सामाजिक राजकीय कला क्रीडा साहित्य सर्व क्षेत्रातील बातम्यांच हक्काचे न्यूज चैनल म्हणजे एम एस न्यूज.


M.S.NEWS.

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन


धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची भक्कम पायाभरणी केली. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक ज्ञानासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत समाजप्रबोधनाचे कार्य केले.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस वरिष्ठ लिपिक नंदू पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वरिष्ठ लिपिक आशा बंडगर, कनिष्ठ लिपिक चित्रा घोडके, वाहन चालक मोहन कोळी तसेच दप्तरी अनिल वाघमारे आदी उपस्थित होते.

              

12 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी
शिबीराचे यशस्वी आयोजन करावे - पुजार

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने आयोजित कायदे विषयक जनजागृती शिबीरात प्रत्येक विभागाने आपल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणारे बॅनर्स, फ्लेक्स, पॅम्प्लेट्स आदींसह स्वतंत्र स्टॉल उभारावेत, असे निर्देश किर्ती किरण पुजार यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी दिले.

विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवरील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी १ मार्च रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पूर्वनियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.बैठकीस जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडिअम येथे विधी सेवा प्राधिकरणाकडून स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून कार्यक्रमाच्या प्रभावी समन्वयासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे पुजार यांनी स्पष्ट केले. याशिवाय रक्तदान शिबीर व कर्करोग तपासणीसाठी मोबाईल मेडिकल व्हॅनची व्यवस्था, दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वितरण, कृषी विभागामार्फत विविध अवजारांचे वाटप, समाज कल्याण विभागातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विविध विभागांच्या ऑनलाईन योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तर कडवकर यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना शिबीराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, कळंब, उपविभागीय अधिकारी, भूम उपविभागीय अधिकारी, उमरगा;तहसिलदार, उमरगा प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग, सोलापूर व गट विकास अधिकारी, लोहारा आदी अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

12 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

तुळजापूर तीर्थक्षेत्र स्वप्नपूर्तीच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल - आ. पाटील 


धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना आता जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत ४३८ कोटी ६९ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा प्रकल्प म्हणजे तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल आहे. हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.


महायुती सरकारने तुळजापूरच्या विकासासाठी एकूण १८६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार या निविदेतील कामात प्रामुख्याने भाविकांच्या मूलभूत गरजा आणि आधुनिक सोयीसुविधांवर भर देण्यात आला आहे. हुडको एसटी स्टँड, आराधवाडी आणि घाटशीळ परिसरात मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक भाविक सुविधा केंद्र, भव्य भक्त निवास, व्यावसायिक संकुल, मल्टीपर्पज हॉल आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्थेचा समावेश असणार आहे. ही सर्व कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, इच्छुक कंत्राटदारांना २ मार्च २०२६ पर्यंत निविदा सादर करता येणार असल्याचे आ पाटील यांनी सांगितले आहे. हा विकास आराखडा राबवताना स्थानिक नागरिक आणि पुजारी यांना विश्वासात घेण्यात आले आहे. भूसंपादनासाठी प्रचलित दरापेक्षा कितीतरी पटीने अधिक मोबदला दिला जाणार असून, एकूण निधीतील ३० टक्के रक्कम केवळ भूसंपादनासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे केवळ पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक तरुणांना शाश्वत रोजगार मिळण्यासही मोठी मदत होणार असल्याचे आ पाटील यांनी नमूद केले आहे.
येणाऱ्या काळात तुळजापूरच्या वैभवात भर टाकणारे काही विशेष प्रकल्प साकारले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना देवी आशीर्वाद देत असतानाचे भव्य १०८ फूट उंचीचे शिवभवानी शिल्प, रामदरा तलाव परिसरात भव्य उद्यान, साऊंड एण्ड लाईट शो आणि वॉटर फ्रंटची कामे हाती घेण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरचा कायापालट करण्याचे आपण पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. मार्च २०२८ पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दर १५ दिवसांनी या कामाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासकीय स्तरावरही या कामाला आता मोठी गती मिळाली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

12 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

लाडक्या बहिणींच्या अर्जातील​ त्रुटी मिशन मोडवर दूर करा - आ पाटील


​धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बहिणीला मिळालाच पाहिजे, त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला 'मिशन मोड'वर लाडक्या बहिणींच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली ३८ हजार ८११ बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आ राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.



जिल्ह्यात मोठ्या संख्येने महिलांनी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, तब्बल ३८ हजार ८११ अर्जांमध्ये माहिती भरताना चुका झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पर्यायाने त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. हक्काच्या आर्थिक मदतीपासून लाडक्या बहिणी वंचित राहू नयेत. यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्याबाबत आ पाटील यांनी निर्देश दिले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांना हे प्रकरण प्राधान्याने हाताळण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेतली असून, उद्या या संबंधित सर्व यंत्रणांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील अनेक महिला केवळ तांत्रिक कारणास्तव योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, हे चिंताजनक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. तसेच महिलांनीही आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपले ई-केवायसी अपडेट करून घ्यावे, असे आवाहन आ पाटील यांनी केले आहे.

12 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

व्यावसायिक हुरडा पार्ट्यांच्या गर्दीत ग्रामीण भागात अजूनही जपली जाते माणुसकीची परंपरा

मुरूम दि.२० (प्रतिनिधी) - शहरी भागात हुरडा पार्ट्यांचे व्यवसायिकीकरण झालेले असताना ग्रामीण भागात पारंपारिक हुरडा पार्ट्यांवर शेतकरी बांधव देखील भर देताना दिसत आहे. महाराष्ट्रासह सीमावर्ती ग्रामीण भागात हिवाळ्यात रंगणाऱ्या हुरडा पार्ट्यांचा उत्साह यंदाही ओसंडून वाहताना आहे.
उमरगा तालुक्यातील बिराजदार वस्तीतील कलाप्पा पाटील यांनी आपल्या मित्र परिवाराला एकत्रित आणून शेतात हुरडा पार्टी मोठ्या उत्साहात केली. शहरातील लोकांना शेतीची ओळख व्हावी, ग्रामीण परंपरा जपल्या जाव्यात, नवीन पिढीला शेती संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी या अनोख्या पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते. रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, संतोष कांबळे, उपप्राचार्य कलय्या स्वामी, मल्लिकार्जुन बदोले, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार वाकडे, प्रा. भूषण पाताळे, शरणाप्पा धुम्मा, सहशिक्षक नागनाथ बदोले आदींनी याचा आस्वाद घेतला. हुरडा म्हणजे ज्वारीच्या कोवळ्या कणसांना शेतातल्या चुलीवर भाजून थेट ताटात तयार केलेला पारंपरिक खाद्य पदार्थ. शेतातच कणसे भाजून त्यासोबत लसूण चटणी, शेंगदाण्याची चटणी, गूळ, चिवडा, खारमुरे, पेंड खजूर, उसाचा रस यांचा आस्वाद घेण्याची खास मेजवानी ठेवण्यात आली होती. ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने चुली पेटवून हुरडा तयार करण्यात आला. यावेळी शेतकरी विठ्ठल कुडवकल, सुनील कुडवकल यांनी हुरडा परंपरेचे महत्त्व सांगितले. हुरडा पार्टी ही केवळ खाद्य मेजवानी नसून शेतकरी संस्कृतीचा एक उत्सव आहे. निसर्गाशी नाते जपण्याचा हा एक सुंदर मार्ग असून हा गावरान मेवा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी साऊंड सिस्टिम लावून वातावरण निर्मिती करून लोकगीतांचे सादरीकरण, पारंपरिक खेळांचे आयोजन, मनोरंजनात्मक विषयांवर चर्चा घडवून आल्या. हुरडा पार्टीच्या उत्साहात रसवंती चालक महादेव मुळे, नरसप्पा पाटील, मल्लिनाथ पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन आपुलकीने खाऊ घालण्यावर भर दिला. यामुळे आलेल्या सर्वांनाच आपल्या भारतीय परंपरेचे दर्शन दिसून आले.

12 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

भगतवाडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांचा लाखोंचा भ्रष्टाचार

भ्रष्टाचाराऱ्यांवर कारवाई न केल्यास उपोषण

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - उमरगा तालुक्यातील भगतवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून संबंधितांकडून वसुली करावी असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. मात्र आदेश देऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संबंधितावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे कारवाई न केल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मनोबल वाढून पुन्हा नव्याने भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत संबंधितावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा दि.२६ फेब्रुवारीपासून जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा बलभीम इर्ले व सुभाष वाघमोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.२० फेब्रुवारी रोजी दिला आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उमरगा तालुक्यातील भगतवाडी, कोळेवाडी व चिरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भगतवाडी येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालय मंजूर होते. ते गावालगत किंवा बाहेरील बाजूस बांधणी अपेक्षित होते. या संदर्भात कोणालाही न विचारता मनमानीपणे ते चक्क जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बांधलेले आहे. ते शौचालय बांधण्याची परवानगी कोणी दिली ? त्यामुळे त्याचा सार्वजनिकरित्या वापर करता येत नाही. तर गावामध्ये गटार बांधली गेली त्याचे अर्धवटच काम केले असून ती किती मीटर लांबीमध्ये बांधायचे होते किंवा त्यासाठी किती बजेटची तरतूद करण्यात आली ? याची चौकशी करण्यात यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या म्हणून शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढले व विहिरी खोदल्या. मात्र, रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी एकाही शेतकऱ्याचे कुठलेही बिल काढलेले नाही त्याची चौकशी करावी. तर अटल भूजल स्पर्धेमध्ये भगतवाडी, कोळेवाडी व चिरेवाडी या गावास मिळालेली २० लाख रुपयांची बक्षीस रक्कम सरपंच व ग्रामसेवक यांनी त्याची मनमानीपणे कुठे उधळपट्टी केली ? त्याची चौकशी करावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाखो रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवले असून ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याच्याखाली गच्चीकरण न करता फक्त डस्ट पसरवून ब्लॉक सेट केलेले असून त्या कामाची चौकशी करावी. गावासाठी खरेदी केलेल्या वस्तू ते दोघे दाखवीत नाहीत. शेतकरी सहलीवर देखील खर्च दाखवले आहेत त्याचीही चौकशी करावी. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०१५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चक्क २६ लाख ५०४ रुपये निधी खर्च केला आहे त्याची चौकशी करावी. तसेच दिनांक 9 फेब्रुवारी पासून ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासकाची नेमणूक होणार असल्याचे समजतात सरपंच व ग्रामसेवक यांनी दि.५ व ६ २०२६ या दोन दिवसांमध्ये ६ लाख २२ हजार ७०६ रुपये बँकेतून नियमबाह्य काढलेले आहेत. मात्र सामान आणलेले नाही. त्यामुळे त्याची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक या दोन्ही दोषींवर कारवाई करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारवाई करण्यास टाळाटाळ केली तर ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावर बलभीम इर्ले, सुभाष वाघमोडे, भगवान पालमपल्ले, ज्ञानेश्वर पालमपल्ले, वंदना इर्ले व मंगलबाई नंजारे यांच्या सह्या आहेत.

12 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

सेवानिवृत्त मुजोर पोलीस अधिकाऱ्याची महिलेस मारहाण !

कारवाई करण्यास नळदुर्ग पोलिसांची टाळाटाळ ?

न्यायासाठी अबलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव

तुळजापूर तालुक्यातील चिकणी तांडा येथील घटना

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - पोलीस वर्दी अंगावर असताना महिलेला मारहाण तर केलीच. मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्या वर्दीचा अहंपणाची मानसिकता गेलेली नसल्यामुळे पुन्हा त्या महिलेला एकटे गाठून त्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईकांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दि.१५ फेब्रुवारी रोजी बेदम मारहाण केली. तसेच तुला खल्लास करून टाकतो अशी धमकी देत लाकडे व कुऱ्हाडी घेऊन अंगावर येत आहेत. याची तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन केली. मात्र, त्या पोलिसांशी संगणमत करून संबंधित बीट अंमलदार व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी तक्रार घेणे तर सोडाच साधी विचारपूस देखील केली नाही. उलट, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्या महिलेला पोलीस ठाण्यातून हाकलून देण्याचे काम केले. त्यामुळे त्या पिडीत महिलेने घटनेच्या पाचव्या दिवशी आपल्या मुलासह पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची भेट घेऊन आपबिती कथन केली. यावेळी खोखर यांनी संबंधित महिलेला न्याय देऊ असा धीर दि.२० फेब्रुवारी रोजी दिला. तुळजापूर तालुक्यातील चिकणी तांडा येथे बेबी विनायक राठोड या नवरा व मुलांसोबत गेल्या ७ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, तेथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी खुबा निलाप्पा चव्हाण, सागर खुबा चव्हाण, शारदाबाई खुबा चव्हाण, राजू निलप्पा चव्हाण व रमेश निलाप्पा चव्हाण यांनी त्या घरी एकटी असताना दि‌.१५ फेब्रुवारी रोजी नाहक त्रास देऊन अंगावरील कपडे वाडीत, पोटावर व नदीवर पाय देत मारहाण केली. त्यामुळे राठोड यांनी नळदूर्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या. मात्र, आजपर्यंत त्यांची तक्रार घेतली नाही किंवा संबंधितांना साधी विचारणा देखील केली नाही. तसेच संबंधित चव्हाण यांच्यासह परीवारांकडून सतत मारहाण करण्यात येत असून तुला खल्लास करून टाकतो अशा धमक्या देत आहेत. तसेच लाकडे व कुऱ्हाड घेऊन अंगावर येत आहेत. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतू, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून संगणमताने तक्रार नोंदवून घेऊ देत नसल्याचा गंभीर आरोपही केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच महिलेला होत असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी राठोड यांनी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक महिला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महिला असताना देखील जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे प्रमुख महिलांना न्याय देण्यासाठी कारवाई का करीत नाहीत ? त्यामुळे पोलीस अधीक्षक खोखर या प्रकरणी न्याय देतात की नाही ? याकडे लक्ष लागले आहे.महिलेने यापूर्वी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता, तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचा दावा केला आहे. ओळखी व प्रभावामुळे तक्रार नोंदवली जात नसल्याचेही त्यांनी अर्जात म्हटले आहे. याशिवाय, बीट अंमलदारांवरही तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व होत असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी अर्जदार महिलेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पोलीस विभागाकडून याबाबत पुढील कार्यवाहीची प्रतीक्षा आहे.विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक महिला अतिरिक्त पोलीस अधीक्षक महिला असताना देखील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमुख महिलांना न्याय देण्यासाठी भूमिका घेत असल्यामुळे महिलांना न्याय मिळेल का नाही ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

12 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

ॲड. गुंड, काळे, घोलप, पवार, सुर्यवंशी, सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने ॲड. गुंड, काळे, घोलप, पवार, सुर्यवंशी, सोनवणे यांचा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पुरस्कार समितीचे समन्वयक गणेश शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने दि.१९ फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले.

धाराशिव शहरातील पवन राजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड.व्यंकटराव गुंड, कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील व सध्या पुणे स्थित असलेले सतिश काळे, वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील विजयकुमार घोलप, लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील गोविंद पवार, उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील अस्मिता सुर्यवंशी व धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. नितीन गरड, जगदीश शिंदे, संपादक राजेंद्र बहिरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्यासह इतरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

13 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

ॲड. गुंड, काळे, घोलप, पवार, सुर्यवंशी, सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने ॲड. गुंड, काळे, घोलप, पवार, सुर्यवंशी, सोनवणे यांचा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पुरस्कार समितीचे समन्वयक गणेश शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने दि.१९ फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले.

धाराशिव शहरातील पवन राजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड.व्यंकटराव गुंड, कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील व सध्या पुणे स्थित असलेले सतिश काळे, वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील विजयकुमार घोलप, लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील गोविंद पवार, उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील अस्मिता सुर्यवंशी व धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. नितीन गरड, जगदीश शिंदे, संपादक राजेंद्र बहिरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्यासह इतरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

13 hours ago | [YT] | 0

M.S.NEWS.

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित

धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पुरस्कार समितीचे समन्वयक गणेश शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने दि.१९ फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले.

धाराशिव शहरातील पवन राजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. या सोहळ्यास नितीन गरड, जगदीश शिंदे, संपादक राजेंद्र बहिरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्यासह इतरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

13 hours ago | [YT] | 0