दोन लाखांपर्यंतच्या सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार!
राज्यातील २ लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार असून, कर्जमाफी पूर्ण होताच शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार पात्र खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, राष्ट्रीयकृत बँकांमधील ई-केवायसी व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना खताचा कोणताही तुटवडा भासणार नाही. राज्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घेत ८५ कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. संबंधित कंपन्यांना बियाणे बदलून देण्याबरोबरच नुकसानभरपाईबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे.
यंदा राज्यात ४५.१० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कार्यरत आहेत. तसेच राज्यात ८४ टक्क्यांहून अधिक खरीप पेरणी पूर्ण झाली असून, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या योजना, मदत आणि सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सातत्याने कार्यरत आहे.
गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी प्रेरणाशक्ती.
ज्यांच्या संस्कारांनी विचार समृद्ध होतात, ज्यांच्या मार्गदर्शनाने आयुष्याला नवी दिशा मिळते आणि ज्यांच्या आशीर्वादाने यशाचा मार्ग सुकर होतो, त्या सर्व गुरुजनांप्रती आज कृतज्ञतेने नतमस्तक होऊया.
सर्वांना पवित्र गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय : महाअॅग्री एआय धोरणाला नवी गती
📍 मंत्रालय, मुंबई | मंगळवार दि. २८ जुलै २०२६
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कृषी क्षेत्र अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महाअॅग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व अॅग्रोटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील 'व्यवस्थापकीय संचालक' पदास मान्यता देण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मोठी मदत होणार आहे.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि उत्पादनवाढ या उद्देशाने राज्य शासनाने राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धा २०२६-२७ जाहीर केली आहे.
यंदा प्रथमच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांचा स्पर्धेत समावेश आहे.
तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा होणार असून राज्यस्तरावर ५०,०००रु पर्यंत रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
अर्जाची अंतिम मुदत : मूग व उडीद - ३१ जुलै २०२६ इतर पिके - ३१ ऑगस्ट २०२६
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करून या स्पर्धेत सहभागी व्हावे हे नम्र आवाहन.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ऑनलाईन व्हीसीद्वारे आढावा बैठक संपन्न झाली
राज्यातील कृषी शिक्षण, कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकरी-केंद्रित संशोधन आणि कृषी विद्यापीठांच्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी संशोधन अधिक परिणामकारक ठरणे, नव्या तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होणे आणि कृषी शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आणखी एक आनंदाची बातमी!
राष्ट्रीय कृषी विकास योजना (PM-RKVY) अंतर्गत केंद्र शासनाकडून दुसरा हप्ता म्हणून ३३५ कोटींचा केंद्र सरकारचा हिस्सा महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे. यात राज्य शासनाचा ४०% पूरक हिस्सा म्हणजे २२३ कोटी मिळून एकूण ५५८ कोटींचा निधी राज्यातील कृषी विकासासाठी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज केंद्रीय कृषीमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन आढावा बैठकीत महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. कृषी योजनांतील निधीचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, डिजिटल कृषीसह विविध योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मा. केंद्रीय कृषीमंत्री मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांचे महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी दिलेल्या या भरीव सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.
राज्यात आजपर्यंत शेतकऱ्यांनी भरलेल्या सुमारे ४,०००रु कोटी विमा हप्त्यांच्या तुलनेत जवळपास ३८,०००रु कोटींची नुकसानभरपाई मिळाली आहे. संकटाच्या काळात ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे.
- बहुतांश पिकांसाठी शेतकरी हिस्सा केवळ २% - कापूस व कांद्यासाठी ५% - केंद्र शासनाच्या PMFBY पोर्टल किंवा अधिकृत ॲपद्वारेही थेट अर्ज करता येतो.
सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती कृपया शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आजच आपला पीक विमा भरून आपल्या कष्टाच्या पिकाला आर्थिक संरक्षण द्या.
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालय, मुंबई येथे यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या अवाजवी पीक विमा हप्त्याचा सखोल आढावा घेण्यात आला. या संबंधित अधिकारी व विभागांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाचे धोरण हे शेतकरी केंद्रित असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी सुरक्षा कवच ठरावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करणे आणि त्यांच्या अडचणींना प्राधान्याने न्याय देणे, हीच आमची बांधिलकी आहे. शेतकऱ्यांच्या भावना, अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन शासन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असून, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आणखी एक आनंदाची बातमी
राष्ट्रीय कृषी विकास योजना (PM-RKVY) अंतर्गत केंद्र शासनाकडून दुसरा हप्ता म्हणून ३३५ कोटींचा केंद्र सरकारचा हिस्सा महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे. यात राज्य शासनाचा ४०% पूरक हिस्सा म्हणजे २२३ कोटी मिळून एकूण ५५८ कोटींचा निधी राज्यातील कृषी विकासासाठी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज केंद्रीय कृषीमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. कृषी योजनांतील निधीचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, डिजिटल कृषीसह विविध योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मा. केंद्रीय कृषीमंत्री मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांचे महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी दिलेल्या या भरीव सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सन २०२५–२६ मधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखा व्यवस्थापक, विकास अधिकारी तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा इतरांसाठीही उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा ठरेल. सर्व पुरस्कार विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Dattatray Bharane Official
दोन लाखांपर्यंतच्या सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार!
राज्यातील २ लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार असून, कर्जमाफी पूर्ण होताच शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार पात्र खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, राष्ट्रीयकृत बँकांमधील ई-केवायसी व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना खताचा कोणताही तुटवडा भासणार नाही. राज्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घेत ८५ कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. संबंधित कंपन्यांना बियाणे बदलून देण्याबरोबरच नुकसानभरपाईबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे.
यंदा राज्यात ४५.१० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कार्यरत आहेत. तसेच राज्यात ८४ टक्क्यांहून अधिक खरीप पेरणी पूर्ण झाली असून, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या योजना, मदत आणि सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सातत्याने कार्यरत आहे.
#dattatraybharane #ahilyadeviholkar #FarmerLoanWaiver #loanwaiver2026 #agriculture #farmers #maharashtra #शेतकरीकर्जमाफी #शेतकरीहित #खरीपहंगाम #कृषी #महाराष्ट्र
2 days ago | [YT] | 27
View 3 replies
Dattatray Bharane Official
गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी प्रेरणाशक्ती.
ज्यांच्या संस्कारांनी विचार समृद्ध होतात, ज्यांच्या मार्गदर्शनाने आयुष्याला नवी दिशा मिळते आणि ज्यांच्या आशीर्वादाने यशाचा मार्ग सुकर होतो, त्या सर्व गुरुजनांप्रती आज कृतज्ञतेने नतमस्तक होऊया.
सर्वांना पवित्र गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुरूपौर्णिमा #GuruPournima #गुरुवंदना #भारतीयसंस्कृती
2 days ago | [YT] | 28
View 0 replies
Dattatray Bharane Official
मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय : महाअॅग्री एआय धोरणाला नवी गती
📍 मंत्रालय, मुंबई | मंगळवार दि. २८ जुलै २०२६
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कृषी क्षेत्र अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महाअॅग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व अॅग्रोटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील 'व्यवस्थापकीय संचालक' पदास मान्यता देण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मोठी मदत होणार आहे.
#CabinetDecisions #maharashtra #मंत्रिमंडळनिर्णय #महाराष्ट्र_शासन
2 days ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Dattatray Bharane Official
राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धा २०२६-२७ जाहीर
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती
प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि उत्पादनवाढ या उद्देशाने राज्य शासनाने राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धा २०२६-२७ जाहीर केली आहे.
यंदा प्रथमच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांचा स्पर्धेत समावेश आहे.
तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा होणार असून राज्यस्तरावर ५०,०००रु पर्यंत रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
अर्जाची अंतिम मुदत : मूग व उडीद - ३१ जुलै २०२६ इतर पिके - ३१ ऑगस्ट २०२६
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करून या स्पर्धेत सहभागी व्हावे हे नम्र आवाहन.
#dattatraybharane #KharifCropCompetition #FarmersFirst #innovations #agriculture #maharashtra #कृषीमंत्री #दत्तामामा_भरणे #खरीपपीकस्पर्धा #शेतकरीहित #आधुनिकशेती #कृषी #महाराष्ट्र
2 days ago | [YT] | 14
View 1 reply
Dattatray Bharane Official
महाराष्ट्र कृषी शिक्षण व
संशोधन परिषदेची ऑनलाईन व्हीसीद्वारे आढावा बैठक संपन्न झाली
राज्यातील कृषी शिक्षण, कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकरी-केंद्रित संशोधन आणि कृषी विद्यापीठांच्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी संशोधन अधिक परिणामकारक ठरणे, नव्या तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होणे आणि कृषी शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
#dattatraybharane #agriculturaleducation #AgriculturalResearch #innovations #FarmersFirst #maharashtra #कृषीमंत्री #दत्तामामा_भरणे #कृषीशिक्षण #कृषीसंशोधन #नवतंत्रज्ञान #शेतकरीहित #महाराष्ट्र
2 days ago | [YT] | 23
View 2 replies
Dattatray Bharane Official
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आणखी एक आनंदाची बातमी!
राष्ट्रीय कृषी विकास योजना (PM-RKVY) अंतर्गत केंद्र शासनाकडून दुसरा हप्ता म्हणून ३३५ कोटींचा केंद्र सरकारचा हिस्सा महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे. यात राज्य शासनाचा ४०% पूरक हिस्सा म्हणजे २२३ कोटी मिळून एकूण ५५८ कोटींचा निधी राज्यातील कृषी विकासासाठी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज केंद्रीय कृषीमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन आढावा बैठकीत महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. कृषी योजनांतील निधीचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, डिजिटल कृषीसह विविध योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मा. केंद्रीय कृषीमंत्री मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांचे महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी दिलेल्या या भरीव सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
#dattatraybharane #PMRKVY #FarmersFirst #ShivrajSinghChouhan #agriculture #maharashtra #राष्ट्रीयकृषीविकासयोजना #शेतकरीहित #शिवराजसिंहचौहान #कृषी #महाराष्ट्र
2 days ago | [YT] | 16
View 4 replies
Dattatray Bharane Official
शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.
राज्यात आजपर्यंत शेतकऱ्यांनी भरलेल्या सुमारे ४,०००रु कोटी विमा हप्त्यांच्या तुलनेत जवळपास ३८,०००रु कोटींची नुकसानभरपाई मिळाली आहे. संकटाच्या काळात ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे.
- बहुतांश पिकांसाठी शेतकरी हिस्सा केवळ २%
- कापूस व कांद्यासाठी ५%
- केंद्र शासनाच्या PMFBY पोर्टल किंवा अधिकृत ॲपद्वारेही थेट अर्ज करता येतो.
सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती कृपया शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका.
आजच आपला पीक विमा भरून आपल्या कष्टाच्या पिकाला आर्थिक संरक्षण द्या.
PMFBY पोर्टल: www.pmfby.gov.in
#dattatraybharane #PMFBY #CropInsurance #Kharif2026 #FarmersFirst #agriculture #maharashtra #प्रधानमंत्रीपीकविमायोजना #पीकविमा #खरीपहंगाम२०२६ #शेतकरीहित #कृषी #महाराष्ट्र
3 days ago | [YT] | 10
View 3 replies
Dattatray Bharane Official
शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण बैठक!
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालय, मुंबई येथे यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या अवाजवी पीक विमा हप्त्याचा सखोल आढावा घेण्यात आला. या संबंधित अधिकारी व विभागांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाचे धोरण हे शेतकरी केंद्रित असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी सुरक्षा कवच ठरावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करणे आणि त्यांच्या अडचणींना प्राधान्याने न्याय देणे, हीच आमची बांधिलकी आहे. शेतकऱ्यांच्या भावना, अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन शासन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असून, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल.
#dattatraybharane #CropInsurance #Kharif2026 #FarmersFirst #agriculture #maharashtra #पीकविमा #खरीपहंगाम२०२६ #शेतकरीहित #कृषी #महाराष्ट्र
3 days ago | [YT] | 11
View 0 replies
Dattatray Bharane Official
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आणखी एक आनंदाची बातमी
राष्ट्रीय कृषी विकास योजना (PM-RKVY) अंतर्गत केंद्र शासनाकडून दुसरा हप्ता म्हणून ३३५ कोटींचा केंद्र सरकारचा हिस्सा महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे. यात राज्य शासनाचा ४०% पूरक हिस्सा म्हणजे २२३ कोटी मिळून एकूण ५५८ कोटींचा निधी राज्यातील कृषी विकासासाठी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज केंद्रीय कृषीमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. कृषी योजनांतील निधीचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, डिजिटल कृषीसह विविध योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मा. केंद्रीय कृषीमंत्री मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांचे महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी दिलेल्या या भरीव सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
3 days ago | [YT] | 14
View 1 reply
Dattatray Bharane Official
आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सन २०२५–२६ मधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखा व्यवस्थापक, विकास अधिकारी तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा इतरांसाठीही उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा ठरेल. सर्व पुरस्कार विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
3 days ago | [YT] | 12
View 0 replies
Load more