The Smart Gruhini World 2

Hello friends. Me Aarti karve Patil


The Smart Gruhini World 2

♥️♥️Shree Swami Samarth ♥️♥️♥️♥️♥️♥️ माझी मान ताठ कां?

एकदां विठोबा व रखुमाई सहज बोलत असतां पंढरपूरला येणाऱ्या यात्रेकरूंचा विषय निघाला. रखुमाई म्हणाली, 'आज मी इतकीं वर्षे पहातें आहें, हजारों भक्त तुमच्या दर्शनाला येतात, पण तुमची आपली मान ताठ ! हें तुम्हाला शोभतें कां?' त्यावर विठोबा म्हणाले, 'अग, दर्शनाला हजारों नव्हे लाखों लोक येतात ही गोष्ट खरी, पण माझ्याकरितां कोणीच येत नाहीं. म्हणून मी मान ताठ करून आणि कमरेवर हात घेऊन स्वस्थ उभा असतों.' रखुमाईला हें म्हणणें पटेना. तेव्हां असें ठरलें कीं, जवळ आलेल्या आषाढीला रखुमाईनें सकाळपासून संध्याकाळपर्यंत विठोबाच्या बाजूला बसून दर्शनाला येणारे लोक बघायचे. ठरल्याप्रमाणें आषाढी एकादशीच्या दिवशीं रखुमाई गाभाऱ्यामध्यें एका कोपऱ्यांत बसली. दर्शन सुरू झालें. एक भक्त आला, त्यानें पायावर डोके ठेवलें व म्हणाला, 'देवा, लग्न होऊन फार दिवस झाले, अजून कांहीं मूलबाळ नाहीं! तेवढी कृपा कर.' दुसरा भक्त आला, त्यानें पायांवर डोकें ठेवलें व तो म्हणाला, 'देवा, फार दिवस झाले, बरें वाटत नाहीं. तेवढें बरें वाटूं दे. ही कृपा कर.' तिसरा म्हणाला, 'देवा, काय करावें, जवळ पैसा नाहीं. नोकरी लागू दे.' चवथा म्हणाला, 'देवा, दोन बायका मेल्या; तिसरी केली आहे, ती तरी जगू दे' पांचवा म्हणाला, 'देवा लोक भारी निंदा करतात. चार लोकांत मान्यता दे.' सहावा म्हणाला, 'देवा, म्हैस हरवली आहे ती सांपडू दे.' सातवा म्हणाला, 'देवा, कोर्टात खटला चालू आहे. तो माझ्यासारखा होऊ दे.' अशा रीतीनें पुरुष काय किंवा स्त्रिया काय, अक्षरशः हजारों माणसें पाया पडून गेलीं. शरीराचा रोग, पैसा, मूलबाळ, मान्यता वगैरे गोष्टींच्या पलीकडे एकानेंहि कांहीं मागितलें नाहीं. त्याच त्याच गोष्टी मागितलेल्या पाहून रखुमाईला देखील कंटाळा आला. ती जांभया देऊ लागली. रात्रीचे अकरा वाजले. दर्शन घेणारांची गर्दी संपली. अगदीं शेवटीं एक गरीब मनुष्य दर्शनास आला. त्याच्या अंगावर धड कपडेहि नव्हते. तो देवाजवळ आला. त्यानें देवाच्या तोंडाकडे पाहिलेंच नाहीं, चरणांवर मस्तक ठेवून तो म्हणाला, 'देवा! ही जोडी (हे चरण) माझ्या हृदयांतून हलू देऊ नकोस!' हे शब्द ऐकल्याबरोबर विठोबानें मान खाली केली आणि त्याला मोठ्या प्रेमानें आलिंगन दिलें. रखुमाईकडे पाहून देव म्हणाले, 'पाहिलेंस ना ! आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इथें उभा आहें. किती लोक दर्शनाला येऊन गेले, पण माझ्यासाठींच कोणी आला असेल तर तो हा एकटाच ! म्हणून माझी मान ताठ असते.'

तात्पर्य - भगवंतासाठींच, भगवंत पाहिजे म्हणून भक्ति करणारा लाखांमध्यें एखादाच असतो; पण खरी भक्ति ती हीच समजावी. आपण नामाकरितां नाम घ्यावें. राम ठेवील त्यांत समाधान मानावें. भगवंत हा प्रपंचासाठीं साधन बनवू नये; तो साध्य असावा.

1 day ago | [YT] | 4

The Smart Gruhini World 2

🪷🪷🌹 Shree Swami Samarth❤️🌹🪷🪷
_*चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी, चुकीच्या व्यक्तीवर, चुकून विश्वास ठेवल्याने, चुकांच्या चुकांचा ढीग लागतो आणि हीच चूक वेळ निघून गेल्यावर चुकीच्या वेळेस आपल्या लक्षात येते...*_
🪷🪷🌹❤️🌹🪷🪷

6 days ago | [YT] | 3

The Smart Gruhini World 2

*ये लाल लाल लुगड्याला ग*
*आई तुझ्या हिरवा पदर ग*
*बाय त्याला चांदीची झालर*
*आई त्याला मोत्याचा डोलार*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*!!आई माऊलीचा उदो उदो!!*
🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻

2 weeks ago | [YT] | 8

The Smart Gruhini World 2

आपण नेहमीच इतरांना जपायचा प्रयत्न करतो… नात्यांसाठी झुकतो, समजून घेतो, माफ करतो, स्वतःला मागे ठेवतो. पण कधीतरी थांबून हा प्रश्न विचारणं फार गरजेचं असतं — आपल्याला कोण जपत आहे? प्रत्येक नातं हे एकतर्फी त्यागावर टिकत नाही. आपणच कायम जपायचं, आपणच समजून घ्यायचं, आणि समोरच्याने आपल्याकडे गृहीत धरून पाहायचं… अशा नात्यांमध्ये हळूहळू आपली किंमत कमी होत जाते. आपण माणूस आहोत, भावना असलेले. आपल्यालाही थकवा येतो, दुखणं होतं, आधार हवा असतो. जिथे आपली शांतता जपली जात नाही, जिथे आपल्या भावना वारंवार दुर्लक्षित होतात, तिथे फक्त “आपणच जपून ठेवणं” ही मजबुरी बनते, नातं नाही. खरं नातं तेच असतं जिथे तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होते, तुमच्या दुःखाची चिंता केली जाते, आणि तुमच्या मनाची काळजी घेतली जाते. जिथे तुम्ही तुटत असताना कोणी तरी तुम्हाला सावरायला पुढे येतं. म्हणूनच… प्रत्येकाला जपायची जबाबदारी आपलीच असते असं नाही. काही लोक आपल्यासाठी नाहीत, ते फक्त आपल्या सवयीसाठी असतात. स्वतःलाही जपा. स्वतःच्या भावनांनाही महत्त्व द्या. कारण जे तुम्हाला जपत नाहीत, त्यांना सतत जपत राहणं हे प्रेम नाही… ते स्वतःवर केलेलं अन्याय आहे.#explorepage #marthiwrite #marathistatus #marathimotivational #facebookviral #facebookpost #FacebookPage #newpost #suvichar #marathistatus #marathi #marthiwrite #marathilove #marathistatus #marathimotivational #marathicouple #prem #maharashtra #maharashtrian #marathireels #marathimulgi #marathisong #quotes #quotesdaily #quotestoliveby #marathimotivational #marathiquotes #suvichar

2 weeks ago (edited) | [YT] | 2

The Smart Gruhini World 2

*_कुणी बोलायला नसल्यावर कळतं एकटेपणा काय असतो.आपण सगळ्यांच गोष्टी ऐकतो पण आपलं ऐकायला कुणी नसतं,मनातल्या हजार गोष्टी सांगाव्या वाटतात पण हक्काचं कुणीच नसतं..._* Shree Swami Samarth

🪷🪷 *शुभ सकाळ* 🪷🪷

3 weeks ago | [YT] | 2

The Smart Gruhini World 2

आपल्या लोकजीवनात अनेक दैवतांना मानाचं स्थान असतं पण काही देवता या केवळ एखाद्या वेळीच सन्मानाला पात्र ठरतात एरव्ही त्यांचा नामोल्लेख हा कायमच उपरोधाने होतो. अशीच सर्वांच दैव लिहीणारी पण स्वतः मात्र या उपरोधाच्या बाबतीत दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजे सटवाई अर्थात षष्ठी !

षष्ठी अर्थात सटवाई ही मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंशापासून प्रगट झाली म्हणून तीचं नाव षष्ठी . ती विष्णूमाया रूपिणी आणि ब्रम्हदेवाची मानसकन्या आहे तीला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात. बाळाचं दैव लिहीणारी देवी म्हणून तीचा लौकीक आहे. मांजर हे तिचं वाहन आहे‌ जन्मानंतर पाचव्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते महाराष्ट्रात पाचव्या दिवशी संध्याकाळी तर गुजरात मध्ये सहाव्या दिवशी षष्ठी पूजन करतात. कृत्य दिवाकर ग्रंथात म्हटल्या प्रमाणे बाळाच्या जन्मानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी संध्याकाळी, रात्रीच्या पहिल्या यामी( दिवसांचा तो प्रहर रात्रीचा तो याम म्हणुन ती यामिनी) बाळाच्या बापाने सुस्नात होऊन देवता स्मरण संकल्प युक्त असा कलश मांडून त्यावर ताम्हण ठेवावे. त्यात तांदळाचे अष्टदल काढून आठ कोपऱ्यात अनुक्रमे विघ्नेश ( गणपती) जन्मदा, जिवंतिका,शस्त्रगर्भा ,स्कंद ( कार्तिक) राका , अनुमती,सिनीवाली,कुहू, वातघ्नी या देवता सुपारीवर , शस्त्रावर शिशुरक्षिणी आणि मूर्तीवर ( चांदी किंवा सोन्याची पुतळी ) यांचं आवाहन करून विघ्नेशादी आवाहित देवताभ्यो नमः असं म्हणून षोडषोपचार पूजन करावे आणि मग प्रार्थना करावी

संपुज्य क्षेत्रस्याधिपती देवी सर्वारिष्ट विनाशिनी बलीं गृहाण मे रक्ष क्षेत्रं सूतींच बालकम् ( अर्थ या जागेची मालकीण असणारे हे देवी हा बली घे आणि या सुतिका घराचं आणि बाळाचं रक्षण कर. इथे बली

म्हणजे उडिद घातलेला भात याला अनुसरून कोल्हापूर भागात काही ठिकाणी थेट मुंडी पाय ठेवले जातात. ) त्या नंतर या आवाहित देवांना विनंती करतात

जननी सर्व भूतानाम् बालानाम् च विशेषतः नारायणी स्वरूपेण बालं रक्ष मे सर्वदा (अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळाला आईसारखे सांभाळणारी नारायणी स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचं रक्षण करो ).

ग्रह भूत पिशाच्चेभ्यो डाकीनी योगिनीषुच मातेव रक्ष मे बालं श्वापदे पन्नगेषुच

गौरीपुत्रो यथा स्कंदः शिशुत्वे रक्षितः पुरा तथा मप्याययं बाल: षष्ठिके रक्ष ते नमः

( म्ह. हे षष्ठी जसं पूर्वी तू गौरीपुत्र कार्यिकेय बाळ असताना त्याच सर्व संकटातून रक्षण केलस तसं माझ्या या बाळाचं ग्रह भूत पिशाच्च डाकिनी योगिनी जनावर साप नाग यांपासून आई सारखे रक्षण कर )

हा झाला शास्त्रोक्त विधी पण लोकाचारात सुतिका घर म्हणून न्हाणीत शेणाचा गोळा थापून त्यावर सटवाई चिकटवून तिची पूजा केली जाते त्यावेळी तिथे बाळाच्या नशिबात जे जे लिहावं असं वाटतं त्या वस्तू उदा पाटी पेन्सिल पेन पैसे अशा वस्तू पुजल्या जातात ( यावरूनच एखादं माणूस प्रसंग वस्तू सारखी सारखी आयुष्यात येत असेल तर पाचवीला पुजलेला असा वाक्प्रचार रूढ झाला आहे) काही घरात वरच्या आवाहित देवतांच्या प्रतिनिधी म्हणून पाच कुमारिका पूजन करून त्यांना बाळाला ओलांडून जायला सांगतात. पाचवीच्या पुड्यात असलेल्या ओवा जायफळ मुरडशेंग वावडिंग खारीक बाळंतशेप यांची पूजा करतात खरंतर ही बाळाला लागणारी रोजची औषधी गुटी आहे. बाळंतिणीला पथ पालटणी ( पथ्यात आहारात बदल)म्हणून पाच भाज्या एकत्र करून खायला घालतात. असा हा पाचवीचा सोहळा! यानंतर बाळ सव्वा महिन्याच झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात . ही सटवाई कधीही गावाबाहेर असते म्हणून एखादी महिला उच्छृंखल वागत असेल तर तिला सटवी म्हणतात. कोल्हापूरात अशी रानसटवाई हुतात्मा पार्क येथे आहे. खरंतर या बागेच नाव जुन्या कागदपत्रांत सटवाईची बाग असंच येत

सटवाईच्या या स्थानाबद्दल पुन्हा केव्हातरी ..

श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्नसशक्तिक

सोबत मुळगावकर यांनी रेखाटलेली सटवाई बाळाचं नशीब लिहीताना
#सटवाई

3 weeks ago | [YT] | 2

The Smart Gruhini World 2

स्वाती चाळिशीतली, दोन मुलांची आई. नवरा बँकेत नोकरीला. संसार वाईट नव्हता. भांडणंही फार नव्हती. पण काहीतरी कमी होत ते म्हणजे संवाद.

नवरा घरी यायचा, जेवायचा, टीव्हीसमोर बसायचा आणि झोपायचा. स्वाती दिवसभर घर, मुलं, सासू-सासरे, आणि अधूनमधून स्वतःशी बोलणं.

एक दिवस तिने फेसबुकवर जुना कॉलेज ग्रुप जॉइन केला. सुरुवातीला फक्त फोटो, शुभेच्छा, आठवणी. तिथेच संदेश आला.

“ओळखलंस का?”

नाव पाहिलं आदित्य. कॉलेजमध्ये तिच्या मागे फिरणारा, पण तिने कधी गंभीरपणे न घेतलेला.

“अरे वा! किती वर्षांनी!” तिने उत्तर दिलं.

पहिले दोन-तीन दिवस साध्या गप्पा. मग रोजच. सकाळचा “गुड मॉर्निंग” आणि रात्रीचा “झोपलीस का?” असा क्रम सुरू झाला.

आदित्य ऐकायचा. ती बोलायची.

घरात कोणी विचारलं नव्हतं इतक्या वर्षांत, “तुला काय आवडतं?”

तो विचारायचा.

स्वातीला जाणवू लागलं ती पुन्हा हसते आहे. फोन हातात घेताना चेहरा उजळतो आहे. तिच्या नवऱ्याने लक्षात घेतलं.

“खूप फोनवर असतेस हल्ली.”

“असं काही नाही,” ती म्हणाली. पण तिलाही कळत होतं काहीतरी आहे.

एक दिवस आदित्य म्हणाला,

“आपण भेटू का? फक्त कॉफीसाठी.”

तिचं मन धडधडलं. चुकीचं आहे हे तिला ठाऊक होतं. पण ती गेली.

कॉफी शॉपमध्ये बसताना तिला अपराधी वाटत होतं. पण त्याच्याशी बोलताना सगळं विसरायला झालं. तो तिच्या डोळ्यांत पाहून म्हणाला,

“तू अजूनही तशीच आहेस.”

ती वाक्य तिने वर्षानुवर्षं ऐकली नव्हती.

त्या भेटीनंतर मेसेज वाढले. फोटो. आठवणी. मग हळूहळू तक्रारी.

“तुझा नवरा तुला समजत नाही.”

“तू यापेक्षा जास्त deserve करतेस.”

प्रेमाचा गोडवा हळूहळू वेगळ्या दिशेने वळू लागला.

ती त्याच्याशी भांडायची, रुसायची, वाट पाहायची.

एक दिवस आदित्य दोन दिवस गायब राहिला. मेसेज नाही, फोन नाही.

ती बेचैन झाली. मनात राग, भीती, शंका.

तिसऱ्या दिवशी त्याचा मेसेज आला

“सॉरी, बिझी होतो.”

ती तेव्हा प्रथम थांबली.

तिने स्वतःला विचारलं

मी काय करते आहे?

हे प्रेम आहे? की लक्ष मिळाल्याची सवय?

त्या रात्री तिच्या नवऱ्याने सहज विचारलं,

“उद्या सुट्टी आहे. आपण सगळे बाहेर जाऊया का?”

खूप वर्षांनी तो स्वतःहून काही सुचवत होता.

स्वातीला जाणवलं तिचं घर मोडलेलं नव्हतं. फक्त धुळीने झाकलेलं होतं.

तिने आदित्यला मेसेज केला.

“आपण इथेच थांबूया. हे योग्य नाही.”

तो लगेच उत्तरला नाही.

आणि यावेळी तिला वाट पाहण्याची गरजही वाटली नाही.

प्रेमाचं जाळं असंच असतं. सुरुवातीला उबदार. मग घट्ट. आणि कळत नकळत गुंतवणारं.

स्वातीने फोन बाजूला ठेवला.

दुसऱ्या दिवशी ती कुटुंबासोबत बाहेर गेली. सर्व समस्या सुटल्या नाहीत. संवाद अजूनही थोडा कमी होता. पण ती पळत नव्हती आता.

तिला समजलं

प्रेमाची भूक खरी असते.

पण प्रत्येक गोड शब्द प्रेम नसतो.

कधी कधी जाळ्यातून बाहेर पडणं म्हणजे प्रेमाला नाकारणं नाही,

तर स्वतःला वाचवणं असतं.

जर ही कथा वाचताना कुठे स्वतःचा प्रतिबिंब दिसलं असेल,

तर लक्षात ठेवा

भावना चुकीच्या नसतात,

निर्णय चुकू शकतात.

आणि प्रत्येक जाळं तोडायला उशीर झालेला नसतो.

उशीर होण्याआधी च ते जाळ तोडा कारण याचे परीणाम फार वाईट होतात..
. Shree Swami Samarth

3 weeks ago | [YT] | 8

The Smart Gruhini World 2

गर्दीचा महापूर आणि एक चूक

सकाळची वेळ होती. दादर स्टेशनवर मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रचंड गर्दी होती.

रोहितला कॉलेजला पोहोचायला उशीर झाला होता.

समोरून लोकल आली. ती आधीच खचाखच भरलेली होती.

गाडी थांबली तशी लोकं उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी तुटून पडले. रोहितने हिंमत केली आणि डब्याच्या दांड्याला पकडलं.

पण गर्दीचा रेटा इतका भयानक होता की, त्याचा हात सटकला.

त्याचा तोल गेला आणि...

प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यामधल्या त्या जीवघेण्या गॅपमध्ये (Gap) रोहितच शरीर सरकलं! लोकांनी आरडाओरडा केला, "अरे पडला! पडला!"

पण तोपर्यंत गार्डने हिरवा झेंडा दाखवला होता आणि ट्रेन सुरू झाली होती. थरार (The Death Trap): रोहित अर्धा प्लॅटफॉर्मवर आणि अर्धा खाली रुळांच्या बाजूला लटकत होता.

ट्रेनने वेग पकडला. खड... खड... खड...

लोखंडी चाकांचा आवाज त्याच्या कानाच्या अगदी जवळ येत होता.

त्याला समजलं की आता आपले तुकडे होणार.

त्याने डोळे गच्च मिटले. त्याला फक्त आपल्या आईचा चेहरा आठवला, जी रोज त्याला सांगायची, "रोहित, जपून जा आणि स्वामींचे नाव घे."

तो किंचाळला: "स्वामी... वाचवा...!!!"

ट्रेन त्याच्या शरीराशी घासून पुढे जात होती. त्याचे कपडे फाटत होते. त्याला ओढलं जात होतं. मृत्यू फक्त काही इंचावर होता.

चमत्कार (The Invisible Support): ज्या परिस्थितीत माणूस ट्रेनखाली कापला जातो किंवा चाकाखाली येतो... तिथे एक अशक्य गोष्ट घडली.

रोहितला जाणवलं की, कोणीतरी त्याला खालून, रुळांच्या बाजूने जोरात आधार दिला आहे. ते हात माणसाचे वाटत नव्हते. त्या स्पर्शात एक प्रचंड ताकद होती. त्या हातांनी रोहितला ट्रेनच्या चाकांपासून दूर, भिंतीकडे दाबून धरलं होतं. ट्रेनचे डबे वेगाने पुढे जात होते, पण रोहितला एक ओरखडा सुद्धा लागू दिला जात नव्हता. त्या अंधारात, त्या खडखडाटात रोहितला कानात एक स्पष्ट आवाज आला: भिऊ नकोस... मी धरलंय तुला!"

क्लायमॅक्स (The Rescue):

ट्रेन निघून गेली.

प्लॅटफॉर्मवरचे लोकं धावत आले. त्यांना वाटलं आता फक्त रोहितचा मृतदेहच मिळेल. पण जेव्हा त्यांनी खाली वाकून पाहिलं... रोहित ट्रॅकच्या बाजूला असलेल्या त्या लहानशा जागेत सुरक्षित उभा होता! तो थरथरत होता, पण जिवंत होता.

लोकांनी त्याला हात देऊन वर खेचलं. एका काकांनी त्याला पाणी दिलं. "बाळा, तुझे पुनर्जन्म झाला आज! या गॅपमध्ये पडलेला माणूस कधीच अख्खा वर येत नाही."

रोहित रडू लागला. त्याने खाली रुळांकडे पाहिलं, जिथे त्याला त्या हातांनी वाचवलं होतं. पुरावा आणि गूढ (The Divine Proof):

रोहितने आपले कपडे झटकले. त्याचा शर्ट मळला होता, फाटला होता. पण त्याच्या पाठीवर... जिथे त्याला त्या 'अदृश्य शक्तीने' दाबून धरलं होतं...

तिथे काळ्या ग्रीसचे किंवा चिखलाचे डाग नव्हते.

तर त्याच्या पांढऱ्या शर्टवर हळद आणि कुंकवाचे (Turmeric & Kumkum) दोन स्पष्ट मोठ्या हातांचे ठसे उमटलेले होते!

रेल्वे ट्रॅकवर हळद-कुंकू कुठून येणार? तिथे फक्त घाण आणि ऑईल असते.

ते ठसे बघून स्टेशनवरची गर्दी शांत झाली.

तिथे उपस्थित असलेल्या एका रेल्वे पोलिसाने आपली टोपी काढली आणि म्हणाला: बेटा, तुला वाचवणारा कोणी सामान्य माणूस नव्हता. तू नशीबवान आहेस. साक्षात अक्कलकोटच्या राजाने तुला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय." रोहितने त्या हातांच्या ठश्यांवर डोकं टेकवलं. त्याला अजूनही त्या आवाजाचा भास होत होता - "भिऊ नकोस, मी धरलंय तुला!"

हम गया नही, जिंदा है

4 weeks ago | [YT] | 4

The Smart Gruhini World 2

"जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल.!!""🤞🥰🤗
🙏शुभ रात्री🙏

4 weeks ago | [YT] | 6

The Smart Gruhini World 2

रात्रीचे ११ वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.

पुण्यातल्या एका पॉश सोसायटीत राहणाऱ्या 'रोहन' ने आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी एक महागडा 'चॉकलेट केक' ऑर्डर केला होता.

पावसामुळे डिलिव्हरीला उशीर होत होता. रोहन अस्वस्थ झाला होता. त्याने रागाने कस्टमर केअरला फोन लावला आणि खूप सुनावले.

शेवटी ११:३० वाजता दारावरची बेल वाजली.

रोहनने रागाने दरवाजा उघडला.

समोर एक ५०-५५ वर्षांचा म्हातारा माणूस उभा होता. अंगावर रेनकोट असूनही तो पूर्ण भिजला होता. हातातल्या केकचा बॉक्स वाचवण्यासाठी त्याने त्याला छातीशी गच्च कवटाळून धरलं होतं.

रोहन ओरडला, "तुम्हाला अक्कल आहे का? वाढदिवस संपत आलाय. आता कशाला आणलाय केक? मला नकोय, घेऊन जा परत. मी ऑर्डर कॅन्सल केली आहे."

तो म्हातारा डिलिव्हरी बॉय (काका) विनवणी करू लागला, "साहेब, पाऊस खूप होता हो. माझी गाडी स्लीप झाली, पण मी केक पडू दिला नाही. साहेब, प्लीज घ्या हो. जर तुम्ही ऑर्डर कॅन्सल केली, तर याचे ८०० रुपये माझ्या पगारातून कापले जातील. माझा दोन दिवसांचा पगार जाईल साहेब."

रोहनने काहीच ऐकलं नाही. त्याने जोरात दरवाजा तोंडावर लावून घेतला. "ते मला माहित नाही, गेट लॉस्ट!"

रोहन आत गेला. पण त्याला बाहेर काहीतरी आवाज आला. कुतूहल म्हणून त्याने खिडकीतून खाली पाहिलं.

तो डिलिव्हरी बॉय अजूनही तिथेच जिन्यावर बसला होता.

रोहनला वाटलं तो आता काहीतरी तमाशा करेल.

पण त्या काकांनी तसं काहीच केलं नाही.

त्यांनी तो केकचा बॉक्स उघडला.

खिशातून एक 'मेणबत्ती' काढली आणि त्या केकवर लावली.

त्यांनी ती मेणबत्ती पेटवली. बाहेर पाऊस आणि वारा होता, म्हणून त्यांनी दोन्ही हातांनी त्या ज्योतीला आधार दिला.

ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटले, टाळ्या वाजवल्या आणि त्यांनी केक कापला.

हे बघून रोहनला धक्का बसला. तो धावत खाली गेला.

"काका, हे काय चाललंय? तुम्ही केक का कापताय?"

त्या काकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी रोहनकडे पाहिलं आणि म्हणाले:

*"साहेब, रागवू नका. आज माझ्याही मुलीचा वाढदिवस होता.

ती ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कॅन्सरने वारली.

तेव्हा माझी परिस्थिती नव्हती, म्हणून मी तिला कधीच केक घेऊन देऊ शकलो नाही. ती केक मागत होती, आणि मी तिला फक्त बिस्किटं खाऊ घातली होती.

आज तुम्ही हा केक 'कॅन्सल' केला... तेव्हा मला वाटलं की देवाचीच इच्छा असावी.

म्हणून मी हा केक कापला आणि माझ्या 'राणी'ला हॅप्पी बर्थडे बोललो.

साहेब, तुमचे पैसे मी भरेन, पण आज मला माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करू दिल्याबद्दल तुमचे आभार."*

हे ऐकून रोहनच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं.

ज्या केकला तो आपल्या 'इगो' मुळे नाकारत होता, तोच केक एका बापासाठी त्याच्या मृत मुलीची आठवण होता.

रोहनने काकांचे हात धरले. त्यांना घरात नेलं, आणि तोच केक आपल्या मुलीच्या हस्ते कापायला लावला.

त्या रात्री रोहनने फक्त केकचे पैसे दिले नाहीत, तर माणुसकीचं एक असं 'टिप' (Tip) दिलं, ज्यामुळे त्या बापाच्या चेहऱ्यावर ३ वर्षांनी हसू आलं.

कधीकधी आपली 'रिजेक्ट' केलेली गोष्ट कोणासाठी तरी 'जगाचं सुख' असू शकते. डिलिव्हरी बॉयशी वागताना थोडं प्रेमाने वागा, कारण ते फक्त पार्सल घेऊन येत नाहीत, तर स्वतःच्या घराची जबाबदारी आणि पोट घेऊन पावसात भिजत येत असतात.

Shree Swami Samarth

4 weeks ago | [YT] | 2