Follow My Social Media youtube.com/@hanumantbhopale
www.facebook.com/profile.php?id=100063538068845&am…
२) instgram : @hanumantbhopale
३) Teligram:
t.me/drhanumantbhopale
4) SUBSCRIBE : youtube.com/@hanumantbhopale
5) Mobile No : 9767704606
This channel is full of motivational videos.
Study methods, counselling, motivation, parasonality development, poem, positive thoughts
प्रेरणादायी विचार, व्यक्तिमत्त्वविकास
डॉ .हनुमंत मारोतीराव भोपाळे
Dr. Bhopale Hanumant Marotirao
hmbhopale@gmail.com
youtube.com/@hanumantbhopale
Hanumant Bhopale
'केवळ पदव्यांनी नौक-या मिळवण्याचा काळ संपत चालला आहे' प्रा. हनुमंत भोपाळे
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. 'शाळा शिका आणि नौकरी मिळवा'. 'पदवी म्हणजे नौकरी' हे सूत्र दिवसेंदिवस मागे पडताना दिसत आहे. केवळ पदवीच्या बळावर नौकरी मिळेल ही अपेक्षा अनेकदा निराशाजनक ठरत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन आणि नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराचे, नौक-याचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे ज्यांना नौकरी हवी त्यांनी केवळ प्रमाणपत्रे किंवा पदव्यांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष काम करण्याची कौशल्ये आणि क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. अनेकांकडे वेळ नाही आणि त्यांच्याकडे माणसंही नाहीत अशांना दैनंदिन सेवा देऊन पैसे कमवण्याची एक संधी नव्याने झपाट्याने वाढत आहे. वेल्डिंग, प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल काम, रोबोटिक्स देखभाल, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामे, आरोग्यसेवा, दैनंदिन सेवा आणि इतर तांत्रिक व्यवसायांना जगभरात मोठी मागणी निर्माण होत आहे. मानसिक आरोग्य, मानसिक आधार, भावनिक पाठबळ आणि योग्य प्रेरणादायी मार्गदर्शन देणा-या व्यक्तींची दिवसेंदिवस गरज वाढत आहछ. त्यामुळे तुम्ही मानसशास्त्र समुपदेशन यावर भर देऊन समाजाला बळ देण्याचे काम करणार असाल तर तुम्हाला चांगली संधी आहे. अनुभव, सेवा, सहकार्य, सद् गुण निर्णयक्षमता आणि प्रत्यक्ष कौशल्याला विशेष महत्त्व देतील ते टिकतील असा काळ आला आहे. विशेषतः तात्काळ विश्वसनीय सेवा देणाऱ्यांना सातत्याने मागणी वाढत आहे.
यासोबतच उत्तम संवादकौशल्य, विश्वसनीयता, समस्या सोडविण्याची क्षमता, नेतृत्वगुण, संघभावना योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि कलात्मकता यांचे महत्त्व अधिक वाढत आहे. AI अनेक कामे करू शकते, परंतु मानवी संवेदनशीलता, सकारात्मकता, सद्भाव, भावनिक भरणपोषण,सर्जनशीलता आणि नैतिक निर्णयक्षमता यांची जागा सहजपणे घेऊ शकत नाही.
आजच्या युवापिढीने पदवीसोबतच कौशल्ये विकास, क्षमतावृध्दी,अनुभव,ज्ञान नवोपक्रमशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन यांवर भर दिला पाहिजे. या या क्षेत्राची केवळ मला माहिती आहे, मला नौकरी द्या असे म्हणणा-याची जागा एआयने घेताना दिसत आहे.भविष्यात चांगला रोजगार त्यांनाच मिळेल जे बदलत्या काळानुसार स्वतःला सतत विकसित आणि अद्यावत करतील. मानवी गरजापूर्तीसाठी आवश्यक सदगुण,क्षमता आणि कौशल्य विकसित करतील त्यांचा काळ असेल. मला हे हे नवीन निर्माण करता येते. लोकांना देताही येते, असे म्हणणा-यांचा सुवर्ण काळ येत आहे.ऑनलाईन सेवा क्षेत्रात संधी आहेत. नेटवर्क मार्केटिंग आणि मल्टी लेव्हल मार्केटिंग याचा अभ्यास करून गुणवत्तापूर्ण सेवा देणा-यांना चांगली संधी आहे. या क्षेत्रात टीम वर्क, संवादकौशल्य, प्रेरणा, प्रोत्साहन आणि आपल्या टीमला मोठे करण्याची भावना आणि भूमिका अतिशय महत्वाची आहे.. आनलाईन तंत्रज्ञान,संवादकौशल्याच्या बळावर वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करून ऑनलाईन नेटवर्क उभे करून अनेक जण पैसे कमवत आहेत. वाट बघून नाही तर वाटचाल यशस्वी होता येते, असे विचार बाळगून वाटचाल करण्याची मानसिकता यशदायी असणार आहे. जर तुमच्याकडे गायन, नृत्य, विनोद आणि उत्तम संवाद कौशल्य, प्रेरणादायी मार्गदर्शन आत्मविश्वासाने करता येत असेल यूट्यूब, इस्टाग्राम,फेसबुकच्या माध्यमातूनही करिअर करण्याची संधी आहे.
– प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक तथा व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ 9767704604
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Hanumant Bhopale
हो,
2 days ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
टिकायचं असेल आणि टिकवायचं तर प्रत्येकाने योगदान द्यावे
अनेक पक्ष, संघटना आणि चळवळी निर्माण झाल्या आणि काळाच्या ओघात नाहीशा झाल्या. काही आजही केवळ नावापुरत्या अस्तित्वात आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे ध्येयातील एकवाक्यता नसणे, वैयक्तिक स्वार्थ आणि कमालीचा अहंकार, नियमित कार्याचा अभाव आणि सदस्यांचा निष्क्रिय सहभाग. याशिवाय कर्तव्यशून्यांना स्थान आणि सन्मान आणि कर्तव्य बजावणा-याकडे दुर्लक्ष करून अपमान.
संघटना जिवंत राहते ती नित्य कार्यसंस्कृती आणि सन्मान संस्कृती, संवाद, विचारांचा प्रसार आणि कार्यकर्त्यांचा सहभाग यामुळेच पक्ष,संघटनेचा विकास, विस्तार आणि प्रभाव निर्माण होतो. अन्यथा लोक मनोमन भावपूर्ण श्रद्धांजली वाहतात.
पक्ष, संघटनेची उभारणी आणि विकास ही एक-दोघांची जबाबदारी नसते; ती संघटनेतील प्रत्येक सदस्यांची सामूहिक जबाबदारी असते. नेतृत्व करणाऱ्यांची जबाबदारी निश्चितच अधिक असते, कारण ते होकायंत्र असतात.परंतु पक्ष,संघटना केवळ नेत्यांच्या खांद्यावर उभी राहत नाही. प्रत्येक सदस्याने यथाशक्ती आणि निरंतर योगदान दिले पाहिजे.
संघटनेत येण्याचा उद्देश केवळ प्रेक्षक किंवा बघ्याची भूमिका घेणे हा नसावा.'मला काय मिळते?' हे पाहणे नसतो. संघटनेची उद्दिष्टे, विचार आणि चळवळ पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कौशल्य आणि क्षमतेनुसार हातभार लावणे आवश्यक असते.
जबाबदारी स्वीकारायची नाही, भूमिका घ्यायची नाही, कार्यात सहभाग घ्यायचा नाही, तर पक्षात,संघटनेत राहण्याचा उद्देशच काय? असा प्रश्न निर्माण होतो.
संघटना केवळ नेत्यांमुळे मोठी होत नाही; ती कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे, कर्तव्यभावनेमुळे आणि सामूहिक परिश्रमामुळे सक्षम व प्रभावी बनते. प्रत्येक सदस्य हा पक्ष संघटनेचा आधारस्तंभ असतो; अहंकारस्तंभ नसतो.
पक्षात
स्वतःसाठी नव्हे, तर समाजाच्या भल्यासाठी यायचे असते. यशाचे श्रेय मला आणि अपयशाची जबाबदारी तुम्हाला, अशी भूमिका पक्षीय, संघटनात्मक संस्कृतीला घातक असते. यश आणि अपयश या दोन्हींचा वाटा सर्वांनी स्वीकारला पाहिजे.
संघटनेची खरी ताकद केवळ नेतृत्व करणाऱ्याच्या हाती नसते; ती प्रत्येक कार्यकर्त्याच्या सहभाग, बांधिलकी आणि जबाबदारीच्या भावनेत असते. झाड मोठे झाले तर त्याची सावली, फुले आणि फळे सर्वांना मिळावीत ही अपेक्षा रास्त आहे . विकास हा सर्वांसाठी असला पाहिजे.
खायला तुम्ही आणि कामाला आम्ही असे होता कामा नये.
आज अनेक पठिकाणीक्ष आणि संटनेत 'यूज अँड थ्रो' — वापरा आणि फेका — ही मानसिकता दिसून येते. आपल्यासाठी आपल्या पक्षासाठी राबलेली माणसं आहेत कुठे?आणि गेली कुठे? यासाठी एखादा दिवस वेळ काढला पाहिजे. असे फारसे होताना दिसत नाही.
त्यामुळे काही कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, 'आपण केवळ सतरंज्या उचलण्यासाठीच आहोत काय?' अशा कटू अनुभवांमुळे काही जण दूर जातात, दूरून पाहतात., तर काही जण जवळही येत नाहीत आणि पूर्णपणे दूरही जात नाहीत. त्यांची भूमिका असून नसल्यासारखी, प्रभावशून्य आणि कर्तव्यउणी राहते.
काही जण लाभ असला तरच जवळ येतात; पंगती बसण्याची वाटच पाहतात.
लाभ नसेल तर दूर राहतात.
परंतु काही कार्यकर्ते असे असतात की, मान मिळो अथवा अपमान, कौतुक होवो अथवा टीका — सहन करून नेतृत्व कधी चुकत नसते म्हणत निष्ठेने
कार्य करत राहतात. त्यांच्या कार्यामागे स्वार्थ नसतो; असते ती केवळ कर्तव्यनिष्ठा.
रामायणातील हनुमान आणि लक्ष्मण यांची भूमिका याचे उत्तम उदाहरण आहे. युद्ध संपल्यानंतर रामांना सीता मिळाली, अयोध्येचे राज्य मिळाले. परंतु हनुमान आणि लक्ष्मण यांना काय मिळाले?
काहीजण म्हणतील की काहीच मिळाले नाही. कर्तव्य कधीच वांझ नसते.त्याला काही ना काही मिळत असते.
त्यांना मिळाले कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि रामायणात अमरत्व. आजही त्यांच्या नावाचा आदराने उल्लेख केला जातो.
हनुमानाची तर नित्य पूजा होते.
म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे — कर्तव्य काहीच देत नाही, असा आरोप कर्तव्यावर करू नये. कर्तव्य नेहमीच काही ना काही देते; कधी समाधान, कधी सन्मान, कधी विश्वास, तर कधी अजरामर स्थान.
असेच लक्ष वाचायला हवे असतील चैनलच्या सोबत रहा
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक तथा व्यक्तिमत्वविकासतज्ज्ञ 9767704604
2 days ago | [YT] | 2
View 0 replies
Hanumant Bhopale
*‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत - जिल्हाधिकारी राहुल कर्डीले*
नांदेड दि. 16 जून:- वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी जिल्ह्यातून एका गावाची निवड करण्यात येणार असून इच्छुक ग्रामपंचायती, संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३० जून २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांनी केले आहे.
राज्यात पुस्तकांचे गाव निर्माण करताना सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता या उपक्रमात सहभागी व्हावे. या उपक्रमात व्यापक लोकसहभाग असणे आवश्यक असून त्याबाबतचा उल्लेख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावामध्ये असणे बंधनकारक आहे. प्रत्येक ग्रंथदालनाचे क्षेत्रफळ किमान १५० चौ. फूट असावे तसेच संबंधित जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. यासाठी किमान पाच वर्षांचा करार करणे बंधनकारक राहणार आहे. गावातील परिस्थितीनुसार उपलब्ध दालनांची संख्या व आकारमान कमी-जास्त असू शकते. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मराठी विकास संस्था घेणार आहे.
‘पुस्तकांचे गाव’ निवडीसाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार ही योजना फक्त ग्रामपंचायत, नगरपंचायत व ‘क’ वर्ग नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा नगरपरिषदेचा ठराव आवश्यक राहील. शासनाने घोषित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा असलेली गावे, राज्य किंवा केंद्र संरक्षित स्मारके असलेली गावे तसेच संत गाडगेबाबा, आदर्श गाव, तंटामुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच साहित्यिक किंवा वाङ्मयीन चळवळीची परंपरा असलेल्या गावांचाही विचार केला जाणार आहे.
प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मराठी भाषा समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करून पात्रतेचा अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर गावाची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या गावात सुरुवातीला किमान दहा ग्रंथदालने सुरू करण्यात येतील. या दालनांसाठी आवश्यक आवर्ती व अनावर्ती खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. उपलब्ध जागा, वाचन संस्कृतीची परंपरा आणि पर्यटन विकासाची क्षमता या बाबींचा विचार करून गावाची निवड केली जाईल. केवळ पुस्तक विक्री किंवा प्रदर्शनापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता वाचन प्रेरणा, साहित्यिक उपक्रम, ग्रंथदालने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानकेंद्र उभारून मराठी साहित्यविश्वाचे दर्शन घडविणे आणि पर्यटन विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहिती, अटी व शर्तींसाठी मराठी भाषा विभागाचा ३० जानेवारी २०२६ रोजीचा शासन निर्णय पाहावा. इच्छुक मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. ३० जून २०२६ पर्यंत संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या नावे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व डिजिटल उपकेंद्र नांदेड बहुउद्देशीय सांस्कृतिक संकुल श्री गुरुगोबिंदसिंगजी स्टेडियम परिसर ,नांदेड येथे तीन प्रतींमध्ये सादर करावेत.
या उपक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नांदेड यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अधिक माहितीसाठी 8355966561 किंवा 9834276257 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
Hanumant Bhopale
IPO (Initial Public Offering) म्हणजे एखादी कंपनी प्रथमच आपल्या मालकीचे शेअर्स सर्वसामान्य जनतेला विक्रीसाठी उपलब्ध करून देते, त्याला IPO म्हणतात.
सोप्या भाषेत
समजा एखादी कंपनी वाढीसाठी पैसे उभारू इच्छिते. बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी ती कंपनी स्वतःचे शेअर्स लोकांना विकते. लोक ते शेअर्स विकत घेतात आणि कंपनीला भांडवल मिळते.
उदाहरण
एखाद्या कंपनीने IPO मध्ये एक शेअर ₹100 ला विक्रीसाठी ठेवला.
तुम्ही 100 शेअर्स घेतले.
तुम्ही ₹10,000 गुंतवले.
कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर शेअरची किंमत ₹150 झाली तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य ₹15,000 होईल.
IPO चे फायदे
✅ कंपनीला विस्तारासाठी पैसा मिळतो
✅ गुंतवणूकदारांना कंपनीत भागीदारी मिळते
✅ कंपनीची विश्वासार्हता वाढते
✅ शेअर्स शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येतात
IPO मध्ये जोखीमही असते
IPO म्हणजे सर्वसामान्य लोकांना कंपनीचे शेअर्स प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया. 📈💰
4 days ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
सहकाऱ्यांसोबत कसे वागावे? 🤝
✅ आदराने वागा
✅ स्पष्ट व प्रामाणिक संवाद ठेवा
✅ सहकार्याची भावना जोपासा
✅ मतभेद संयमाने हाताळा
✅ विश्वासार्ह बना
✅ इतरांच्या यशाचे कौतुक करा
✅ निंदा, अफवा आणि गॉसिप टाळा
✅ सकारात्मक दृष्टीकोन ठेवा
"चांगले सहकारी हे यशस्वी कार्यसंस्कृतीचे आधारस्तंभ असतात."
मार्गदर्शक
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक तथा व्यक्तिमत्वविकासतज्ज्ञ
📞 9767704604
4 days ago | [YT] | 1
View 0 replies
Hanumant Bhopale
प्रभाव निर्माण करण्यासाठी काय करावे लागते?
प्रभाव (Influence) हा पद, पैसा किंवा प्रसिद्धीमुळे निर्माण होत नाही; तो विश्वास, कर्तृत्व आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे निर्माण होतो.
१. ज्ञान आणि कौशल्य विकसित करा
ज्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करायचा आहे त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळवा.
उदा.
शिक्षकाने अध्यापनात प्राविण्य मिळवावे.
लेखकाने सातत्याने दर्जेदार लेखन करावे.
राजकारण्याने जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करावा.
२. सातत्य ठेवा
एक-दोन दिवस चांगले काम करून प्रभाव निर्माण होत नाही.
सातत्य हे प्रभावाचे मूळ आहे.
३. लोकांच्या समस्या सोडवा
जो इतरांच्या समस्या सोडवतो त्याच्यावर लोकांचा विश्वास बसतो.
४. प्रामाणिकपणा जपा
लोक काही काळ तुमचे बोलणे ऐकतील, पण दीर्घकाळ तुमच्या चारित्र्यावर विश्वास ठेवतील.
५. प्रभावी संवाद साधा
विचार लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचले पाहिजेत.
लेखन
वक्तृत्व
सोशल मीडिया
प्रत्यक्ष संवाद
यांचा योग्य वापर करा.
६. कृतीतून उदाहरण निर्माण करा
लोक शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात.
"जे सांगता ते स्वतः जगून दाखवा."
७. लोकांशी नाते निर्माण करा
प्रभाव निर्माण करण्यासाठी लोकांच्या मनात स्थान मिळवावे लागते.
८. समाजोपयोगी कार्य करा
स्वतःच्या फायद्यापलीकडे जाऊन समाजासाठी काम करणाऱ्यांचा प्रभाव अधिक टिकतो.
९. वेगळेपण जपा
जगात अनेक लोक काम करतात; पण काही जण वेगळ्या पद्धतीने काम करतात म्हणून लक्षात राहतात.
१०. मूल्याधिष्ठित जीवन जगा
सत्य, न्याय, समता, माणुसकी यांसारख्या मूल्यांवर उभा असलेला प्रभाव दीर्घकाळ टिकतो.
---
प्रभाव निर्माण करणाऱ्यांचे सूत्र
✅ ज्ञान
✅ सातत्य
✅ गुणवत्ता
✅ विश्वास
✅ सेवा
✅ संवाद
✅ चारित्र्य
---
लक्षात ठेवा
नाममुद्रा निर्माण करण्यासाठी कर्तृत्व लागते;
पण प्रभाव निर्माण करण्यासाठी विश्वास संपादन करावा लागतो.
"लोक तुमचे नाव विसरू शकतात, पण तुमच्यामुळे त्यांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल कधीच विसरत नाहीत. हाच खरा प्रभाव असतो."
— व्यक्तिमत्वविकासतज्ज्ञ
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
4 days ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
वरच्या मजल्यावरील फ्लॅटमधून खालच्या मजल्यावर
पाणी लिकेज होण्याची प्रमुख कारणे आणि ठिकाण
१. बाथरूममधील वॉटरप्रूफिंग खराब होणे
बाथरूमच्या फरशीखालील वॉटरप्रूफिंग निकामी होणे
टाइल्सच्या सांध्यांमधून पाणी झिरपणे
भिंत आणि फरशीच्या जोडांमधून गळती
२. कमोड (WC) किंवा ड्रेनेज लाईन
कमोडच्या तळाशी गळती
ड्रेनेज पाइपचे सांधे सैल होणे
सीवर पाइपला तडे जाणे
३. वॉटर सप्लाय पाइप
गरम किंवा थंड पाण्याच्या पाइपमध्ये सूक्ष्म गळती
भिंतीत किंवा स्लॅबमध्ये लपविलेले पाइप फुटणे
४. वॉश बेसिन किंवा सिंक
बेसिनचा ड्रेन पाइप लीक होणे
नळाचे कनेक्शन गळणे
५. किचन प्लॅटफॉर्म
सिंकखालील पाइप गळणे
RO, वॉटर फिल्टर किंवा डिशवॉशरची गळती
६. वॉशिंग मशीन
इनलेट किंवा आउटलेट पाइप गळणे
मशीनमधून पाणी सांडणे
७. बाल्कनी किंवा टेरेस
पावसाचे पाणी साचणे
वॉटरप्रूफिंग खराब होणे
ड्रेनेज होल बंद होणे
८. ओव्हरहेड टाकी किंवा पाण्याची लाईन
टाकी फुटणे किंवा ओव्हरफ्लो
टाकीच्या आउटलेटमधन गळती
4 days ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
आपल्या उपयोगितेवरून आपले महत्त्व निश्चित होते का?
डॉ.हनुमंत भोपाळे
प्रत्येक व्यक्ती यथाशक्ती ,यथामती कार्य करत असते.याचा लाभ किती व्यापक , विधायक आणि शाश्वत आहे , यावरून त्या व्यक्तिचे महत्व निश्चित होते.कार्याचे स्वरूप संस्था, समाज आणि राष्ट्राला उपकारक असेल तर विधायक कार्य समजले जाते.असे काम करणारा समूह निर्माण करून त्यांना कायदेशीर आणि फायदेशीर सहकार्य करणारा व्यक्ती नायक ठरतो.या कार्यात सातत्य असेल ,लाभ हा देशातील असंख्य व्यक्तिंना होतं असेल तर निश्चितच असे व्यक्तिमत्व देशात प्रसिद्ध होते.परदेशही दखल घेते.
सर्वांना चोवीस तास उपलब्ध आहेत.या चोवीस तासांत व्यक्तीच्या कृती आणि उक्तीतून इतिहास निर्माण होतो. समाजाला त्या कृती आणि उक्ती महत्त्वाच्या आणि उपयुक्त वाटल्या तर तातडीने लाभ सुरू होतात.कधी कधी त्या व्यक्तीच्या कृती आणि उक्तीचे महत्त्व , उपयोगिता समाजाच्या लक्षात येतं नाही.काहीजणांच्या लक्षात येते पण ही माणसं समाजातून होणारा विरोध,रोष लक्षात घेऊन विरोध करतात अन् समाजप्रिय होण्याचा प्रयत्न करतात.हा प्रयत्न क्षणभंगूर आणि पश्र्चातापकारकही ठरू शकतो.
काहीजण मौन पाळणे पसंत करतात.कार्य जर सत्य, व समाजापयोगी असले तर काहीवेळा वर्तमानाच्या लक्षात आले नाही तरी भविष्याला त्याची नोंद घ्यावी लागते.
एकजण म्हणाला, "
मला कशाचं काही देणंघेणं नाही.पोटोबाच्यापूर्तीसाठी जगत आहे.मूल्य,तत्व,खरं, खोटं या भानगडीत आपण पडतच नाही.सोय होणार असेल तर सत्याला असत्य आणि असत्याला सत्य म्हणायची तयारी आहे.कुठल्याही वादाशी आमचं देणंघेणं नाही.सोयवाद आम्हाला प्रिय आहे.,"ही भूमिका स्वहिताची ठरेल पण सज्जन इतिहासकार यांची नोंद घेत नाहीत.
अशा बिकट परिस्थितीतही काही माणसं स्वहिताचा विचार न करता, एवढेच नव्हे तर समाजरोषाला बळी पडून समाज, राष्ट्रहित हिताचे समर्थन करतात.सहकार्य करण्यासाठीही सज्ज राहतात, अशी माणसं देश,समाजाचे रत्न ठरतात.अशा रत्नांचा गौरव होणे
उपकारक ठरते.
काही गोष्टी निरर्थक असतात.या गोष्टीत अनेकांचे आयुष्य
वाया जाते.काहीजणांनी बिघडवणूक करून घेतली आहे की,ते या जगात असले काय अन् नसले काय
त्यांच्यावाचून काही फरक पडत नाही.उलट अशा व्यक्ती मेल्या तर बरे होईल असे घरचे आणि बाहेरचेही वाट पाहतात. काही कारणांने यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा बरं झालं पीडा गेली अशा प्रतिक्रिया येतात.हा त्या व्यक्तींचा मोठा पराभव मानला जातो. एखादा व्यक्ती नसल्याची तीव्र जाणीव सज्जनांना,समाजाला होत असेल तर, हे त्या व्यक्तीच्या कृती ,उक्ती आणि सुस्वभावाचे यश असते.कृती, उक्ती आणि स्वभावावरून यशापयश अवलंबून असते हे मात्र नक्की !
डॉ.हनुमंत भोपाळे 9767704604
hanumantbhopale@gmail.com
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
जनहितार्थ :असे विषय जनतेपर्यंत नेणे आवश्यक
'आता कोकणच्या दुष्परिणाला लगाम ' ब्राझीलच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या लस' मित्र हो, नुकताच एक संशोधन समोर आलेला आहे. त्या संशोधनातून एक लस समोर आलेली आहे. ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी अशी लस तयार केली आहे की, कोकेनचा परिणाम मेंदूपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे व्यसनावर नियंत्रण मिळवण्यास आणि व्यसनमुक्त होण्यास मदत होऊ शकते. 'कोकेनचे परिणाम'
काही काळासाठी उत्साह, ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढल्यासारखे वाटते.
मेंदूमध्ये डोपामिनचे प्रमाण वाढवून काही वेळ आनंदाची तीव्र भावना निर्माण करते.
भूक आणि झोप कमी होते.
हृदयाचे ठोके व रक्तदाब वाढतो.
कोकणचे
लवकर व्यसन लागते. त्यामुळे
चिंता, नैराश्य, चिडचिड वाढते.
हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांचा धोका वाढतो.
मानसिक संतुलन बिघडू शकते.
जास्त प्रमाणात घेतल्यास मृत्यूही होऊ शकतो.
भारतासह बहुतेक देशांमध्ये कोकेन बेकायदेशीर आहे. त्याचे उत्पादन, विक्री, खरेदी किंवा सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे.
समुपदेशनाच्या दृष्टीने
कोकेनचे व्यसन हे केवळ इच्छाशक्तीचा प्रश्न नसून मेंदूच्या कार्यप्रणालीशी संबंधित एक गंभीर आरोग्य समस्या आहे. व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन, वैद्यकीय उपचार, कुटुंबाचा आधार आणि पुनर्वसन यांची आवश्यकता असते.
1 week ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
Load more