जनसामान्यांचा आवाज
भूमिपुत्र हे एक युट्यूब चॅनल आहे. आम्ही जन आंदोलने, जनतेच्या हक्कांसाठी लढणारे, पक्ष, संघटना व कार्यकर्ते यांकडून आलेले व्हिडिओ आहे तसेच अपलोड करून जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही स्वतः ला कोणतेही न्यूज चॅनल समजत नाही. जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि कायम राहणार आहोत.
Bhumiputra
थकीत ऊस बिलासाठी माजलगाव येथे जिल्हाधिकारी यांची गाडी अडवण्यात आली आहे.
#युवा_माजलगाव
3 days ago (edited) | [YT] | 54
View 0 replies
Bhumiputra
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा चंद्रपूर च्या नेतृत्वात महागाईच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१६ मार्च २०२६ रोजी निदर्शने आंदोलन करण्यात आली. जिल्हा सचिव कॉ. राजेश पिंजरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या निदर्शनात सचिव कॉ. पंजाबराव, बुलढाणा, जेष्ठ कामगार नेते कॉ. रमेशचंद्र दहिवडे, किशोर जामदार, शारदा लेनगुरे, वामन मानकर, अरुण भेलके व, सुरेखा तितरे व संध्या खनके उपस्थित होते.
3 days ago | [YT] | 123
View 0 replies
Bhumiputra
संविधानाची शपथ घेऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्यावर गृहमंत्री कारवाई कधी करणार?
हा संविधान चा अवमान आहे. नाशिक शहरात कुंभ मेळा हरित कुंभ व्हावा यासाठी प्रशासन, शासन राबत असताना मात्र राज्य सरकार चे मंत्री नाशिक शहरात येऊन धार्मिक जेहाद ची भाषा करत आहेत. याची दखल मा. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्त यांनी घेतली पाहिजे. भारतीय संविधान चे मूल्य जोपासणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र संविधानिक पदावर असताना लोकप्रतिनिधी व मंत्री धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे असंवैधानिक आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. शासनाने दखल घ्यावी अशी मागणी करत आहोत.
_ राजू देसले संविधान प्रेमी नाशिककर
6 days ago | [YT] | 46
View 0 replies
Bhumiputra
संविधानाची शपथ घेऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्यावर गृहमंत्री कारवाई कधी करणार?
हा संविधान चा अवमान आहे. नाशिक शहरात कुंभ मेळा हरित कुंभ व्हावा यासाठी प्रशासन, शासन राबत असताना मात्र राज्य सरकार चे मंत्री नाशिक शहरात येऊन धार्मिक जेहाद ची भाषा करत आहेत. याची दखल मा. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्त यांनी घेतली पाहिजे. भारतीय संविधान चे मूल्य जोपासणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र संविधानिक पदावर असताना लोकप्रतिनिधी व मंत्री धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे असंवैधानिक आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. शासनाने दखल घ्यावी अशी मागणी करत आहोत.
_ राजू देसले संविधान प्रेमी नाशिककर
6 days ago (edited) | [YT] | 63
View 4 replies
Bhumiputra
ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या व काम करत असताना येत असलेल्या अडचणीबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी रोहयो सीमा अहिरे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
मागण्या पुढीलप्रमाणे :
1) रोजगार हमी योजनेवर काम करत असलेल्या मजुरांची मजुरी वेळेत होत नसल्याने ग्रामरोजगार सेवक हा स्थानिक कर्मचारी असल्याने मजुरांकडून त्रास होत आहेत तरी तो त्रास कमी होण्यासाठी मजुरी लवकरात लवकर मिळावी.
2) रोजगार हमी योजनेत बदल झाल्यास ग्रारोजगार सेवक यांची दरमहा मीटिंग व योजनेबाबत चे ड्रेनिंग बऱ्याच तालुक्यात होत नाही त्या तालुक्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी.
3)कुशल देयके गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना लाभार्थी व ग्रामस्थांकडून त्रास होत आहेत तरी सबंधित कर्मचारी कडून प्रलंबित आहेत त्यावर तत्काळ कार्यवाही होऊन कुशल देयक मिळावी.
4) जिल्ह्यात बऱ्याच पंचायत समिती मध्ये ग्रारोजगार सेवकांना विश्वास न घेता किंवा परस्पर बाह्यस्थ व्यक्ती किंवा ठेकडेदार यांच्याकडे कार्यारंभ आदेश व हजेरी पत्रक दिले जातात अशा पंचायत समितीच्या कर्मचारी वर कारवाही व्हावी अन्यथा तेथील ग्रामरोजगार सेवक यांना कमी करून संबंधित ठेकेदार व बाह्यस्त व्यक्तीची निवड करावी.
5) पंचायत समितीला रोजगार हमी विभागाचे काम बघण्यासाठी विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करावी काम करण्यास सुलभ होईल.
6) सार्वजनिक काम करण्यासाठी अथवा 90/10,95/5, मिशन भगीरथ हे काम करताना बऱ्याच पंचायत समितीमध्ये रोजगार हमी विभागाचे तांत्रिक अधिकारी व क्लार्क डाटा ऑपरेट किंवा भागीदारी पद्धतीने किंवा जवळच्या व्यक्तीच्या नावाने काम करत असतात तरी संबंधित तांत्रिक अधिकारी यांची सखोल चौकशी करून कार्यवाही व्हावी तसेच नाशिक जिल्ह्यातील त्या योजनेची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी.
7) apo, cdo, to यांना तीन वर्षे व त्यापेक्षा जास्त दिवस एकच ठिकाणी काम करत असणारे कर्मचारी यांची तात्काळ बदली व्हावी कारण संबंधित कर्मचारी वारंवार तिथे राहिल्यामुळे त्यांचे लाभार्थी व इतर लोकांची संबंध जवळीकतेचे झाल्यामुळे भागीदारी स्वरूपात काम करणे स्वतः दुसऱ्यांच्या नावावर काम करणे काम मंजुरी साठी पैशाची मागणी करणे ग्रामरोजगार सेवक यांना तुच्छतेची वागणूक देऊन त्यांना अपमानित केले जात असते असे विविध प्रकार जिल्ह्यात होत आहेत तरी आपणास विनंती की तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांची बदली व्हावी.
8) 3 ऑक्टोबर 2024 च्य शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांना यांना मानधन लागू करा . 4 महिन्यापासून थकीत मानधन ग्रामरोजगार सेवकांना त्वरित द्या
अन्यथा आयटक वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी कॉ राजू देसले राज्य अध्यक्ष, कॉ.अनिल बुचकुल जिल्हा अध्यक्ष, बाबासाहेब कदम जिल्हा कार्यधक्ष, कृष्णा चौधरी जिल्हा उप अध्यक्ष, नामदेव धांडे तालुका अध्यक्ष नाशिक, देवराम उघडे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष, राजेश पवार मालेगाव तालुका अध्यक्ष, महेश चकोर नादगाव तालुका अध्यक्ष , राजाराम शिरसाठ तालुका सचिव सिन्नर, कुंडलिक महाले तालुका अध्यक्ष सुरगाणा , देवराम गोडे तालुका अध्यक्ष इगतपुरी, रहाणे निफाड तालुका अध्यक्ष , सुनील उबाळे चांदवड तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.
6 days ago (edited) | [YT] | 35
View 0 replies
Bhumiputra
शिरपूर येथे जागतिक महिला दिन थाटात साजरा
दि. १२ मार्च रोजी महिलांनी केले कलेचे सादरीकरण
शिरपूर : जगातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांना बरोबरीचा दर्जा मिळून त्यांना समान संधी, समान वेतन, मतदानाचा अधिकार आदी हक्क मिळावे म्हणून अमेरिकेत महिलांनी प्रदीर्घ संघर्ष केला आणि त्यातून महिलांना जागतिक स्तरावर ओळख प्राप्त होऊन महिला ह्या फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच आहेत हा भ्रम मोडीत निघाला आणि महिलांनाही पुरुषानं इतकेच सामर्थ्य असून त्या उत्पादन प्रक्रियेत तेव्हढ्याच महत्वाचा आहेत आणि वेळेप्रसंगी पुरुषांचा समोर राहू शकतात हे दाखवून दिले आहे. त्यामुळे जगात महिला दिन ८ मार्च रोजी साजरा व्हायला लागला. ह्यादिवशी अख्या जगात महिला आपल्यात असलेल्या सामर्थ्याचे, कला गुणांचे सादरीकरण करून आम्ही तसूभरही कमी नाही आहोत हे दाखवून देत असतात. हाच जागतिक महिला दिन शिरपूर येथे येथील महिलांनी एकत्र येत मोठ्या थाटात साजरा केला.
दिनांक १२ मार्च रोजी शिरपूर ग्रामपंचायतीचा पटांगणावर जागतिक महिलादिनांचा कार्यक्रम सुवर्णा बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व किरण देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळेस ज्योत्स्ना रामटेके, वेणु झोडे, सुरेखा ढेंगळे, सरपंच गणेश डाहुले, उपसरपंच मोहित चचडा, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद मंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमात गावातील महिलांनी, मुलींनी नाटिका, नृत्य, सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केले. तसेच महिला दिनानिमित्त किरण देरकर, सुवर्णा बोंडे व पाहुण्यांनी यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमती बोधे यांनी केले तर सूत्रसंचालन आशू मत्ते व आभार सोनू रामटेके यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने मनीषा ठमके मयुरी बोधे, कोमल ठावरी, मनीषा बोधे, नंदा डवरे, लता फेथफुलवार, लता गोरे, शांताबाई सलाम, कांचन ठाकरे, ज्योती खोबरे, संगीता ननकटे, वृंदा मंदे, माधुरी मंदे, प्रेमाली निकोडे, शितल गोरे, अर्चना ननकाटे, ललिता सिडाम, जया खोबरे, काजल गणवीर आदी व गावातील अनेक स्त्रिया उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी केले.
6 days ago | [YT] | 21
View 0 replies
Bhumiputra
कोसंबी खडसमारा येथील जलशुद्धीकरण केंद्र आरोचे पाणी सुरू; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या प्रयत्नाला यश!
ब्रम्हपुरी : तालुक्यातील कोसंबी खडसमारा येथे मागील वर्षी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून जलसुद्धीकरण संयंत्र (R.O.ATM) चालू करण्यात आले होते त्यामुळे स्थानिक जनतेला पिण्याचे शुद्ध थंड पाणी मिळू लागल्याने गावात आनंदाचा वातावरण निर्माण झाले होते परंतु मागील 15 दिवसा पासून सदरील जलसुध्दीकरण संयंत्रात बिघाड झाल्याने तसेच त्या संबंधातील वीज बिल न भरल्याने आरोचे पाणी मिळणे बंद झाले त्यामुळे स्थानिक नागरिकांना 6 ते 7 किलो मीटर अंतरावरील आवळगाव,वांद्रा, भुज येथून पायपिट करून पाणी आणावे लागत होते . आरो मशीन सुरू करण्यासाठी अनेकदा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा विभाग इंजिनिअर व जलशुध्दीकरण संयंत्र बसविणाऱ्या खाजगी कंत्राटदार कडे तक्रार करूनही ते याकडे दुर्लक्ष करीत होते.
दिनांक 12 मार्च 2026 रोजी कोसंबी खडसमारा येथे आदिवासी समाजाच्या वतीने शहीद स्वातंत्रवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन कार्यक्रम व त्या अनुसंघाने गाव जेवण ठेवण्यात आले होते आणि त्या करिता उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड आरोचे पाणी आवश्यक असल्याने सरपंच संगीता जेंगटे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांच्या कडे तक्रार केली असता झोडगे यांनी तात्काळ कोसंबी खडसमारा येथे भेट देऊन जलसुध्दीकरण संयंत्र केंद्राची पाहणी करून लगेच कंत्राटदार व इंजिनिअर यांना भ्रमण ध्वनी द्वारे चर्चा करून तांत्रिक बिघाड असलेला जलसुद्धीकरण संयंत्र चालू करण्यासाठी आणि थकित वीज बिल भरून पूर्ववत कनेक्शन चालू करण्यासाठी प्रयत्न केल्याने लगेच त्याच दिवशी 1 तासाच्या आत तांत्रिक बिघाड दुरुस्ती करून थकित असलेला 4000 रु वीज बिल भरून पूर्ववत जलसुद्धीकरण संयंत्र चालू करून आरोचे थंड पाणी सुरू झाल्याने गावकऱ्यान मध्ये अतिशय आनंद वातावरण निर्माण होऊन कॉ. विनोद झोडगे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कोसंबी खडसमारा येथील सरपंच संगीता जेंगटे,ग्राम पंचायत सदक्ष दिवाकर झाडे,कुमदेव लेनगुरे, मोतीराम वाढइ, विश्वनाथ धुर्वे, नारायण पाटील बुद्धे,सुरेशजी पर्वतकर,धनराज पाटील ठाकरे,रोशन उरकूडे यासह गावातून अन्य नागरिक उपस्थित होते.
6 days ago | [YT] | 21
View 1 reply
Bhumiputra
कोसंबी खडसमारा येथे शहीद बाबुराव शेडमाके यांची १९३ वी जयंती उत्साहात संपन्न
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. विनोद झोडगे यांचे समाजाला क्रांतीचे आवाहन
ब्रम्हपुरी : शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या १९३ व्या जयंती निमित्ताने गोंडवाना समिती व आदिवासी समाज बांधव कोसंबी खडसमारा यांच्या वतीने दिनांक १२ मार्च २०२६ रोजी भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
भव्य रॅली : सकाळी ८ वाजता गावातून ढोल-ताशांच्या गजरात वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रॅली काढण्यात आली.
प्रबोधन व संस्कृती : दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत समाज प्रबोधन झाले, तर रात्री पारंपरिक गोंडी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
क्रांतीचा वारसा जपण्याचे आवाहन: मार्गदर्शन करताना कॉ. विनोद झोडगे यांनी शहीद बाबुराव शेडमाके यांच्या ऐतिहासिक संघर्षावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "१८५७ च्या लढ्यात तत्कालीन चांदा जिल्ह्यातून ब्रिटिशांविरुद्ध दंड थोपटून इंग्रज राजवट हादरवून टाकण्याचे महान कार्य शेडमाके यांनी केले. त्यांचे बलिदान आणि लढण्याची जिद्द आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजापुढील समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर आणि कृतिशील राहिले पाहिजे."
या सोहळ्याला ओविदास ऊयके, मोरेश्वर उइके, अध्यक्ष एकनाथ कोटनाक, सरपंच संगीता जेंगटे ,दिवाकर झाडे, शालुताई जुमनाके, धनराज सुरपाम,सानिया कुमरे, नामदेव वलके, गुलाब वलके, संचित वाळवे, रंजना आत्राम, वनिता उइके, जिजाबाई राऊत, छत्रपती सुरपाम, संजय गेडाम, दिलीप घोडाम, बागडे वनरक्षक, सुधाकर कुमरे यांच्यासह आवळगाव, मूडझा आणि वांद्रा परिसरातील शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.
1 week ago | [YT] | 31
View 0 replies
Bhumiputra
जागतिक महिला दिनानिम्मित घरेलु कामगारांचा सत्कार
नाशिक : नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटना (आयटक) आणि भारतीय महिला फेडरेशन, नाशिक यांच्या वतीने दिनांक १० मार्च २०२६ रोजी नाशिकरोड शाखेकडून जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कष्टकरी घरकामगार महिलांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, त्यांना संघटित होण्याची प्रेरणा मिळावी आणि संविधानिक मूल्यांची जाणीव समाजातील महिलांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून करण्यात आली. शिक्षण, समानता आणि स्त्री-मुक्तीच्या लढ्यातील सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला परिसरातील घरकामगार कष्टकरी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या पदाधिकारी कष्टकरी महिलांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या घरकामगार महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या कष्टांना आणि संघर्षाला सलाम करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला.
तसेच कार्यक्रमात संविधानिक मूल्यांवर आधारित विविध खेळ घेऊन चर्चा आयोजित करण्यात आली. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये सोप्या पद्धतीने महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याचबरोबर पितृसत्ता या विषयावरही संवाद आणि चर्चा घेण्यात आली. महिलांच्या दैनंदिन आयुष्यात पितृसत्ताक व्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, घर आणि कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणारे प्रश्न यावर महिलांनी उत्स्फूर्तपणे आपली मते मांडली. या चर्चेला उपस्थित महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि अर्थपूर्ण संवाद घडून आला.
या कार्यक्रमाला घरकामगार मोलकरीण संघटना नाशिक शहर सचिव कॉम्रेड प्राजक्ता कापडणे, शहर अध्यक्ष कॉम्रेड मीना ताई आढाव आदी उपस्थित होते. कष्टकरी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
1 week ago | [YT] | 31
View 2 replies
Bhumiputra
नंदुरबार जिल्ह्यात ५ वी अनूसुची व पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्याची बिरसा फायटर्सची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात ५ वी अनूसुची व पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी ,उप राज्याध्यक्ष गणेश खर्डे, रोहीदास वळवी, पंकज वळवी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,भारतीय संविधानाची ५ वी अनूसुची ( अनुच्छेद २४४( १) ईशान्य भारत वगळता १० राज्यातील अनूसुचीत क्षेत्राचे प्रशासन व आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करते .पेसा अंतर्गत आदिवासींच्या जल, जंगल व जमीन हक्कांची सुरक्षा करते आणि याबाबत राज्यपालांना प्रशासन नियंत्रण करण्याचे विशेष अधिकार आहेत. पेसा अंतर्गत या क्षेत्रांमध्ये ग्रामसभेला विशेष अधिकार मिळतात.पेसा अंतर्गत ग्रामपंचायतला दरवर्षी निधी मिळतो, परंतु इतर अधिकारांची अंमलबजावणी करण्यात येत नाही. हे क्षेत्र कसे चालवायचे याबाबत राज्यपालांना व्यापक अधिकार आहेत.५ वी अनूसुची ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी व त्यांच्या संस्कृती संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून नंदुरबार जिल्ह्यात ५ वी अनूसुची व पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे राज्यपाल व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे करण्यात आली आहे.
1 week ago | [YT] | 64
View 2 replies
Load more