Marathi dev 97

आई तुळजाभवानी

1 week ago | [YT] | 3

Marathi dev 97

तिघे सख्खे भाऊ झाले एमपीएससी उत्तीर्ण, महाराष्ट्रातील दुर्मिळ उदाहरण

गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचे यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी असते. संपूर्ण पंचक्रोशीतील स्वप्न बघणाऱ्या सर्व पिढीसाठी आज चंदन बंधू हे खूप मोठे उदाहरण आहेत. ही यशोगाथा आहे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चंदन कुटूंबीय यांची.

ज्यातील एक भाऊ दिलीप मालन चंदन नागपूर गुन्हे शाखा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर दुसरा विजय मालन चंदन पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे आणि छायाचित्रातील मध्यभागी असलेला अजय मालन चंदन. नुकतीच त्याची राज्य कर निरीक्षक पदावर पदावर एमपीएससीमार्फत निवड झाली.

नुकताच एमपीएससी उत्तीर्ण झाला तो अजय मालन चंदन. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगरच्या उखलगाव या गावातील हे तिघे भाऊ. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथ शाळा उखलगाव येथून घेतले. पुढे समाजशास्त्र या विषयात आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथून पदवीचे शिक्षण घेतले. दोन मोठ्या भावांचा आदर्श घेत अजय यानेही एमपीएससी परीक्षेचा ध्यास धरला आणि त्यात यश मिळवले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब २०२४ मध्ये राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदी निवड झाली. त्याने
केडगाव, अहिल्यानगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अजयचे मोठे बंधू दिलीप मालन चंदन यांची एमपीएससीच्या चमाध्यमातून २०१० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली असून सध्या ते गुन्हे शाखा नागपूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. ते सुरुवातीला शिक्षक होते.

दुसरे बंधु विजय मालन चंदन यांची २०१२ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. ते सध्या पुणे शहर येथे सहा. पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तेही सुरुवातीला शिक्षक होते. मात्र एमपीएससी परीक्षेच्या दोन्ही भावांना स्वस्त बसू देत नसल्याने दोघांनीही त्याची तयारी केली आणि मोठ्या पदावर जाण्याचा निर्णय घेत अखेर एमपीएससी गाठले. विशेष म्हणजे आईने तिघाही भावांचे शिक्षण पूर्ण केले.

अजय आपल्या प्रवासाबद्दल सांगतो की, सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय ठेवले होते. त्यानुसार पदवीपासून माझा अभ्यास सुरू होता. माझ्या यशानंतर तिसरा भाऊ देखील एमपीएससीचतून अधिकारी झाला आहे. तीन सख्खे भाऊ एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी होणे हे दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. या यशामागे माझी आई, भाऊ माझे कुटुंब आणि मित्र यांचा खूप मोलाचा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सातत्य, जिद्द व चिकाटी खूप महत्वाची आहे. तसेच वेळेचा सदुपयोग व योग्य नियोजन करूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते.

#mpsc #upsc #students #boys #police #foryouシ #foryoupageシ #explorar #Amazing #post #trendingpost #trendingsongs #trendingvideo #photographychallenge #viralvideochallenge #dipalimirage

1 week ago | [YT] | 0

Marathi dev 97

Start YouTube November 14,2019 open the channel

#MyYearOnYouTube2025 #youtube #yt #

1 week ago | [YT] | 0

Marathi dev 97

Dharmendra : बॉलिवूडचा 'ही- मॅन' काळाच्या पडद्याआड; 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास
येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. सोमवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आज (मंगळवार) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हेमा मालिनी, सनी देओल आणि मुलगी इशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. श्वसनाच्या त्रासामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत होते. त्यांचा शेवटचा ‘इक्किस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं- अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, अहाना देओल, अजिता आणि विजेता असा परिवार आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

पंजाबमधील लुधियाना इथल्या एका गावात धर्मेंदर केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

वयाच्या 89 व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर सक्रिय होते. ते अनेकदा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायचे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते ट्रॅक्टर चालवताना, शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे धडे देताना विविध व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करायचे.

1 month ago | [YT] | 0

Marathi dev 97

Dharmendra : बॉलिवूडचा 'ही- मॅन' काळाच्या पडद्याआड; 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास
येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. सोमवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आज (मंगळवार) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हेमा मालिनी, सनी देओल आणि मुलगी इशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. श्वसनाच्या त्रासामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत होते. त्यांचा शेवटचा ‘इक्किस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं- अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, अहाना देओल, अजिता आणि विजेता असा परिवार आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

पंजाबमधील लुधियाना इथल्या एका गावात धर्मेंदर केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

वयाच्या 89 व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर सक्रिय होते. ते अनेकदा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायचे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते ट्रॅक्टर चालवताना, शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे धडे देताना विविध व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करायचे.#deepikapadukone #katrinakaif #shahrukhkhan #akshaykumar #ranveersingh #varundhawan #bollywoodsongs #aishwaryarai #oldisgold #kajol #aamirkhan#dharmendra #amitabhbachchan #madhuridixit #sanjaydutt #sridevi #madhubala #anilkapoor #rishikapoor #govinda #rekha #latamangeshkar #sunnydeol #sridevikapoor #bobbydeol #dilipkumar #rajeshkhanna #kishorekumar #mithunchakraborty #dharmendra #oldbollywood #hemamalini#dharmendra #salmankhan #superstar #deepikapadukone #katrinakaif #shahrukhkhan #akshaykumar #ranveersingh #varundhawan #bollywoodsongs #aishwaryarai #oldisgold #kajol #aamirkhan

1 month ago | [YT] | 3

Marathi dev 97

वसुबारस
दिवाळी चा पहिला दिवस

2 months ago | [YT] | 2

Marathi dev 97

भारतीय वायुदलानं (Indian Air Force) आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक (Air Strike) करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं.

उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

भारतानं दहशतवादाविरुद्धच्या लढाईला एक नवं वळण देत 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही सेना, वायुदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत, भारतीय वायूदलानं पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष्य साधत हल्ले केले. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

7 months ago | [YT] | 0

Marathi dev 97

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांची प्रतिक्रिया

भारताच्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी 'भ्याड हल्ले' करण्यात आले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी लिहिलंय की, या युद्धजन्य कृत्याला कडक प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि ते प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं आहे की, पाकिस्तानचं सैन्य आणि जनता पूर्णपणे एकजूट आहे आणि देशाचं मनोबल उंचावलेलं आहे.

शाहबाज शरीफ म्हणाले की, "पाकिस्तानी सैन्य आणि राष्ट्राला शत्रूशी कसं सामोरं जायचं? हे चांगलंच माहीत आहे. आम्ही त्यांचा वाईट हेतू कधीही यशस्वी होऊ देणार नाही."

पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हल्ल्याचा निषेध

पाकिस्ताननं भारताकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच, म्हटलंय की, या हल्ल्यात तीनजण ठार झाले आहेत. पाकिस्तान म्हणालंय की, "काही काळापूर्वी, 'कायर शत्रू'नं बहावलपूरच्या अहमद पूर्व भागात, सुभानुल्लाह मशीद, कोटली आणि मुझफ्फराबाद इथे तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत.", असं इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (डीजी आयएसपीआर) महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले आहेत.

7 months ago | [YT] | 0

Marathi dev 97

भारतीय वायुदलानं (Indian Air Force) आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक (Air Strike) करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं.

उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

भारतानं दहशतवादाविरुद्धच्या लढाईला एक नवं वळण देत 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही सेना, वायुदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत, भारतीय वायूदलानं पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष्य साधत हल्ले केले. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

7 months ago | [YT] | 0