Hanumant Bhopale

Follow My Social Media youtube.com/@hanumantbhopale

www.facebook.com/profile.php?id=100063538068845&am…

२) instgram : @hanumantbhopale

३) Teligram:
t.me/drhanumantbhopale

4) SUBSCRIBE : youtube.com/@hanumantbhopale

5) Mobile No : 9767704606

This channel is full of motivational videos.
Study methods, counselling, motivation, parasonality development, poem, positive thoughts
प्रेरणादायी विचार, व्यक्तिमत्त्वविकास
डॉ .हनुमंत मारोतीराव भोपाळे
Dr. Bhopale Hanumant Marotirao

hmbhopale@gmail.com
youtube.com/@hanumantbhopale


Hanumant Bhopale

प्रेरणादायी चित्रपट पहा.ते आपले आत्मबळ
वाढवत असतात
डॉ.हनुमंत भोपाळे

खूप दिवसांनी चित्रपट बघण्याचा योग आला.
डॉ तात्या लहाने
हा मराठी चित्रपट खरंच प्रेरणादायी आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करून
यशस्वी ठरलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या लेकरांची ही कहाणी प्रेरक अशी आहे.
ज्या मुलांमुलींना यशस्वी व्हावं वाटते,त्यांनी
अशा प्रेरणादायी कहाण्या समजून घेतले पाहिजे.
त्यामुळे यशस्वी मानसिकता बनण्यास मदत होते.
यश छान वाटते,पण हे छान वाटण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.खूप सहन करावे लागते.
घडताना अन् घडवताना
खूप काही भोगावं लागते
कधी कधी भाकरीसारखं
तव्यावर भाजावं लागतं
भाजलेलं बरं असतं
भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्यालाही मोलं नसतं
याचा प्रत्यय हा चित्रपट देतो.
गरीबीमुळे पोटभर दोन वेळचे जेवण मिळत नसलेल्या
कुटुंबात जन्मलेल्या तात्या लहानेनी शिक्षणासाठी किती अपार कष्ट घेतले ते पाहिल्यानंतर कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होतं नाही ,ही बाब प्रकर्षाने जाणवते.
आईवडिल आपल्या लेकरांसाठी किती कष्ट
घेतात,याची जाणीव नसणा-यांना हा चित्रपट डोळ्यात अंजन घालतो. आईवडिलांचे महत्व अधोरेखित
करणारा हा चित्रपट आहे.
तात्या लहाने यांच्या दोन्ही किडन्या निकामी होतात तेव्हा
त्याची आई एकच काय पण दोन्ही किडन्या घ्या पण मज्या लेकराला वाचवा, असे डॉक्टरांना अत्यंत काकुळतीला येऊन विनंती करते तेव्हा
आपले डोळे पाणावतात.आईला
त्यागमूर्ती का म्हणतात याचा प्रत्यय येतो.
आई, तू माझ्यासाठी काय केले नाही असे ज्यांना वाटते त्यांना आई किती कष्ट घेते याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.तात्यांची
आई त्यांना किडणी देते.यामुळे
डॉ .तात्या लहाने यांचा जीवनदान मिळते. .ते पुन्हा वेगाने
रुग्णांना सेवा देतात.
भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री दिली जाते.त्यांचे
.हे यश सहन काही जणांना सहन होत नाही.
काही माणसं स्वत:तर काम करत नाहीत, जे करतात त्यांनाही बिघडून टाकतात,अशा कामटाळू कर्मचा-यांवर तात्या रागतात म्हणून एक कर्मचारी पोलीस
केस करतो.
जीवावर बेतणारे काही प्रसंग येऊनही तात्या काम करत राहतात.खरंच प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व पद्मश्री डॉ. तात्या लहाने हे आपल्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील एका खेड्यातील आहेत.त्यांचा जीवनपट प्रेरणादायी आहे.
मराठवाड्यातील लहाने परिवार
चरित्र आणि चित्रपटांचा विषय
झाला,याचा अभिमान वाटतो.
सलामच त्यांच्या कार्याला!
पुढील लेखात नांदेड जिल्ह्यातील
नागदरवाडी येथील एका परिवारावर
पाणी चित्रपट प्रसारित झाला आहे,
त्याविषयी वाचा !

डॉ.हनुमंत मारोतीराव भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

3 days ago | [YT] | 2

Hanumant Bhopale

आधार नंबर
मोबाईल नंबर.आणि
मोबाईलमधील
इमेल
इतक्या
बाबीं ज्यांच्याकडे
आहेत,त्यांना
Use me या स्वदेशी कंपनीच्या
ऐपचा प्रचार
आणि प्रसाराचे
काम आँनलाईन
पध्दतीने
घरी बसल्या बसल्या
करून
आर्थिक कमाई
करण्याची बेरोजगार
युवक ,युवती आणि
गृहणींना
रोजगाराची
संधी उपलब्ध
आहे.
*काय काम करावे*?
प्ले स्टोअरला
जाऊन
Use me app
टाका
इंस्टाल
करून
माहिती घ्या.
रेफरल आय.डी.
UM 97272
तो ऐप इतरांना
पाठवा...
तेही इंस्टाल
करतील
हळूहळू
तुमची टीम
तयार होत
जाईल..
आर्थिक कमाई
वाढत राहिल.
अधिक माहितीसाठी
खालील नंबरवर
फोन करा
9767704604
chat.whatsapp.com/Ic0xCj28frn4iw1DWWhlZs?mode=gi_t

1 week ago | [YT] | 0

Hanumant Bhopale

नेटवर्क उभे
करण्यासाठी
प्रयत्न
राहणे म्हणजे आर्थिक
कमाईचा झरा
तयार करणे असते.
तुम्ही उभे केलेले
सक्रिय नेटवर्क
तुम्हाला
नेट पैसा देत
राहिल.
नेटवर्क सिस्टिममध्ये
*यशस्वी* येण्यासाठी
काय करावे?
असा प्रश्न
पडला असेल
तर
जगामध्ये ग्राहकांचे जाळे
तयार करून
नेटवर्क उभे
करून लाखो
व्यक्ती चांगली
कमाई करीत
आहेत,याचा
अभ्यास करा.
अनुभव घ्या.
ज्ञानात ,अनुभवात
शक्ती असते.
ज्यांना
नेटवर्क
उभे करता
येत नाही ते फक्त
ग्राहकच राहतात.
ग्राहकच राहून
चालणार नाही
ग्राहकांचे
जाळे तयार
करणे
आणि त्यांना
ग्राहकांचे जाळे तयार
करण्यासाठी
शिक्षण आणि
प्रशिक्षण देणे.
प्रेरणा, प्रोत्साहन
देणे गरजेचे
आहे.
अनेक जण
नेटवर्क उभे
करण्यासाठी
वेळ देत नाहीत. ते
मजूरी,नौकरी,स्वयंरोजगार
करून मिळवलेला
पैसा हा
वस्तू आणि
सेवा खरेदी
करत जगतात.
अशी बहुतांश
माणसं आर्थिकदृष्ट्या
स्वतंत्र आणि सक्षम होऊ
शकत नाही.
*विचार*
*करा*
आपण
स्वतः एकटेच
अनेक वर्षापासून
करत असलेली
मजूरी
उद्या करू
शिकत नाही.
आपले सोबतीचे
मजूरी करत आहेत
म्हणून आपल्याला
पैसे,मजूरी मिळेल का?
मजूरी करायला
गेलो नाही तरी कितेक
वर्ष मजूरी करून
मजूरी मिळत नाही.

आपले सहकारी
नौकरी,मजूरी करीत
आहेत,
त्यांचे काम
आणि त्यांचा
मोबदला आपला
होऊ शकत नाही,ही
गोष्ट लक्षात घ्या.
*नेटवर्किंग मार्केटिंग*
*क्षेत्रात काय घडते*?
नेटवर्किंग
मार्केटिंग क्षेत्रातील
वस्तू
आणि सेवा
देणा-या कंपनीत
एकदोन
वर्ष काम करून
हजार पाचशे
ग्राहकांचे
जाळे तयार केले.
नेटवर्क उभे
केले. आपण
जोडलेले
आणि आपल्या
टीमने जोडलेले
ग्राहक
त्या कंपनीच्या
वस्तू आणि
सेवा खरेदी
करीत आहेत..
तुम्हीदेखील
त्याचं कंपनीच्या
सेवा आणि
वस्तू खरेदी
करीत आहात.
तर तुम्हाला
तुम्ही उभ्या
केलेल्या टीमच्या
खरेदी केलेल्या
वस्तू आणि
सेवांवरचे
तुम्हाला
कमिशन,लाभांश
मिळत राहतो.
तुमच्या टीमच्या
टीमचाही फायदा होत
राहतो.
नोकरी,मजूरीच्या
क्षेत्रात असे
घडत नाही.
त्यामुळे
कायदेशीर अन्
शासनमान्य
अशा ग्राहकांसाठी
नित्य उपयुक्त अशा
वस्तू
आणि सेवा
देणा-या कंपनीत
हळूहळू आपले
नेटवर्क उभे
करण्यासाठी
वेळ द्या.
सातत्याने ग्राहकांचे
जाळे उभे
करा.
तुम्ही उभे
केलेल्या ग्राहकांतील
दोन टक्के
ग्राहकांनी जरी
तुमच्या सोबत
काम केले
तरी तुमची
आर्थिक कमाई
अखंडित
होत राहते.
तुम्ही उभे केलेल्या
ग्राहकांचे
जाळे
तुमच्या वारसांसाठीही
फायदा देते.
कारण तुम्ही
उभे केलेले
नेटवर्क तुमच्या
वारसा(नॉमिनी)
च्या नावावर
ट्रान्सफर होते.
म्हणून
स्वतः साठी
आणि आपल्या
भावी पिढीसाठी
आपण ग्राहकांचे
जाळे तयार
करत वाटचाल
करणे हितावह
ठरेल.
डॉ .हनुमंत मारोतीराव भोपाळे
9767704604

1 week ago | [YT] | 0

Hanumant Bhopale

*सकारात्मक*
*बनणे आवश्यकच आहे*
*का*?
डॉ. हनुमंत भोपाळे

सकारात्मक विचार
वाचणे,लिहिणे,ऐकणे
आठवणे, सांगणे,चिंतन आणि
मनन करता का?
या प्रश्नांचे उत्तर
नाही असे असेल तर
दुसरा प्रश्न
स्वतः
नकारात्मक विचार
वाचणे,लिहिणे,ऐकणे
आठवणे, सांगणे,चिंतन आणि
मनन करता का?
या प्रश्नांचे
उत्तर
*होय* तसेच
करतो,असे
असेल
तर
तुम्ही ताणतणाव,भय,चिंता,
उदासिनता यांचा सामना
करत आहात
आणि
तुमचे मानसिक स्वास्थ
चांगले राहिले
नाही
असा त्याचा अर्थ
आहे.
असे म्हटल्यावर
एकाने प्रश्न विचारला
मानसिक स्वास्थ
उत्तम राहावे
सकारात्मक
माणूस अशी प्रतिमा
निर्माण करण्यासाठी
काय उपाय करावेत?
मी म्हणालो,
"सकारात्मक विचार
वाचणे,लिहिणे,ऐकणे
आठवणे, सांगणे,चिंतन आणि
मनन करावे.
सकारात्मक व्यक्तींच्या
सहवास आणि संपर्कात
राहावे.
सकारात्मक दृष्टिकोन
बाळगावा.यामुळे
आपले लक्ष
जीवनातील
सकारात्मक घटना,प्रसंग
आणि व्यक्तीच्या
सकारात्मक कृती
आणि उक्तीवर केंद्रित
होण्यास मदत होते.
परिणामी आपल्याकडून
कृती आणि उक्तीचा
आविष्कार होईल.
जसा आविष्कार
तसा जीवनाला आकार
येतो.
तुमचे व्यक्तिमत्व
सकारात्मक
बनण्यास मदत होते".
सकारात्मक कृती
आणि उक्तींची
निर्मिती व्हावे,
ह्या कृती आणि उक्तींना
बळ मिळत जावे
यासाठी
सकारात्मक स्वयंसूचना,
योगसाधना आणि
विपश्यना अतिशय
उपकारक ठरते.
महत्वाचे म्हणजे
सकारात्मक ध्येय बाळगून
त्याचं दिशेने वाटचाल
करू लागलो आपल्याला
सकारात्मक वागण्याची
सवय होऊन
जाते.
जशा सवयी
तसे व्यक्तिमत्व बनते.
एकाने प्रश्न विचारला
आपण सकारात्मक
कृती आणि उक्ती
करत असतानाही
आपल्याबद्दल
काहीजण नकारात्मक कृती
आणि उक्ती करतात
अशा वेळी काय करावे?
मी म्हणालो,
तुम्ही रस्त्याने येत
असताना
तुमचा काहीच दोष नसताना
तुमच्या दिशेने
पाहून कुत्र भुंकत असेल
तर तुम्ही काय कराल?
यावर त्यांने
दिलेले उत्तर फार
छान आहे.
तो म्हणाला
"काय कशाला
करावे?
ते त्याच्या जागी
उभे राहून भुकत
आहे.
भुंकणे हा त्याचा
स्वभाव आहे.
जगण्याचा भाग
आहे.
मालकाची रोटी
खाल्ल्यानंतर
तेवढे तर
त्याला करावे लागते.
काही माणसंदेखील
पार्ट्या खाऊ
घातल्या.
दारू पाजली.
हाटूक चघळायला
दिले की,
काही दिवस
आपले ऐकून
आपण सांगू
त्याच्या विरोधात
बोंबलात.
काही धूर्त माणसं
आपल्या सोबत
भुंकणारी कुत्रे
बाळगून जगतात.
आपण काही बोलत
नाहीत
पण त्यांनी पोसलेले
कुत्रे भुंकत राहतात.
आपण आपल्या विधायक
कामात
विधायक छंदात मग्न
राहणे अतिशय गरजेचे
असते".

पुढील भागात आणखी
काही वाचा
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव
भोपाळे
9767704604
chat.whatsapp.com/DcsDJYwQGlpDpuGLz6QMaP?mode=gi_t

1 week ago | [YT] | 2

Hanumant Bhopale

*नकारात्मक विचार बदलणे*
*गरजेचे*
*की*
*त्या विचारांचे कारण*
विचाराचा उगम
कोणत्या तरी कारणामुळे
होतो.
त्या कारणांचा शोध
घेणे आणि ती कारणे
दूर करणे आवश्यक

जे विचार आपण
मनात वारवारं साठवतो
तेच विचार आपल्याला
आठवत राहतात.
नकारात्मक विचार साठविल्यानंतर
सकारात्मक विचार थोडेच
आठवणार आहेत?
म्हणून आनंददायी
सकारात्मक आणि
प्रेरणादायी
विचारांची जाणीवपूर्वक
साठवणूक करा..
त्यामुळे नकारात्मक
विचार हळूहळू कमी
होतील..

(पुढील भागात वाचा आणखी काही?
डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
9767704604

1 week ago | [YT] | 0

Hanumant Bhopale

माणसांच्या कृती आणि उक्तीचा प्रभाव पडतोच -डॉ. हनुमंत भोपाळे,नांदेड
दिनांक २४/3/२०२६
जनमानसावर काही व्यक्तिमत्वाची विलक्षण छाप असते.याचा अर्थ त्यांना विरोध, उपेक्षा,नकार,निंदा,टीका,कटकारस्थान,असहकार्य असत
नाही असे नाही. सगळचं विष पचवत ही माणसं अखंडितपणे काम करीत असतात. मनापेक्षा, कुटंबापेक्षा ते समाजाला अधिक वेळ देतात. वेळ देणे हा सर्वाधिक मोठा त्याग असतो. कारण गेलेली वेळ परत आणता येत नाही. धन परत आणता येईल.याचा अर्थ आर्थिक योगदानाचे महत्त्व नाही, असे मात्र नाही. असे असतानाही काहीजणांना संस्था, समाजासाठी वेळ देऊन कार्य करणार्‍यांचे महत्त्व कळत नाही. त्याला काही काम नाही म्हणून वेळ देत आहे. प्रसिध्दी मिळते म्हणून वेळ देत आहे. तुम्ही द्या ना मग असे म्हणताच तेव्हाच रंग बदलतात. आम्हाला आमची काम आहेत. आम्ही रिकामटेकडे नाही आहोत. याचा अर्थ जी माणसं स्वतःच्या संसाराला, स्वतःला वेळ न देता वेळेवर जेवन घेता, जागरण करून, झोप कमी घेऊन वेळ देत असताना जवळचे माणसं उपेक्षा, टीका करतात. हे सगळ्याचं मोठ्या माणसांच्या जीवनात घडले आणि घडत आहे. याचे वाईट घेणे म्हणजे आंधळ्याला (दिव्यांग) दिसत नाही ,तो पाहत नाही,म्हणून रडण्याचा प्रकार ठरतो.
प्रत्येकजण महानतेच्या क्षमता आणि कौशल्य घेऊन जन्माला येतो, पण जननिंदा, उपेक्षा, विरोध, असहकार्य होत आहे. लोकांना आपल्या कामाची किंमत नाही. गैरसमज पसरवत आहेत. आपल्या कृती आणि उक्तीमागचा उदात्त हेतू, चांगली भावना लक्षात येत नाही. असे तो आपले दुःख बोलून दाखवतो किंवा असं वैतागून बोलावं म्हणून काही कटकारस्थानी माणसं प्रयत्नशील असतात. सहकार्य न करताच म्हणायच, 'काय त्रास बाबा तुम्हाला. किती मरमर करता. पण तुम्हाला सांगतो लोकांना तुमची, तुमच्या कार्याची किंमत नाही. वेड आहे. म्हणत आहेत. ह्या शकुनीगोड बोलण्याला जी माणसं फसतात ती माणसं स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात. काम थांबतात. काम थांबविणे यश थांबविणे होय. विरोधकांची तिच उपेक्षा असते. काम थांबले हे कळताच शकुनीच्या गुदगुल्या होतात.काम करताना ज्यावर टीका करत होते, तिच माणसं काम थांबविले की, गौरव करतात. खरं तर वांझ, निष्क्रिय माणसाच्या गौरव आणि टीकेलाही इतिहासात स्थान नसते, याची जाणीव ठेवली म्हणजे वाईट वाटत नाही.
कमी उंचीच्या माणसाला आपल्या सहवासातील माणसाची वाढत असलेली महती सहन होत नाही. दूरचे माणसं मोठी झालेली चालतात, पण जवळचा नका असा होरा अन् तोरा असतो. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज राजा होऊ नये म्हणून एतदेशीयांनी त्यांना नाना प्रकारे विरोध केला. नको त्याला उरावर बसून घेण्यात धन्यता मानणारी माणसं हितकरांचा विटाळ मानतात,यात आश्चर्य वाटायला नको!
याचा अर्थ सगळेच विरोधात असतात असे मात्र नाही.स्वहिताला तिलांजली देऊन राष्ट्रीय कार्यासाठी योगदान देणारी माणसं आहेत, होती देखील. सहकार्य करणारी माणसं शोधून, ओळखून त्यांना प्रेम, प्रोत्साहन, मानसन्मान देऊन जी माणसं सहकार्य मिळवण्यात यशस्वी होतात तिच मोठी होतात.माणसं ओळखणे आणि त्यांना त्यांची जागा देता आली पाहिजे. विवेक संपला तर माणूस माणसं, हित आणि नुकसान ओळखू शकत नाही.
तनाला सांभाळण्याच्या नादात पीक हातून जाण्याची काही जणावर वेळ येते. याचा अर्थ नको त्या महत्त्व देण्याच्या नादात हवी ती माणसं दूर जातात. असे होऊ नये , याची काळजी घेतली पाहिजे.
तुपात घोळा
साखरेत घोळा काहीजण
आपला स्वभाव सोडत नसतात
त्यांच्यासाठी आपले रथ थांबवायचे नसतात.
याची जाणीव मोठ्या माणसांना असल्यामुळे ते नजरेसमोर विरोध होत असतानाही ध्येय, कार्यावरच नजर ढळू न देता नजर लागावी, विरोधकांनी तोंडात बोट घालावं आणि समर्थकांच्या डोळ्याची पारणे फेडणारे यश मिळवतात. कुचकामी माणसांच्या कुचाळक्यानी,चाळ्याने, उपेक्षेने व्यथित न होता समाजाच्या व्यथा दूर करण्यासाठी माझाच जन्म झाला आहे. तुमच्याकडे अडविण्याची ताकद असेल पण माझ्याकडे उडून पुढे जाण्याची क्षमता आणि कौशल्य आहेत, असा प्रेरणादायी आणि प्रभावी विचार करत यशोगाथा निर्माण करणारी माणसं खरचं लोकनायक, महापुरुष असतात. अशा नायकांना जपले तरच नालायकांचे साम्राज्य प्रस्थापित होणार नाही.वेळ निघून गेल्यावर नायक गमावलो म्हणून रडगाणं बसण्याची वेळ येते. समाजासाठी लढा उपयोगी असतो असे सांगणा-याची गरज आहे ' रडा 'म्हणून सांगणा-यांची नाही. लढ्यातून इतिहास घडतात. रडण्यातून काही साध्य होत नाही. लोक रडत रडत दुःख ऐकून घेतात हसत हसत सांगत सुटतात हा लोक अनुभव आहे. याची जाणीव मोठ्या माणसांना असते म्हणून ती वेदना सहन करत समाजाला वेदनामुक्त करत वाटचाल सुरू ठेवतात. काट्याला फुल,प्रहाराला हार समजून अश्रू लपवत अविरत कार्य करणा-या माणसामुळे वैभवशाली इतिहासाची पाने लिहिण्याचे भाग्य मिळते, अशी संधी ज्या समाजाला, देशाला मिळते, तो समाज, तो देश भाग्यवान असतो. कोणताही समाज, देश दगड पुजून माणसं कुचवत ठेवल्याने मोठा होत नाही . जो देश, जो समाज मोठ्या माणसांना जपतो, सहकार्य करतो तो समाज शहाणा असतो. गारा हाती घेऊन हिरे फेकून देणारा समाज हा नेहमीच पराभूत ठरत आलेला आहे.असे होऊ यासाठी घडवण्याची आणि घडण्याची प्रक्रिया सुरू ठेवलीच पाहिजे.
घडताना अन् घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागते
भाजलेले बरं असतं
भाजल्याशिवाय सोन्यालाही मोल नसतं
यावर श्रध्दा आणि विश्वास ठेवून आत्मविश्वासाने कार्यशील राहणारी माणसं निश्चितच मोठी असतात. लायक माणसं समाजाची लायकी वाढावी म्हणून स्वहिताचा त्याग करतात. नायक कष्टाळू असतात. यातूनच नायकाचा जन्म होतो. नालायक मात्र कष्ट टाळू असतात. ते आपल्या क्षुद्र अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की व्यथित होतात.दुस-यांना व्यथित करतात. कारण त्यांचं विचार विश्व 'स्व' असते. 'स्व'वाले विश्वाचा विचार करण्याची संधीच गमावून बसतात. चांगल्या संधी गमावून बसलो याची जाणीव होते तेव्हा पश्चात्ताप करत बसणे हाती उरते. अशा माणसांवर न चिडता त्याच्या अज्ञानाची, संकुचितवृत्तीची कीव करत घडण्याची आणि घडविण्याचा वसा आणि वारसा चालवत पुढे जातात ती माणसं मोठी होतात. अंधार आहे म्हणूनच तर आपल्याला उजेड निर्माण करण्याची संधी मिळत आहे, असा सकारात्मक भाव बाळगून जगणारी माणसं असतात आणि अन् होतातही. अशा माणसांवर टीका होत असली तरीही त्यांचाच प्रभाव असतो. उजेड अंधार दूर करतो म्हणून उजेडाचा प्रभाव असतो .अंधाराचा नसतो. त्यामुळे प्रकाश होता आलं नाही तरी निदान प्रकाशाला साथ देण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे.
डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे 9767704604
hanumanthopale@gamil.com

2 weeks ago (edited) | [YT] | 0

Hanumant Bhopale

संभाव्य परिवर्तनाची तयारी केल्यास बदलाचा त्रास कमी होतो-डाॅ .हनुमंत भोपाळे
बदल, बदली, बदला हे तीन शब्द सतत उच्चारले जातात.
जीवनातील दलदल दूर करण्यासाठी योग्य बदल आवश्यक असतो. अहिंसा तत्वज्ञान,उदात्त तत्वज्ञान बदला नको बदल घडवून आणला पाहिजे यासाठी ह्रदयपरिवर्तनावर भर देते. तर बदली होऊ आणि बदली व्हावी यासाठी नोकरीत प्रयत्न होतो. कुठेही मिळाली तरी चालेल पण नोकरी मिळावी अशी जवळपास नौकरी इच्छुक व्यक्तीची अपेक्षा असते. यात काही गैर नाही. पण नोकरी म्हटले की, नको तिथे बदली, कधी कधी अतिरिक्त काम वाट्याला येते. आपल्याला जिथं बदली हवी आहे तिथे मिळाली की, शासन प्रशासन न्याय देणार आहे असे वाटते पण आपल्याला न्याय न मिळता आपल्या सहका-याला मिळाला तर आता काही खरं नाही दुनियादारी भ्रष्टाचारी झाली. ख-याची दुनिया राहिली नाही.
आता जगात काहीच खरं राहिलं नाही. आता डोंगराळ भागात नोकरी कशी करायची? माझ्यावर अन्याय केला अशाने दुनिया बुडले !अशी डोंगराळ भागात बदली झाली हे कळताच तो वैतागून म्हणाला.सोयीनुसार माणूस बोलतो, याला सोयवाद म्हणतात. हा सर्वांजवळच कमी अधिक प्रमाणात सापडू शकेल!
वेदना खूप बोलते, त्याची वेदना आतून बाहेर येत होती. तो आपलं मन मोकळं करत होता. असं मन मोकळे केले पाहिजे, अन्यथा मन-हृदयावर ताण येऊन काहीही होऊ शकते पण अशा ठिकाणी बोलले पाहिजे जिथं काही समाधान आहे. काही जण पेटवून देतात. असे करणे म्हणजे अग्नीत राॅकेल टाकण्याचा प्रकार ठरतो. तो सांगत होता. तिथे
अनंत अडचणी आहेत. शाळेला इमारत नाही. रस्ते नाहीत. लाईट नाही. लेकरासाठी इंग्लिश माध्यमाची शाळा नाही. ट्यूशनची सोय नाही. दवाखाना जवळ नाही. बाजारपेठ नाही.फोन लागत नाही. अनंत समस्या असल्याने नोकरी करणे शक्य नाही. नौकरी सोडून दिले तर बाकी काही जमेल असे वाटत नाही. काय करावं? हे चिंतेने व्यथित होऊन बोलण ऐकून वाईट वाटलं. त्या ठिकाणी आतापर्यंत कुणी तरी ड्युटी केली असेल की? सगळ्यांना
हव्या त्या ठिकाणी नेहमीच नौकरी मिळत नाही म्हणायला गेलो तर
काही जणांना मिळते सर, आमचचं नशीब फुटकं आहे. दुःख पाचवीला पुजलय! तिथं मी येत नाही. पाच मिनटही थांबू शकत नाही. पंचेचाळीस पर्यंत उन्हाचा पारा अन् त्यात लाईट बंद मग मी जगूच शकत नाही. ती एसी शिवाय जगू शकत नाही आणि मी तिच्याशिवाय.नोकरी सोडून दिलो तर ती मला सोडून देते, अशा अवस्थेत सापडलोय,अशी त्याची वेदना तो व्यक्त करत होता. परिस्थिती आणि वेदनाही खरी होती. या वेदनेवर उपाय काय ते आपण पुढच्या लेखात पाहू!
डॉ. हनुमंत भोपाळे 9767704604

2 weeks ago | [YT] | 0

Hanumant Bhopale

सत्संगाने मानसिक सुख लाभते
डॉ. हनुमंत भोपाळे
अनेक माणसं आपल्या संपर्कात असतात, जोपर्यंत त्यांच्याविषयी गोडी निर्माण होते.त्यांची ओढ निर्माण होते,मनाने जोडले जाण्यातून संबंध होतो.
संबंध जेव्हा जीवनात विधायक बदल घडवून आणत असतील तर त्याला सत्संग म्हणतात तर
विघातक परिणाम घडवून आणत असेल तो कुसंग ठरतो.
जगात ज्या चांगल्या गोष्टी घडविण्यासाठी समूह तयार होतात,हा सत्संगामुळेच.
आपल्याला कोणी तरी सांगते हे कार्य खूप छान आहे.
ही संघटना चांगली आहे.ही बाब वारंवार पटवून दिले जाते आणि आपल्या पटते तेव्हा आपण मनाने जोडलो जातो.
सत्संगासाठी मनाने,भावने , विचाराने जोडले जाणे,
समर्थन आणि समर्पित होणे आवश्यक असते.
तेल पाण्यासोबत किती वेळ ठेवलं तरी पाण्यासोबत मिसळून राहत नाही.संपर्कात दिसते, संबंध प्रस्थापित होतं नाही.
काहीजण तेलाच्या भूमिकेत वावरतात.
ज्ञानी, ध्यानी, कार्यमग्न व्यक्तीच्या संपर्कात असतात.
त्यांच्या सद्गगुणाशी जोडले जातात.
उलट या ज्ञानी माणसांचीच टिंगलटवाळी करण्यात वेळ घालवतात.काही व्याख्यानाला,किर्तनाला जातील, आपल्या चार
विकृतीची गोडी असलेले मित्रसोबत घेऊन टीका करत बसतील.यामुळे थोडा वेळ करमणूक होते
पण आत्मिक समाधान मिळत नाही.चांगलुपणाच्या निंदेने मन मलीन होते,मलीन मनाला आत्मिक समाधान लाभत नसते.
समर्पित भावनेने, पवित्र मनाने ज्ञानात सहभागी झालेल्या व्यक्तीच्या चेह-यावर एक वेगळेच समाधान दिसते तर कुटाळखोरांच्या चेह-यावर असमाधान
दिसते.'श्रध्दा लभते ज्ञान'
सत्संगाचे लाभ मिळण्यासाठी श्रध्दा आणि समर्पण आवश्यक असते.
सत्संगामुळे व्यक्ती सक्रीय होते.कार्यमग्नता वाढते.उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो.भय दूर होण्यास मदत होते.एकटेपणा दूर होतो.
ज्ञानात वाढ होते.आत्मिक समाधान तर होतेच उद्योग, व्यवसाय आणि व्यापारातही प्रगती होण्यास मदत होते. सत्संग नको त्या व्यसनापासून दूर ठेवते.
मनात सलणारं प्रश्न दूर होतात.
अनंत लाभ देणारा सत्संगात राहण्याचा निर्णय जीवनातील सगळ्यात चांगला निर्णय ठरतो.

डॉ हनुमंत मारोतीराव भोपाळे

2 weeks ago | [YT] | 0

Hanumant Bhopale

सत्संगाने मानसिक सुख लाभते
डॉ. हनुमंत भोपाळे
अनेक माणसं आपल्या संपर्कात असतात, जोपर्यंत त्यांच्याविषयी गोडी निर्माण होते.त्यांची ओढ निर्माण होते,मनाने जोडले जाण्यातून संबंध होतो.
संबंध जेव्हा जीवनात विधायक बदल घडवून आणत असतील तर त्याला सत्संग म्हणतात तर
विघातक परिणाम घडवून आणत असेल तो कुसंग ठरतो.
जगात ज्या चांगल्या गोष्टी घडविण्यासाठी समूह तयार होतात,हा सत्संगामुळेच.
आपल्याला कोणी तरी सांगते हे कार्य खूप छान आहे.
ही संघटना चांगली आहे.ही बाब वारंवार पटवून दिले जाते आणि आपल्या पटते तेव्हा आपण मनाने जोडलो जातो.
सत्संगासाठी मनाने,भावने , विचाराने जोडले जाणे,
समर्थन आणि समर्पित होणे आवश्यक असते.
तेल पाण्यासोबत किती वेळ ठेवलं तरी पाण्यासोबत मिसळून राहत नाही.संपर्कात दिसते, संबंध प्रस्थापित होतं नाही.
काहीजण तेलाच्या भूमिकेत वावरतात.
ज्ञानी, ध्यानी, कार्यमग्न व्यक्तीच्या संपर्कात असतात.
त्यांच्या सद्गगुणाशी जोडले जातात.
उलट या ज्ञानी माणसांचीच टिंगलटवाळी करण्यात वेळ घालवतात.काही व्याख्यानाला,किर्तनाला जातील, आपल्या चार
विकृतीची गोडी असलेले मित्रसोबत घेऊन टीका करत बसतील.यामुळे थोडा वेळ करमणूक होते
पण आत्मिक समाधान मिळत नाही.चांगलुपणाच्या निंदेने मन मलीन होते,मलीन मनाला आत्मिक समाधान लाभत नसते.
समर्पित भावनेने, पवित्र मनाने ज्ञानात सहभागी झालेल्या व्यक्तीच्या चेह-यावर एक वेगळेच समाधान दिसते तर कुटाळखोरांच्या चेह-यावर असमाधान
दिसते.'श्रध्दा लभते ज्ञान'
सत्संगाचे लाभ मिळण्यासाठी श्रध्दा आणि समर्पण आवश्यक असते.
सत्संगामुळे व्यक्ती सक्रीय होते.कार्यमग्नता वाढते.उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो.भय दूर होण्यास मदत होते.एकटेपणा दूर होतो.
ज्ञानात वाढ होते.आत्मिक समाधान तर होतेच उद्योग, व्यवसाय आणि व्यापारातही प्रगती होण्यास मदत होते. सत्संग नको त्या व्यसनापासून दूर ठेवते.
मनात सलणारं प्रश्न दूर होतात.
अनंत लाभ देणारा सत्संगात राहण्याचा निर्णय जीवनातील सगळ्यात चांगला निर्णय ठरतो.

डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे

2 weeks ago | [YT] | 0

Hanumant Bhopale

यश*
*तुमची वाट*
*पाहत आहे*..
प्रो.डॉ.हनुमंत भोपाळे

यश
तुमची वाट
पाहत आहे..
तुम्हाला
त्याच्या
दिशेने
प्रतिकूलतेचे
घाव सहन
करत धावावे
लागेल..
यशाचेच
गीत गावे लागेल..
असाध्य
वाटणारी
गोष्ट
अभ्यासाने
प्रयासाने
साध्य होईलच..
संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे असाध्य ते साध्य| करीता
सायास |
कारण अभ्यास तुका म्हणे|
ओले मूळ भेदी खडकाचे अंग | अभ्यासाशी सांग कार्यसिध्दी
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ |

साहित्यसम्राट
अण्णा भाऊ
साठे यांनी
सांगितले..
मला लढा
मान्य आहे.
रडगाणे
नाही..
शिका
संघटित व्हा
आणि संघर्ष
करा..
असा मूलमंत्र
महामानव बाबासाहेबांनी
दिला...

अडचणी, समस्या ,अडथळे आणि
नकारात्मक लोकांवर
मात कशी करावी ?
करणे शक्य नाही..
तसा प्रयत्न केल्यास
वेदना,दुःख ,संकट ,अपमानाना
समोर जावे लागेल..
अशी भीती वाटून
गर्भगळीत होऊन
थांबणे हे आत्मघातकी
धोरण ठरेल...

अडचणी, समस्या ,अडथळे आणि
नकारात्मक लोकं
हे संकट नाही तर संधी
आहे..
या संधीचे सोने करणे
म्हणजे
इतिहास निर्माण
करणे होय.
व्यथेवर मात करता
आले..
व्यथेच्या रंगमंचावर
संकटरूपी रणांगणावर
इतिहास घडतो..
प्रेरणेचा विषय होता
येतो..
सर्वत्र अंधार दिसताना उजेड हाती नाही असं वाटत असताना स्वतःलाच उजेड बनावं लागेल.
तथागत गौतम बुद्धांचा
अत दीप भव हा मंत्र कायम सोबत ठेवावा लागेल.
प्रतिकूल परिस्थिताला
अनुकूल करण्यासाठी
मनाला तयार करणे...
बुद्धिला धार लावणे..
प्राप्त परिस्थितीत
जे जे उपलब्ध
आहे त्याचा उपयोग
करून
नकारात्मक परिस्थितीचे
सकारात्मक परिस्थितीत
रूपांतर करण्यासाठी
सिध्द होऊन
वा-यासारखं
धावावे लागेल.
अडवणारे येथील तेव्हा उडण्याची ही तयारी ठेवावी लागेल.
कावळे वाट अडवतात तेव्हा घार उंच उडून पुढे जाते जिथे कावळे पोहोचणार नाहीत तिथून तिला वाटचाल करते.
तुम्हालाही वाटेत येणाऱ्या कावळ्यांना बाजूला करावं लागेल त्यासाठी त्यांच्यापेक्षा तुम्हाला तुमची शक्ती तुमच्या शहाणपण तुमचे कौशल्य वाढवावे लागेल .
उंची वाढत गेली की,
खुजे आपोआप मागे पडत जातात.

मला माहिती आहे
अशा परिस्थितीला
हाताळताना त्रास होणार
आहे...
लाभार्थीही असहकार
करतील.
वाट अडवायला
तयार होतील.
कधी कधी
समोर येतील..
जवळचे दूर जातील..
वेदनेवर मीठ टाकत राहतील.
तुमच्या वेदनेकडे तमाशा पाहव
तसं ते पाहत राहतील.

तुमच्या उदात्त
ध्येयाला प्रत्यक्षात
आणण्यासाठी
सहकार्य करण्याऐवजी
ते तुमचे उदात्त
ध्येय पायदळी
तुडवण्यासाठी
नक्कीच ते वेळ
देतील..
जसे
नकट्याना आरशाचा
त्रास होत असतो तसे संकुचित ध्येयाने झपाटलेल्यांना
उदात्त ध्येय
आणि ध्येयवादी
सहन होत नाहीत..
ते तुम्हाला
अडवतील.
तुमच्या दुःखात भर
घालतील..
तुम्हाला उदात्त
उन्नत ध्येयापासून
दूर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील..
तेव्हाही तुमचे उदात्त
ध्येय सोडू नको...
तुमचा संयम ढळू
देऊ नका.
आत्मविश्वास, उत्साह
आणि तुमची उदात्त
सकारात्मक ध्येयनिष्ठा
आणि कार्यनिष्ठेपासून
तसूभरही बाजूला सरकू
नका...
तुम्ही बाजूला गेलात
तुमचे ध्येय बाजेवर
जाते..
बाजूला पडते...
उदात्त ध्येयाला
सोडलेली
बाजूला पडलेली
माणसं इतिहासाच्या
पानात आणि जनतेच्या
मनात स्थान
निर्माण करू
शकत नाहीत...
रडण्यात पुरूषार्थ
नसतो तर लढण्यात पुरूषार्थ
असतो..
व्यथा सांगत बसल्याने
प्रेरणादायी कथा निर्माण
होत नसतात.
व्यथा सहन
करत प्रेरणादायी
कथा निर्माणच
कराव्या लागतील.
प्रेरणादायी सत्यकथा निर्माण
करताना अडचणी, समस्या ,अडथळे आणि
नकारात्मक लोकांवर
विजय संपादन
करावा लागतो...
खरतर यशाचा मार्ग
कधीही आणि कोणाचाही
खडतरच असतो...
खडतर ,काटेरी
मार्गावरून
चालून
संकटावर
चाल करून
ध्येयाच्या दिशेने
धावावेच लागेल.
असे धावताना
विरोधकांच्या
डोळ्यांत
सलाल ..
त्यांना सहन
होणार नाही..
धावताना
त्यांचे वेदनारूपी
घाव बसतील.
वाटेत
उदास, निराश
करणारी
भयभीत
करणारी
गावे येतील..
ऐनकेन प्रकारे
तुम्हाला अडविण्याचे
प्रयत्न होतील..
तुम्हाला
घडत
आणि घडवत
पुढे जावे..
तुमच्या आत्मविश्वासाला
मारून
टाकण्याचे प्रयत्न
होतील.
हे सगळं
जिरवून
तुम्हाला तुमची
दुर्दम्य इच्छाशक्ती
कायम ठेवत
ध्येयनिष्ठा
आणि कार्यनिष्ठा
जिवंतच
नाही तर
ज्वलंत ठेवावी
लागेल..
तेव्हा कुठे तुम्ही
यशाचे ,पराक्रमाचे
ज्वलंत आणि प्रेरणादायी
उदाहरण बनाल...
बनवाबनवी
थुका पालिश
करणारी
जादूगार
होतील
पण
तुमच्यासारखे
यशाचे शिल्पकार
होऊ शकत
नाहीत.
कुत्रिम फुलं
ख-या फुलासारखे
दिसतील
पण असू
शकत नाहीत..
रंगाचा आव
आणता येईल
खरा सुंगध
कसा देता
येईल..
आडात
नसेल तर
पोह-यात
कोठून येईल..
खोटे
खरे म्हणून
थोडा वेळ
नाचेल.
सत्याच्या सामर्थ्यांसमोर
वाचू शकत नाही..
लक्षात ठेवा..
घडताना आणि घडवताना
खूप काही भोगाव लागत.
कधी कधी भाकरी सारखं तव्यावर भाजावं लागतं
भाजलेलं बरं असतं .
भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं.
वेदनेशिवाय यशरूपी
वेद निर्माण होत नाहीत..
याची जाणीव
ठेवून
वेदना होतानाही
तुम्हाला परिश्रम
घ्यावेच लागेल.
चांगुलपणा कायम
ठेवून
ध्येयनिष्ठ
वाटचाल
तुम्हाला
नायक बनेल..
विघातक,बेकायदेशीर
मार्गाने कुणी
माया जमवतील.
पण ते एकेदिवशी खलनायक ठरतील.
इतिहास त्यांची
नोंद खलनायक
करत असते..
बेकायदेशीर मार्ग प्रश्चातापकारक
ठरेल..
चुकूनही या मार्गाचा
अवलंब करू नका..
विधायक मार्ग सोडू
नका..
विधायक मार्गावर
चालताना
सुरूवातीला
पायघड्या नसतीलही..
वेदनेचा वेढा
असेल..
तरी पण
चालत रहा
अखंडितपणे
उदात्त ध्येयाच्या
दिशेने ...
आज कदाचित
अंधार दिसेल
आधार नसेल.
आज तुमचा
नसेलही
पण उद्या तुमचाच
असेल..
रात्रीच्या गर्भात
उद्याचा उषःकाल
वास करत असतो.
उजेडाला सोबत
ठेवा
अंधार दूर जाईलच..
अखंडित परिश्रमाला
यशाची फळे येतीलच.
पेरणी करण्याच्या
आयुष्यात रास करण्याचे
भाग्य असतेच..
सकारात्मक
विचाराने भरून
भारावून
जगा
म्हणजे उदासिनता
जवळ फिरकणार
नाही...
लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती|

सत्यमेव जयते...

खदा के घर में देर
है लेकिन अंधेर नहीं !
पेरा म्हणजे उगवेल..
चाला म्हणजे
प्रवास होईलच.
अशा प्रेरणादायी
विचाराला सोबत
घेऊन अखंडितपणे
यशोसाधना करत
वाटचाल
करा
यशरूपी मुक्काम
येईल..
यशासाठी
माझ्या हार्दिक
शुभेच्छा !

प्रो. डॉ.हनुमंत मारोतीराव
भोपाळे
9767704604

2 weeks ago | [YT] | 1