल मुळे यांना ते प्रॉडक्ट खूप स्वस्त पडतं. मी एक शेतकरी आहे आणि मी संपूर्ण अभ्यास करूनच हा केमिकल विरहित प्रॉडक्ट बाजारात आणलेला आहे.
काही ब्रँड कडून मलाही आता विरोध चालू झालेला आहे मी कुणालाही जुमानत नाही कारणमाझ्या अंगात शेतकऱ्याचे रक्त आहे आणि शेतकरी हा कधीच मागे हटत नाही. मला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज माझ्या अनेक ऑर्डर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जात आहेत संपूर्ण राज्यातून मला सकारात्मक प्रतिसाद आहे.
आपण जो मला प्रेम आणि सपोर्ट देत आहात त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने प्रसिद्ध होत असलेल्या या ब्रँडचा नॅचरल स्ट्रॉबेरी जाम (पुर्णपणे केमीकल विरहित) जर तुम्हाला आपल्या लहानग्या आणि मोठ्यांसाठी घ्यायचा असेल तर नक्कीच या 9405836623 नंबर वरती मेसेज करा आणि आपली ऑर्डर नोंदवा.🙏
3 months ago (edited) | [YT] | 949
View 52 replies
Brand Shetkari
आजपर्यंत शेती हाच ध्यास होता, आहे आणि यापुढेही राहणार आहे. काही चुकीच्या शासकीय धोरणांमुळे फक्त शेतीतूनच आर्थिक स्थिरता मिळणंकठीण होऊन बसलेले असल्याने शेतीला व्यवसायाची जोड आवश्यक असते. या विचाराने मी एक शेतीपुरक व्यवसाय चालू केलेला आहे. सध्या व्यवसाय छोटासा आहे पण समाधान मिळते. आज थोडे डोके चालवले तर अनेक व्यवसायाच्या संधी आहेत. कदाचित सोपे नसेल. माझ्यासाठीही नव्हते. आता सुद्धा नाही पण शेती सोडून महिन्याला काहि फिक्स पैसे मिळतील म्हणून नोकरी किंवा चाकरी करणे यात समाधान कुठले? मजा तर आपल्या व्यवसायातच आहे जिथे रोज आव्हानांना सामोरे जावे लागते.🙂
आज या भाऊबिजेच्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातील सर्व भाऊ बहिणींचे नाते, स्नेह आयुष्यभर अतूट राहु दे, ही सदिच्छा. रक्षणाचे वचन आणि प्रेमाचे बंध जपणाऱ्या भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !🌸
बाकी या दिपवालीत घरी बनवलेल्या फराळाबरोबरच आपल्या लहानग्यांचं , मोठ्यांचं तोंड अजून गोड करण्यासाठी आपल्या Wefpro कंपनीचा natural strawberry jam आपण नक्की ऑर्डर करू शकता. ऑर्डरसाठी कस्टमर केअर नंबर 9405836623 . नक्की WhatsApp मॅसेज करा.
पुन्हा एकदा भाऊबिज सणाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा...🙏
3 months ago (edited) | [YT] | 714
View 51 replies
Load more