*श्री स्वामी समर्थ बखर* *सूरदासास डोळे देऊन श्रीकृष्णदर्शन दिले*
द्वारपकापुरी एक सुरदास म्हणूस साधू राहत असे. तो जन्मांध असून सत्त्वस्थ होता. त्याला रात्रंदिवस श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास लागला होता. एक दिवस श्रींची स्वारी फिरत फिरत सूरदासाच्या आश्रमी आली व त्यास हाक मारून म्हणाली, "अरे सूरदास, ज्याच्या नावाने (तू) हाक मारतोस तो मी उभा आहे, पाहा." असे म्हणून श्रींनी त्याच्या डोळ्यास हस्तस्पर्श केला. त्या सरशी त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. तो पुढे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली श्यामसुंदर कृष्णमूर्ती दिसू लागली. सूरदास चकित होऊन तटस्थ झाला. काही वेळाने सावध होऊन पाहतो, तो श्री समर्थांची स्वारी दिसू लागली. मग काय विचारतां ? एकदम जाऊन (त्याने) श्रींचे चरण घट्ट धरले व स्तुती करू लागला की, "महाराज, आपण पूर्ण दत्तावतार असून आमच्यासारख्या मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार आहे. महाराज, मी जन्मांध असून आपल्या कृपेने दिव्य दृष्टी मिळाली. आता मला जन्ममरणापासून मुक्त करा !"
अशी प्रार्थना करून तो हात जोडून उभा राहिला तेव्हा समर्थ म्हणाले, "तू त्रिविध तापांपासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील !" असा आशीर्वाद देऊन महाराज निघून गेले. पुढे तो सूरदास श्रींच्या भजनपूजनात काळ घालवून शेवटी शाश्वत सुखास पावला.
स्वामी महाराजांचे घर हे आपलेच घर असते तेव्हा सहजता येणारच. पिता आणि माता या दोन्ही भूमिकांतून स्वामी महाराज आपले संगोपन अनेक प्रकारे करीत असतात तेव्हा त्यांच्या घरी हक्काने जावे आणि समर्पित भावाने सेवा करावी.
गणेश बल्लाळ मुळेकर हे गृहस्थ पूर्वी कोर्टात बेलीफ होते. त्यांना कलेक्टरच्या ऑफिसात त्यांच्या बंधूनी खटपट करून कारकुनाच्या जागेवर नेले. पुढे त्यांचे अक्षर वाईट; म्हणून ती जागा कलेक्टरने त्यांना दिली नाही व इकडे बेलिफाचीही जागा गेली आणि त्यांना निवळ घरी बसावे लागले. अशा स्थितीत अशा संकटसमयी मानवाधिकाऱ्यांकडे हांजी हांजी करण्याची पंचाईत न करता त्यांनी श्री समर्थांकडे धाव घेतली. गणपतराव अक्कलकोटास गेले, त्या दिवशी श्री दयाघनांची स्वारी रस्त्यावरच विराजमान झालेली त्यांच्या दृष्टीस पडली. अहाहा ! दत्तमूर्ती पाहून गणपतरावांचे आनंदास पारावार नाहीसा झाला. साष्टांग नमस्कार घालून (त्यांनी) प्रेमाश्रृंनी श्रींचे चरण धुतले. काही वेळ ती आनंदमूर्ती पाहून त्यांना परम समाधान वाटले. मग गावात जाऊन नैवेद्याची तयारी करून श्रीसन्निध घेऊन आले. तो पावेतो समर्थांची स्वारी खासबागेत विहिरीनजीक जाऊन विराजमान झालेली होती. त्या वेळेस महाराजांनी तमोवृत्तीचा स्वीकार केला होता. आसपास शंभर कदमांवर कोणास फिरकू देत नव्हते. सेवेकऱ्याने नैवेद्य पुढे केल्याबरोबर गालीप्रदान करू लागले. तेव्हा गणपतरावजीस नैवेद्य सेवेकऱ्याचे स्वाधीन करून परत जावे लागले. मग तिसरे प्रहरी गणपतराव पुन्हा दर्शनास गेले. त्या वेळी शांतवृत्ती होती. पादसेवन वगैरे थोडी सेवा त्यांनी केली. असो.
त्यांनी नोकरी गेल्याबद्दल समर्थांना विचारावे; म्हणून रोज पाच-चार वेळा श्री समर्थांजवळ येऊन चार घटका बसत असत; परंतु ते तेज पाहून त्यांस विचारण्याचा धीर होईना. एक दिवस एका सेवेकऱ्याने गणपतरावांस सांगितले की, उद्या रामनवमी आहे, करिता फराळास अर्धा मण दही घेऊन द्या. गणपतराव म्हणाले - "माझे एक काम कराल, तर मी तुम्हांस दही देईन." सेवेकरी म्हणाला, "काय काम ?" गणपतराव म्हणाले, "माझी नोकरी गेली आहे, त्या बद्दल महाराजांस विचारावयाचे आहे." सेवेकऱ्याने तत्काल श्री प्रभुरायांना विचारले, "महाराज, याची नोकरी गेली आहे. ती केव्हा लागेल ?" महाराज म्हणाले, "नोकरी लागली आहे. जा!" हे ऐकून गणपतरावांना समाधान वाटले, पण थोडी शंका राहिली; पुन्हा सेवेकऱ्यास विनंती केली की, "किती रुपयांची नोकरी लागेल?" असे विचारा. त्याने तत्काळ तोही प्रश्न केला, "महाराज नोकरी किती रुपयांची लागेल ?" महाराज म्हणाले, "लाख रुपयांची लागेल, जा!" हा आशीर्वाद ऐकून गणपतरावास परमानंद वाटला. सेवेकऱ्यास आठ आण्याचे दही घेऊन दिले.
गणपतरावांजवळ खर्चाची टंचाई होती. त्यांनी गाणगापूरचे यात्रेपुरतेच पैसे ठेवले होते. थोडे दिवस राहून गाणगापूरास जावयास निघाले. श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास जाते वेळेस नारळ न घेता पैशाच्या खारका मात्र घेतल्या. त्या वेळेस नारळ चार आण्यांनी झाले होते. असो ! खारका पुढे ठेवून नमस्कार केला. तो महाराज म्हणाले, "जा, नारळ घेऊन ये!" मग नारळ आणून दर्शन घेतले आणि निघाले. खर्चाच्या पैशात चार आणे कमी झाले, म्हणून थोडेसे वाईट वाटले. पुढे गाणगापूरच्या रस्त्यात त्यास आठ आणे सापडले तेव्हा लक्षात आले की, चार आण्याचा नारळ घेतला, पण महाराजांनी चार आण्यांच्या दुप्पट आठ-आणे दिले. मग गाणगापूरची यात्रा वगैरे करून घरी आल्यावर, ज्या दिवशी महाराजांनी चाकरी लागेल म्हणून सांगितले, त्या दिवशी सोलापूर कचेरीतून त्यांना पंधरा रुपयाच्या कारकुनाच्या जागेवर नेमणूक केली आहे, असा हुकूम आला होता.
थोडे महिन्यांनी असिस्टंट कलेक्टरचे ऑफिसांत वीस रुपयांची जागा मिळाली व त्यांची नेमणूक अक्कलकोट पॉलिटिकल एजंटसाहेब यांच्या कचेरीत झाली; त्यामुळे श्री समर्थांचे दर्शन वारंवार होऊ लागले व स्वामी महाराजांवर त्याची भक्ती दिवसेंदिवस जास्त वाढू लागली, कारण स्वामींच्या अंतःसाक्षित्वाबद्दल व अतर्क्य सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली होती. पुढे पाच वर्षांतच गणपतराव अव्वल कारकून होऊन त्याच साली मामलेदार झाले. हल्ली ते फर्स्ट क्लास मामलेदारीचे काम करीत आहेत. श्री स्वामिरायांच्या आशीर्वादे करून त्यांचे लाख रुपयांचे काम झाले. असो. हे श्रीमहाराजांचे एकनिष्ठ भक्त बनले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेकरून काय होणार नाही ?
एक अलवणीबुवा बडोद्यास राहात असत. हे जगन्नाथास गेले असता त्यांच्या बरोबर असलेल्या मनुष्यांना ताप आल्यामुळे बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्य कोणासही राहिले नाही. त्या ठिकाणी श्री स्वामिराज यांनी प्रकट होऊन कटीवर हात ठेवून अलवणीबुवांचे पुढे उभे राहिले. अलवणीबुवांनी ती तेजःपुंज मूर्ती पाहून, जरी त्यांना ताप आला होता, तरी ते खडबडून उठले व त्यांनी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून हात जोडून संस्कृत भाषेत समर्थांची पुष्कळ स्तुती केली व 'आपण कोठे असता ?' म्हणून विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, "सर्व स्थाने आमचीच आहेत !" असे म्हणत म्हणत दिसेनासे झाले. हे पाहून बुवांस मोठे आश्चर्य वाटले आणि पाहतात तो पलीकडच्या बाजूस पक्वान्नांनी भरलेली पात्रे त्यांचे दृष्टीस पडली. त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यांसह यथेच्छ भोजन केले आणि फिरत फिरत ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले व जगन्नाथास पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पटताच मग काय विचारता ? त्यांना प्रेम आवरेना ! साष्टांग नमस्कार करून काही दिवस श्रींची सेवा यथाशक्ती करून आपली झालेली हकिकत सर्व सेवेकऱ्यांस सांगितली.
श्री स्वामी समर्थ सेवा करायला सर्वांना आवडते पण काय आणि कुठली करावी हा सर्वांना प्रश्न पडतो. स्वामींच्या कृपेने आज आपण एक उपक्रम हाती घेतला आहे या कलियुगात सर्वांच्या हातून सेवा घडावी..त्या साठी आम्ही स्वामी सदन सेवा ग्रुप 1 केला आहे या वर नित्य सेवा, मंत्र दिले जातील .. ज्यांना या सेवेत सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी link varun ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.. प्रत्येक ग्रुप मध्ये 99 भक्त असतील
एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती. जवळ बाबा सबनीस, रामदासीबुवा, बाबा यादव, गोपाळभट, सुंदराबाई, दुसरी आणखीही मंडळी होती. त्या वेळी सुंदराबाईंजवळ एक मोंगलाईतील ब्राह्मणाची बाई आपल्या मुलासकट बसली होती. शिवुबाईने महाराजांची प्रार्थना केली की, या ब्राह्मणाच्या बाईच्या मुलाचे डोळे मौंजीबंधन झाल्या पासून गेले. अगदी दिसत नाही, तरी कृपा करून त्याला डोळे द्यावेत असे तिचे भाषण ऐकून श्री समर्थ म्हणाले, "पाच राक्षस आमची परीक्षा बघण्याकरिता येत आहेत! त्या परीक्षेच्या वेळेस हा पोरगा डोळे उघडील." इतक्यात पाच वैष्णव डोकीला शालजोड्या बांधलले, तेथे आले. त्यांनी समर्थांची कीर्ती ऐकून, हे संन्यासी आणि कोठेही जेवतात, हा धर्म कुठे सांगितला आहे, वगैरे सर्व हे ढोंग आहे, तर ते बाहेर काढावे असा विचार करून श्रींस नमस्कार वगैरे काही न करता, ते मोठ्या डौलाने जाऊन बसले. काही कर्नाटकी भाषेत व काही संस्कृत भाषेत आपसात बोलू लागले. इतक्यात आणखीन एक आचार्य व सात दुसरे वैष्णव तेथे आले. श्रींस साष्टांग नमस्कार करून ते महाराजांसमोर बसले. महाराजांनी आंधळ्या मुलास, "गणेशा, इकडे ये ! या काळ्यांच्या मनांतील वाक्ये उत्तरासह यांना सांग." तेव्हा आंधळा मुलगा चरणी मस्तक ठेवून विनवू लागला की, "महाराज, मला अक्षर देखील येत नाही, मी यांना काय सांगू?" तेव्हा समर्थांनी आपले गळ्यातील माळ, त्या आंधळ्या मुलाचे गळ्यात घातली व झेंडूचे फूल त्याच्या डोळ्यांस लावले. समर्थांचे कृपाकर नेत्रांस लागतांच अंध मुलगा डोळे उघडून, वैष्णव आचार्यांचे समोर उभा राहिला आणि आवेशाने पंच वैष्णवांनी मनात आणलेली वेदवाक्ये, भगवद्गीतेतील श्लोक, तसेच भागवतातील श्लोक म्हणू लागला व त्यांजवर त्यांच्या मनात आलेल्या शंकांची उत्तरे यथासांग अर्थासह देऊ लागला. श्रींनी दिलेले हे अद्भुत पारमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आपल्या मनात विरघळले आणि अभिमान सोडून अनन्य शरण होऊन (त्यांनी) श्री समर्थ चरणी साष्टांग नमस्कार बहुत घातले व "महाराज, अपराधाची क्षमा करावी, आपण समर्थ आहात, आमचे सारखे मूढजन आपले निरंतर अपराध करतात, पण आपण ते सर्व क्षमा करता, असे आपले ब्रीद वेदपुराणे गातात." या प्रमाणे स्तुती केली. ती ऐकून महाराज म्हणाले, "आम्ही पाहिजे त्या जातीचे मनुष्यांचे अन्न खातो.' ही परीक्षा पाहाणेकरिता येथे आलास आणि तुझी आई मुसलमानाखाली गेली व तुझा जन्म इमामबक्षापासून झाला, तिची परीक्षा तू केली नाहीस !" हे श्रींच्या मुखातील भाषण ऐकून, 'दे माय धरणी ठाय' या म्हणीप्रमाणे वैष्णवांस झाले. अत्यंत लज्जित होऊन (तो) महाराजांस म्हणाला, "महाराज, अशा पतितास प्रायश्चित्त काय, ते सांगावे. मी आपला दास आहे. मजवर कृपा करावी. काल पंढरीनाथ याचे घरी भोजनास गेलो असता एका स्मार्ताने आपली कीर्ती वर्णन केली. त्या वेळी मी विद्वत्तेच्या उन्मादाने आपली निंदा फार केली व परीक्षा पाहण्यास आलो. मजसारखा दुष्ट, छलक, चांडाळ, पतित असा कोणी या जगतात नसेल असे मला स्वानुभवाने कळोन आले; परंतु काही पूर्व पुण्याईने आपले समर्थांचे दर्शनाबरोबर खात्री व पश्चात्ताप झाला, तरी आता दीनावर कृपा करून माझ्या कल्याणाचा मला मार्ग दाखवा ! जी आपण आज्ञा कराल, ती शिरसामान्य करण्यास मी सिद्ध आहे!" असे आचार्यांचे भाषण ऐकून दयाळू महाराज म्हणाले, "गंगास्नान करून भागवतधर्म आचरण करा, म्हणजे पापापासून मुक्त व्हाल !" असा तत्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेमभावाने चरणांवर मस्तक ठेवून "श्रीगुरुदेव दत्त महाराज की जय !" असा जय जयकार करीत, आपल्या गावी गेले. तेव्हापासून ते श्रींची वारी करू लागले. अंध मुलगा स्वामीकृपेने डोळस व विद्वान् झाला. त्याची मातोश्री आपल्या मुलास घेऊन आपल्या गावी गेली.
*श्री स्वामी समर्थ बखर* *एका बाईचा नैवेद्य स्वीकारला*
एका ब्राह्मणाच्या बाईने श्रद्धापूर्वक श्रींस नैवेद्य आणला होता. बाई निर्धन असल्यामुळे तिची दाद कोणी लागू देईनात. ती लांब बसून श्रींचे चिंतन करीत, "माझ्या नैवेद्यातील दोन घास महाराज घेतील काय ?" अशी मनांत प्रार्थना करीत होती. इतक्यात श्री समर्थ दयाळू म्हणाले की, "भटणीच्या नैवेद्यास कोण आडवा येतो ? माजलेले पायपोस खातील ! अगं, इकडे ये!" असे म्हणून हाताने तिला खुणविले. त्या सरशी दरिद्रीबाईने धावत जाऊन नैवेद्य पुढे ठेवला. श्रींनी परम आदराने तो घेतला. धन्य ते समर्थ ! गरीब बिचारी बाई फार लांब बसलेली असून तिची दाद कोणी लागू देईनात. तथापि, अंतरसाक्षित्वाने जाणून बाईवर त्यांनी) कृपा केली आणि ते बाईला म्हणाले, "तुला खोडकर मुलगा होईल!" हे वाक्य ऐकून बाईच्या पोटात आनंद मावेना. बाई विनंती करून बोलली की, "आजपर्यंत पुष्कळ सत्पुरुष पाहिले. हा मासला माझ्या दृष्टीस कधीच पडला नाही ! आपल्या चरणकृपेने पूर्ण समाधान झाले!" बाईस ४५ वर्षांपर्यंत पुत्रसंतान नव्हते. श्रीकृपेने बाईस पुत्रप्राप्ती झाली. हिला महाराजांचे स्मरण झाले, म्हणजे कंठ सद्गदित होऊन ती प्रेमाने रडत असे.
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*सूरदासास डोळे देऊन श्रीकृष्णदर्शन दिले*
द्वारपकापुरी एक सुरदास म्हणूस साधू राहत असे. तो जन्मांध असून सत्त्वस्थ होता. त्याला रात्रंदिवस श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास लागला होता. एक दिवस श्रींची स्वारी फिरत फिरत सूरदासाच्या आश्रमी आली व त्यास हाक मारून म्हणाली, "अरे सूरदास, ज्याच्या नावाने (तू) हाक मारतोस तो मी उभा आहे, पाहा." असे म्हणून श्रींनी त्याच्या डोळ्यास हस्तस्पर्श केला. त्या सरशी त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. तो पुढे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली श्यामसुंदर कृष्णमूर्ती दिसू लागली. सूरदास चकित होऊन तटस्थ झाला. काही वेळाने सावध होऊन पाहतो, तो श्री समर्थांची स्वारी दिसू लागली. मग काय विचारतां ? एकदम जाऊन (त्याने) श्रींचे चरण घट्ट धरले व स्तुती करू लागला की, "महाराज, आपण पूर्ण दत्तावतार असून आमच्यासारख्या मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार आहे. महाराज, मी जन्मांध असून आपल्या कृपेने दिव्य दृष्टी मिळाली. आता मला जन्ममरणापासून मुक्त करा !"
अशी प्रार्थना करून तो हात जोडून उभा राहिला तेव्हा समर्थ म्हणाले, "तू त्रिविध तापांपासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील !" असा आशीर्वाद देऊन महाराज निघून गेले. पुढे तो सूरदास श्रींच्या भजनपूजनात काळ घालवून शेवटी शाश्वत सुखास पावला.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
1 month ago | [YT] | 16
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
बसले येथे स्वामी लक्ष ठेवुन भक्तांवरी, नाही गेलो आपण जरी दरबारी. तरी त्यांचे लक्ष आहे आम्हांवरी🙌🏻🙇🏻♂️🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙌🏻🙇🏻♂️🙏🏻
1 month ago | [YT] | 20
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
स्वामी महाराजांचे घर हे आपलेच घर असते तेव्हा सहजता येणारच. पिता आणि माता या दोन्ही भूमिकांतून स्वामी महाराज आपले संगोपन अनेक प्रकारे करीत असतात तेव्हा त्यांच्या घरी हक्काने जावे आणि समर्पित भावाने सेवा करावी.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
2 months ago | [YT] | 23
View 2 replies
Swami sadan math bavdhan pune
*आईच्या दर्शनाने मनाला खरी शांतता मिळते*
"आई तुझ्या दर्शनाने जीवनातील प्रत्येक संकट हलकं होतं ✨
भक्ताला नेहमीच दिलासा देणारी शक्तीस्वरूप आई "🌹
जय अंबे, जय भवानी, जय जगदंबे 🙏
2 months ago | [YT] | 9
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*गणेश बल्लाळ मुळेकर*
गणेश बल्लाळ मुळेकर हे गृहस्थ पूर्वी कोर्टात बेलीफ होते. त्यांना कलेक्टरच्या ऑफिसात त्यांच्या बंधूनी खटपट करून कारकुनाच्या जागेवर नेले. पुढे त्यांचे अक्षर वाईट; म्हणून ती जागा कलेक्टरने त्यांना दिली नाही व इकडे बेलिफाचीही जागा गेली आणि त्यांना निवळ घरी बसावे लागले. अशा स्थितीत अशा संकटसमयी मानवाधिकाऱ्यांकडे हांजी हांजी करण्याची पंचाईत न करता त्यांनी श्री समर्थांकडे धाव घेतली. गणपतराव अक्कलकोटास गेले, त्या दिवशी श्री दयाघनांची स्वारी रस्त्यावरच विराजमान झालेली त्यांच्या दृष्टीस पडली. अहाहा ! दत्तमूर्ती पाहून गणपतरावांचे आनंदास पारावार नाहीसा झाला. साष्टांग नमस्कार घालून (त्यांनी) प्रेमाश्रृंनी श्रींचे चरण धुतले. काही वेळ ती आनंदमूर्ती पाहून त्यांना परम समाधान वाटले. मग गावात जाऊन नैवेद्याची तयारी करून श्रीसन्निध घेऊन आले. तो पावेतो समर्थांची स्वारी खासबागेत विहिरीनजीक जाऊन विराजमान झालेली होती. त्या वेळेस महाराजांनी तमोवृत्तीचा स्वीकार केला होता. आसपास शंभर कदमांवर कोणास फिरकू देत नव्हते. सेवेकऱ्याने नैवेद्य पुढे केल्याबरोबर गालीप्रदान करू लागले. तेव्हा गणपतरावजीस नैवेद्य सेवेकऱ्याचे स्वाधीन करून परत जावे लागले. मग तिसरे प्रहरी गणपतराव पुन्हा दर्शनास गेले. त्या वेळी शांतवृत्ती होती. पादसेवन वगैरे थोडी सेवा त्यांनी केली. असो.
त्यांनी नोकरी गेल्याबद्दल समर्थांना विचारावे; म्हणून रोज पाच-चार वेळा श्री समर्थांजवळ येऊन चार घटका बसत असत; परंतु ते तेज पाहून त्यांस विचारण्याचा धीर होईना. एक दिवस एका सेवेकऱ्याने गणपतरावांस सांगितले की, उद्या रामनवमी आहे, करिता फराळास अर्धा मण दही घेऊन द्या. गणपतराव म्हणाले -
"माझे एक काम कराल, तर मी तुम्हांस दही देईन." सेवेकरी म्हणाला, "काय काम ?" गणपतराव म्हणाले, "माझी नोकरी गेली आहे, त्या बद्दल महाराजांस विचारावयाचे आहे." सेवेकऱ्याने तत्काल श्री प्रभुरायांना विचारले, "महाराज, याची नोकरी गेली आहे. ती केव्हा लागेल ?" महाराज म्हणाले, "नोकरी लागली आहे. जा!" हे ऐकून गणपतरावांना समाधान वाटले, पण थोडी शंका राहिली; पुन्हा सेवेकऱ्यास विनंती केली की, "किती रुपयांची नोकरी लागेल?" असे विचारा. त्याने तत्काळ तोही प्रश्न केला, "महाराज नोकरी किती रुपयांची लागेल ?" महाराज म्हणाले, "लाख रुपयांची लागेल, जा!" हा आशीर्वाद ऐकून गणपतरावास परमानंद वाटला. सेवेकऱ्यास आठ आण्याचे दही घेऊन दिले.
गणपतरावांजवळ खर्चाची टंचाई होती. त्यांनी गाणगापूरचे यात्रेपुरतेच पैसे ठेवले होते. थोडे दिवस राहून गाणगापूरास जावयास निघाले. श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास जाते वेळेस नारळ न घेता पैशाच्या खारका मात्र घेतल्या. त्या वेळेस नारळ चार आण्यांनी झाले होते. असो ! खारका पुढे ठेवून नमस्कार केला. तो महाराज म्हणाले, "जा, नारळ घेऊन ये!" मग नारळ आणून दर्शन घेतले आणि निघाले. खर्चाच्या पैशात चार आणे कमी झाले, म्हणून थोडेसे वाईट वाटले. पुढे गाणगापूरच्या रस्त्यात त्यास आठ आणे सापडले तेव्हा लक्षात आले की, चार आण्याचा नारळ घेतला, पण महाराजांनी चार आण्यांच्या दुप्पट आठ-आणे दिले. मग गाणगापूरची यात्रा वगैरे करून घरी आल्यावर, ज्या दिवशी महाराजांनी चाकरी लागेल म्हणून सांगितले, त्या दिवशी सोलापूर कचेरीतून त्यांना पंधरा रुपयाच्या कारकुनाच्या जागेवर नेमणूक केली आहे, असा हुकूम आला होता.
थोडे महिन्यांनी असिस्टंट कलेक्टरचे ऑफिसांत वीस रुपयांची जागा मिळाली व त्यांची नेमणूक अक्कलकोट पॉलिटिकल एजंटसाहेब यांच्या कचेरीत झाली; त्यामुळे श्री समर्थांचे दर्शन वारंवार होऊ लागले व स्वामी महाराजांवर त्याची भक्ती दिवसेंदिवस जास्त वाढू लागली, कारण स्वामींच्या अंतःसाक्षित्वाबद्दल व अतर्क्य सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली होती. पुढे पाच वर्षांतच गणपतराव अव्वल कारकून होऊन त्याच साली मामलेदार झाले. हल्ली ते फर्स्ट क्लास मामलेदारीचे काम करीत आहेत. श्री स्वामिरायांच्या आशीर्वादे करून त्यांचे लाख रुपयांचे काम झाले. असो. हे श्रीमहाराजांचे एकनिष्ठ भक्त बनले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेकरून काय होणार नाही ?
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
3 months ago | [YT] | 28
View 4 replies
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*अलवणीबुवांची गोष्ट*
एक अलवणीबुवा बडोद्यास राहात असत. हे जगन्नाथास गेले असता त्यांच्या बरोबर असलेल्या मनुष्यांना ताप आल्यामुळे बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्य कोणासही राहिले नाही. त्या ठिकाणी श्री स्वामिराज यांनी प्रकट होऊन कटीवर हात ठेवून अलवणीबुवांचे पुढे उभे राहिले. अलवणीबुवांनी ती तेजःपुंज मूर्ती पाहून, जरी त्यांना ताप आला होता, तरी ते खडबडून उठले व त्यांनी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून हात जोडून संस्कृत भाषेत समर्थांची पुष्कळ स्तुती केली व 'आपण कोठे असता ?' म्हणून विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, "सर्व स्थाने आमचीच आहेत !" असे म्हणत म्हणत दिसेनासे झाले. हे पाहून बुवांस मोठे आश्चर्य वाटले आणि पाहतात तो पलीकडच्या बाजूस पक्वान्नांनी भरलेली पात्रे त्यांचे दृष्टीस पडली. त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यांसह यथेच्छ भोजन केले आणि फिरत फिरत ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले व जगन्नाथास पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पटताच मग काय विचारता ? त्यांना प्रेम आवरेना ! साष्टांग नमस्कार करून काही दिवस श्रींची सेवा यथाशक्ती करून आपली झालेली हकिकत सर्व सेवेकऱ्यांस सांगितली.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
3 months ago | [YT] | 22
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
आपले आशीर्वाद, मार्गदर्शन आणि प्रेम आमच्यावर असेच राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुमाऊली रेवतीताई🙇🏻♂️🙏🏻
4 months ago | [YT] | 8
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
श्री स्वामी समर्थ
सेवा करायला सर्वांना आवडते पण काय आणि कुठली करावी हा सर्वांना प्रश्न पडतो. स्वामींच्या कृपेने आज आपण एक उपक्रम हाती घेतला आहे या कलियुगात सर्वांच्या हातून सेवा घडावी..त्या साठी आम्ही स्वामी सदन सेवा ग्रुप 1 केला आहे या वर नित्य सेवा, मंत्र दिले जातील .. ज्यांना या सेवेत सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी link varun ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.. प्रत्येक ग्रुप मध्ये 99 भक्त असतील
chat.whatsapp.com/DniiDLywGevFu2mnATEntj
5 months ago (edited) | [YT] | 15
View 2 replies
Swami sadan math bavdhan pune
*आंधळ्या मुलास नेत्रप्राप्ती*
एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती. जवळ बाबा सबनीस, रामदासीबुवा, बाबा यादव, गोपाळभट, सुंदराबाई, दुसरी आणखीही मंडळी होती. त्या वेळी सुंदराबाईंजवळ एक मोंगलाईतील ब्राह्मणाची बाई आपल्या मुलासकट बसली होती.
शिवुबाईने महाराजांची प्रार्थना केली की, या ब्राह्मणाच्या बाईच्या मुलाचे डोळे मौंजीबंधन झाल्या पासून गेले. अगदी दिसत नाही, तरी कृपा करून त्याला डोळे द्यावेत असे तिचे भाषण ऐकून श्री समर्थ म्हणाले, "पाच राक्षस आमची परीक्षा बघण्याकरिता येत आहेत! त्या परीक्षेच्या वेळेस हा पोरगा डोळे उघडील." इतक्यात पाच वैष्णव डोकीला शालजोड्या बांधलले, तेथे आले. त्यांनी समर्थांची कीर्ती ऐकून, हे संन्यासी आणि कोठेही जेवतात, हा धर्म कुठे सांगितला आहे, वगैरे सर्व हे ढोंग आहे, तर ते बाहेर काढावे असा विचार करून श्रींस नमस्कार वगैरे काही न करता, ते मोठ्या डौलाने जाऊन बसले. काही कर्नाटकी भाषेत व काही संस्कृत भाषेत आपसात बोलू लागले.
इतक्यात आणखीन एक आचार्य व सात दुसरे वैष्णव तेथे आले. श्रींस साष्टांग नमस्कार करून ते महाराजांसमोर बसले. महाराजांनी आंधळ्या मुलास, "गणेशा, इकडे ये ! या काळ्यांच्या मनांतील वाक्ये उत्तरासह यांना सांग."
तेव्हा आंधळा मुलगा चरणी मस्तक ठेवून विनवू लागला की, "महाराज, मला अक्षर देखील येत नाही, मी यांना काय सांगू?" तेव्हा
समर्थांनी आपले गळ्यातील माळ, त्या आंधळ्या मुलाचे गळ्यात घातली व झेंडूचे फूल त्याच्या डोळ्यांस लावले. समर्थांचे कृपाकर नेत्रांस लागतांच अंध मुलगा डोळे उघडून, वैष्णव आचार्यांचे समोर उभा राहिला आणि आवेशाने पंच वैष्णवांनी मनात आणलेली वेदवाक्ये, भगवद्गीतेतील श्लोक, तसेच भागवतातील श्लोक म्हणू लागला व त्यांजवर त्यांच्या मनात आलेल्या शंकांची उत्तरे यथासांग अर्थासह देऊ लागला.
श्रींनी दिलेले हे अद्भुत पारमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आपल्या मनात विरघळले आणि अभिमान सोडून अनन्य शरण होऊन (त्यांनी) श्री समर्थ चरणी साष्टांग नमस्कार बहुत घातले व "महाराज, अपराधाची क्षमा करावी, आपण समर्थ आहात, आमचे सारखे मूढजन आपले निरंतर अपराध करतात, पण आपण ते सर्व क्षमा करता, असे आपले ब्रीद वेदपुराणे गातात." या प्रमाणे स्तुती केली.
ती ऐकून महाराज म्हणाले, "आम्ही पाहिजे त्या जातीचे मनुष्यांचे अन्न खातो.' ही परीक्षा पाहाणेकरिता येथे आलास आणि तुझी आई मुसलमानाखाली गेली व तुझा जन्म इमामबक्षापासून झाला, तिची परीक्षा तू केली नाहीस !"
हे श्रींच्या मुखातील भाषण ऐकून, 'दे माय धरणी ठाय' या म्हणीप्रमाणे वैष्णवांस झाले. अत्यंत लज्जित होऊन (तो) महाराजांस म्हणाला, "महाराज, अशा पतितास प्रायश्चित्त काय, ते सांगावे. मी आपला दास आहे. मजवर कृपा करावी. काल पंढरीनाथ याचे घरी भोजनास गेलो असता एका स्मार्ताने आपली कीर्ती वर्णन केली. त्या वेळी मी विद्वत्तेच्या उन्मादाने आपली निंदा फार केली व परीक्षा पाहण्यास आलो. मजसारखा दुष्ट, छलक, चांडाळ, पतित असा कोणी या जगतात नसेल असे मला स्वानुभवाने कळोन आले; परंतु काही पूर्व पुण्याईने आपले समर्थांचे दर्शनाबरोबर खात्री व पश्चात्ताप झाला, तरी आता दीनावर कृपा करून माझ्या कल्याणाचा मला मार्ग दाखवा ! जी आपण आज्ञा कराल, ती शिरसामान्य करण्यास मी सिद्ध आहे!" असे आचार्यांचे भाषण ऐकून दयाळू महाराज म्हणाले, "गंगास्नान करून भागवतधर्म आचरण करा, म्हणजे पापापासून मुक्त व्हाल !"
असा तत्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेमभावाने चरणांवर मस्तक ठेवून "श्रीगुरुदेव दत्त महाराज की जय !" असा जय जयकार करीत, आपल्या गावी गेले. तेव्हापासून ते श्रींची वारी करू लागले. अंध मुलगा स्वामीकृपेने डोळस व विद्वान् झाला. त्याची मातोश्री आपल्या मुलास घेऊन आपल्या गावी गेली.
(श्री स्वामी समर्थ बखर)
श्री स्वामी समर्थ
5 months ago | [YT] | 35
View 2 replies
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*एका बाईचा नैवेद्य स्वीकारला*
एका ब्राह्मणाच्या बाईने श्रद्धापूर्वक श्रींस नैवेद्य आणला होता. बाई निर्धन असल्यामुळे तिची दाद कोणी लागू देईनात. ती लांब बसून श्रींचे चिंतन करीत, "माझ्या नैवेद्यातील दोन घास महाराज घेतील काय ?" अशी मनांत प्रार्थना करीत होती. इतक्यात श्री समर्थ दयाळू म्हणाले की, "भटणीच्या नैवेद्यास कोण आडवा येतो ? माजलेले पायपोस खातील ! अगं, इकडे ये!" असे म्हणून हाताने तिला खुणविले. त्या सरशी दरिद्रीबाईने धावत जाऊन नैवेद्य पुढे ठेवला. श्रींनी परम आदराने तो घेतला. धन्य ते समर्थ ! गरीब बिचारी बाई फार लांब बसलेली असून तिची दाद कोणी लागू देईनात. तथापि, अंतरसाक्षित्वाने जाणून बाईवर त्यांनी) कृपा केली आणि ते बाईला म्हणाले, "तुला खोडकर मुलगा होईल!" हे वाक्य ऐकून बाईच्या पोटात आनंद मावेना. बाई विनंती करून बोलली की, "आजपर्यंत पुष्कळ सत्पुरुष पाहिले. हा मासला माझ्या दृष्टीस कधीच पडला नाही ! आपल्या चरणकृपेने पूर्ण समाधान झाले!" बाईस ४५ वर्षांपर्यंत पुत्रसंतान नव्हते. श्रीकृपेने बाईस पुत्रप्राप्ती झाली. हिला महाराजांचे स्मरण झाले, म्हणजे कंठ सद्गदित होऊन ती प्रेमाने रडत असे.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
5 months ago | [YT] | 22
View 2 replies
Load more