DD Sahyadri News 

Official YouTube channel of DD Sahyadri News.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.


DD Sahyadri News

"ईशान्य भारतात शांतता क्रांती!"

दशकांपासून प्रलंबित राहिलेले गुंतागुंतीचे वाद आता इतिहास जमा होत आहेत. केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आसाम-मेघालय सीमाविवाद आणि बंडखोर संघटनांसोबतचे शांतता करार यशस्वी झाले आहेत. संवादाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या ऐतिहासिक शांततेमुळे 'नॉर्थ ईस्ट' आता प्रगतीचे नवे 'पॉवरहाऊस' बनत आहे.

#12YearsOfRisingNorthEast

6 days ago | [YT] | 63

DD Sahyadri News

ईशान्य भारतातून ऐतिहासिक आणि अत्यंत दिलासादायक बातमी! केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे २०२६ मध्ये मिझोरम अधिकृतपणे पूर्णपणे बंडखोरीमुक्त झाले आहे.

बंडखोरीच्या घटनांमध्ये ८२% आणि नागरी मृत्यूंमध्ये ९७% ची विक्रमी घट झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांतता आणि सुरक्षिततेच्या धोरणामुळे 'नॉर्थ ईस्ट' आता प्रगतीचे नवे केंद्र बनले आहे.

#12YearsOfRisingNorthEast

6 days ago | [YT] | 24

DD Sahyadri News

ईशान्य भारताच्या प्रगतीचे एक यशस्वी दशक!

केंद्र सरकारच्या विशेष धोरणांमुळे ईशान्येकडील राज्यांचा चेहरामोहरा बदलला आहे. दळणवळणाच्या क्रांतीपासून ते आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबनापर्यंत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'ॲक्ट ईस्ट' (Act East) धोरणाने या भागाला देशाच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन बनवले आहे.

#12YearsOfProgress #ActEastPolicy #NorthEastTransformation

6 days ago | [YT] | 59

DD Sahyadri News

💎 भारताच्या रत्ने व आभूषणे निर्यातीत मे महिन्यात ६.६६% ची लक्षणीय वाढ; निर्यात पोहचली २.५३ अब्ज डॉलर्सवर!

जागतिक बाजारपेठेतील सातत्यपूर्ण मागणीमुळे भारताच्या 'Gems & Jewellery' क्षेत्राची कामगिरी उंचावली आहे.

भारतीय कारागिरीचा समृद्ध वारसा, आधुनिक डिझाईन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे हे क्षेत्र भारताच्या एकूण निर्यातीचा एक मजबूत स्तंभ ठरत आहे. 🇮🇳✨

#IndiaExports #GemsAndJewellery #ExportGrowth #EconomicUpdate #MakeInIndia #DDSahyadri

1 week ago (edited) | [YT] | 49

DD Sahyadri News

क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात भारताने लक्षणीय प्रगती साधली आहे. देशातील क्षयरोगाचा प्रादुर्भाव दर 1 लाख लोकसंख्येमागे 237 रुग्णांवरून 187 रुग्णांपर्यंत कमी झाला आहे. सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा, रोगाचे लवकर निदान आणि लोकसहभाग यांमुळे हे यश शक्य झाले आहे.

#12YearsOfSwasthBharat

1 week ago | [YT] | 20

DD Sahyadri News

2014 मध्ये भारतात केवळ 8 एम्स संस्था होत्या. आज ही संख्या वाढून 23 झाली आहे. एकेकाळी मोजक्या ठिकाणी मर्यादित असलेली ही आरोग्यसेवा व्यवस्था आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत असून, जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देत आहे.

#12YearsOfSwasthBharat

1 week ago | [YT] | 27

DD Sahyadri News

गेल्या दशकात भारताच्या आरोग्यसेवा क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 मधील 842वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत आज त्यांची संख्या 2100 हून अधिक झाली आहे.यामुळे हजारो होतकरू डॉक्टरांसाठी संधी निर्माण झाल्या असून,देशभरातील आरोग्यसेवा अधिक बळकट आणि सुलभ झाली आहे.

#12YearsOfSwasthBharat

1 week ago | [YT] | 34

DD Sahyadri News

भारताने महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यावर काय बदलले?

पिढ्यानपिढ्या भारतीय महिलांनी कुटुंबे घडवली, समाजाला बळ दिले आणि राष्ट्राच्या प्रगतीची स्वप्ने जपली. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या स्वप्नांना नवी संधी, नवे सामर्थ्य आणि नवी दिशा मिळाली.

बँक खात्यांपासून उद्योजकतेपर्यंत, शिक्षणापासून नेतृत्वापर्यंत, आरोग्यापासून सशस्त्र दलांपर्यंत नारीशक्ती आज भारताच्या विकासयात्रेचे नेतृत्व करत आहे.

#12YearsOfNariShakti #NariShakti

2 weeks ago | [YT] | 58

DD Sahyadri News

पिढ्यानपिढ्या ग्रामीण भारतातील महिलांचा दिवस पाणी आणण्यातच जात होता. आज, जवळपास १६ कोटी नळजोडण्यांमुळे लाखो महिलांच्या आयुष्यात बदल घडला आहे. त्यांना मिळाला आहे अमूल्य वेळ — शिक्षणासाठी, उपजीविकेसाठी, उद्योजकतेसाठी आणि कुटुंबासाठी.

#12YearsOfNariShakti #JalJeevanMission #WomenEmpowerment

2 weeks ago | [YT] | 44

DD Sahyadri News

महिलांसाठी सर्वात मोठा परिवर्तनकारी बदल स्वच्छतेच्या क्षेत्रात झाला आहे. २०१४ मध्ये लाखो लोकांसाठी शौचालयांची उपलब्धता ही एक गंभीर समस्या होती. आज, जवळपास सार्वत्रिक शौचालय सुविधेमुळे ग्रामीण भारतातील महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि आरोग्य अधिक बळकट झाले आहे.

#12YearsOfNariShakti

2 weeks ago | [YT] | 17