जनसामान्यांचा आवाज


Bhumiputra

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
महाराष्ट्र राज्य समिती

२८ फेब्रुवारी

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा !

थोर शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. समाजात वैज्ञानिक शोधांबद्दल जागरूकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा,हा या दिनाचा उद्देश आहे.

#RamanEffect #NationalScienceDay

रामन इफेक्ट या शोधाची घोषणा सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

2 hours ago | [YT] | 9

Bhumiputra

लाल सलाम साथियो, संघर्ष के मैदानों में फिर मिलेंगे।

11 hours ago (edited) | [YT] | 90

Bhumiputra

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा एल्गार ४४ वर्षाची प्रतीक्षा संपवा मुख्यमंत्र्यांना धाडले निवेदन

ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक एल्गार; तहसीलवर धडकली जिल्हाप्रेमींची विराट लाट!

१९८२ चा अन्याय दूर करा; ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांना 'एसडीओ'मार्फत साकडं!

ग्रामपंचायत ते विधानसभा... आता लढा जिल्ह्याचा! संघर्ष समितीची प्रशासकीय दरबारी धडक

ब्रम्हपुरी : विदर्भाच्या विकासाचे केंद्र असलेल्या ब्रम्हपुरीला जिल्ह्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आज २७ फेब्रुवारी रोजी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर विराट मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. १९८२ पासूनचा प्रलंबित वनवास संपवण्यासाठी आता संपूर्ण ब्रम्हपुरी तालुका एकवटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.

प्रशासकीय यंत्रणा हलली; निवेदनांचा पडला पाऊस

केवळ निवेदन देऊन न थांबता, संघर्ष समितीने प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत:

आमदार विजय वडेट्टीवार: विधानसभेत या विषयावर 'तारांकित प्रश्न, उपस्थित करून सरकारला जाब विचारण्याची विनंती करण्यात आली.
नगर परिषद (नगराध्यक्ष व मुख्याधिकारी): नगर परिषदेच्या विशेष सभेत जिल्हा निर्मितीचा ठराव एकमताने मंजूर करण्याचे आवाहन करण्यात आले.

पंचायत समिती (BDO श्री. घुबडे): तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत जिल्हा निर्मितीचे ठराव घेऊन ते राज्य सरकारकडे पाठवण्याबाबत सूचित करण्याची विनंती केली गेली.

तहसील आवारात विशेष सभा; घोषणांनी परिसर दुमदुमला

निवेदन सादर केल्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती चे मुख्य निमंत्रक कॉम्रेड विनोदभाऊ झोडगे, डॉ. देविदास जगनाडे, हरिश्चंद्रजी चोले, राजूजी भागवत, डॉ. बाळकृष्ण शेळके, प्रशांत डांगे यांनी आपल्या ओघवत्या व जोशपूर्ण भाषणातून १९८२ च्या इतिहासाची आठवण करून दिली. "ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे", "आमच्या हक्काचा जिल्हा मिळालाच पाहिजे"
अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

४४ वर्षांची प्रतीक्षा आणि जनतेचा निर्धार

सन १९८२ मध्ये ब्रम्हपुरी जिल्हा घोषित झाला होता, मात्र राजकीय खेळीमुळे प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. हा अन्याय गेल्या ४ दशकांपासून ब्रम्हपुरीकर सहन करत आहेत. मात्र, आता हा लढा केवळ निवेदनापुरता मर्यादित नसून तो इथल्या जनतेच्या अस्मितेचा आणि भविष्याचा प्रश्न बनला आहे, अशी आक्रमक भूमिका वक्त्यांनी मांडली.

संघर्ष समितीची भक्कम उपस्थिती

या ऐतिहासिक आंदोलनात मुख्य निमंत्रक कॉ. विनोद झोडगे यांच्यासह प्रशांत डांगे, प्रा देवीदास जगनाडे,प्रा. सुयोग बाळबुद्धे, हरिश्चंद्र चोले, शंकर दादा सातपुते, अमृत नखाते,श्री. पवन जैस्वाल, श्री. अंकज कानझोडे, श्री. मनोजभाऊ भूपाल, डॉ. बाळकृष्ण शेळके, लिलाधर झलके, तुकाराम करंडे, ईश्वर प्रधान, प्रवीण गेडाम, अशोक जिभकाटे, जनार्दन कावळे, धर्मपाल राहाटे, मधुकर सहारे आणि शेकडो जिल्हाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
( डॉ.बाळक्रिष्ण शेळके)

प्रतिलिपी :- सन्माननीय संपादक/ वार्ताहर यांना विनंती करण्यात येते की वरील बातमी आपल्या दैनिकात प्रकाशित करण्यात यावी व ब्रह्मपुरी जिल्हा निर्मिती करिता आपले योगदान द्यावे.

23 hours ago | [YT] | 8

Bhumiputra

पद्मापूर भूज परिसरातील वाघाचा बंदोबस्त करा - विनोद झोडगे

वन विभागातर्फे 25 हजाराची तात्पुरती मदत

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील जंगलव्याप्त गावात दिवसेंदिवस वाघाची दहशत वाढत असून वाघाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला.मात्र वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे.काल दिनांक 26 ला पदमापूर भुज परिसरातिल् एका महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमावावा लागला परिसरात वाघाची दहशत नागरिकात निर्माण झाली असून पदामापूर भुज परिसरातील वाढता वाघाचा वावर लक्षात घेता वणविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी कॉ. विनोद झोडगे यांनी दिलेल्या निवेदनातुन् केली आहे.तर वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेच्या मुलास वनविभागाच्या वतीने 25 हजार रुपयाची तत्पूरती मदत देण्यात आली आहे.

तालुक्यातील पद्मापूर भूज कक्ष क्रमांक 1156 संरक्षित वन पदमापुर परिसर जंगळव्यात असून या जंगलात मोठ्या संख्येने वाघाची संख्या आहे गावा लागत जंगल असल्यामुळे वाघ गावात येत असतात.अशातच काल दिनांक 26 ला पदमापूर येथील यमुना बाजीराव मडावी वय 70 वर्षे ही महिला झाडन्या कापण्यासाठी जंगलात गेली होती.संध्याकाळ होऊनही ती घरी परतली नसल्याने घरातील मुलासाह गावातील नागरिकांनी शोधमोहीम सुरु केली मात्र कुठलाच थागपत्ता लागलेला नाही आज सकाळी 8 वाजता वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या यमुना मडावी यांचा जंगलात मृत्यू देह मिळाला.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाची संपूर्ण टीम घटनास्थळी येऊन पंचनाला कररण्यात आला व मुत्यूदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णाल्यात नेण्यात आले. या संपूर्ण. घटना क्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. विनोद झोडगे यांनी वन अधिकाऱ्यांशी चर्चा करून मृतकाच्या परिवारिवारास तात्काळ मदत मिळावी यासाठी आग्रह धरला वन अधिकारी यांनी मृतकाच्या घरी जाऊन भेट घेतली व वनविभागाच्या वतीने 25 हजाराची तात्काळ मदत दिली मदत देताना RFO सोनडवले साहेब वनपरिक्षेत्र दक्षिण ब्रह्मपुरी, RO लोणारे साहेब भुज, आदे वनरक्षक पदमापुर,लोणारे वनकर्मचारी भुज, कॉ. विनोद झोडगे,डॉ. राजेश कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य, गुरुदेव वाघरे उपसरपंच वांद्रा, सुरेश ठिकरे पाटील उपसरपंच भुज, व गावातील नागरिक उपस्थित होते.उपस्थित अधिकाऱ्यांना या परिसरातील वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे कॉ विनोद झोडगे यांनी निवेदन दिले.

23 hours ago | [YT] | 12

Bhumiputra

आवळगाव ग्राम पंचायत मध्ये घरकुल लाभार्थ्यांचे तीव्र निदर्शने!

सन 2021 पासूनचे नरेगा अंतर्गत थकित घरकुल रक्कम त्वरित द्या - कॉ. विनोद झोडगे यांची मागणी

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा आवळगाव येथील 167 लाभार्थी यांनी आपल्याला राहण्यासाठी निवासाची सोय व्हावी म्हणून सन 2021ते 2022 मध्ये शासनाच्या विविध घरकुल योजना मधून इकडून तिकडून उसनवारी करत घर बांधकाम पूर्ण करून 3ते 4 वर्ष पूर्ण झाले परंतु अजूनही मनरेगा अंतर्गत घर बांधकाम करीत असताना जो घर बांधकामाला पाणी मारण्यात आला त्याची मजुरी म्हणून प्रत्येक घरकुल लाभार्थी यांचे 22 ते 25 हजार रुपये अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही त्यामुळे या गरीब कुटुंबांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे.ग्राम पंचायत व पंचायत समिती कडे चकरा मारू मारू लाभार्थी पुरते वैतागून गेले शेवटी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात दिनांक 26 फेब्रूवारी रोजी सकाळी 12 वाजता ग्राम पंचायत आवळगाव येथे शेकडो घरकुल लाभार्थ्यांनि आक्रमक भूमिका घेत तीव्र निदर्शने करत घरकुल थकित रक्कम देण्याची मागणी ग्राम विस्तार अधिकारी तलमले यांच्याकडे केली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मनरेगा साप्टवरील रिपोर्ट नुसार तालुक्यातील 989 घरकुल कामे आवास साप्टवर पूर्ण परंतु मनरेगा साप्टवर अपूर्ण आहेत .या सर्वच कामाचे हजेरी पट तांत्रिक अडचणीने निघत नसल्याने गावस्तरावर लाभार्थ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा पंचायत समिती स्तरावरून याकडे लक्ष देऊन घरकुल लाभार्थी यांचे सन 2021 पासूनचे थकित रक्कम मिळवून देण्यासाठी दिनाक 27 फेब्रुवारी 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय वर धडक देऊन गटविकास अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचा इशारा कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे तेव्हा जास्तीत जास्त घरकुल लाभार्थी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी शशिकांत वार्जुकर,केशव बानबले,विनोद मेश्राम,अमोल बावणे,संजय मेश्राम, उषटू दुमाने,अशोक लोळे, संजय वारजुकर,गणपत दूमाने,केवळ भोयर, गजानन आवारी,महेश दूमाने,भाऊराव ठाकरे, रोशन उरकूडे, यशवंत तिवाडे यांनी केले आहे.

23 hours ago | [YT] | 7

Bhumiputra

वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे आंदोलन

वन जमीन अतिक्रमणधारकांचे एसडीओ मार्फत दिले जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिक अर्ज

वणी : वणी व मारेगाव तालुक्यातील वन जमीन कसणाऱ्यांनी वनाधिकार कायद्यानुसार जमिनीचा पट्टा मिळावा यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचा वतीने वणी येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी माकप व किसान सभा सातत्याने आंदोलन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार चे वर लोकांना कॉ शंकरराव दानव यांचे नेतृत्वात पट्टे मिळाले. परंतु अजूनही महाराष्ट्रात  अनेकांना जमिनीचे पट्टे न मिळाल्याने दिनांक २७ जानेवारी ला महाराष्ट्र सरकारने नाशिक ते खर्डा काढण्यात आलेल्या लाँग मार्च ला आश्वासन दिले. या आश्वासनानुसार जमीन ताबेदारांनी अर्ज केल्यास दाखल केलेल्या दाव्याची पुन्हा नव्याने छाननी करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार दावे दाखल केलेल्या भूमिहीनांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया सुरु करावी यासाठी  हे एक दिवसीय धरणे आंदोलन माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ ॲड दिलीप परचाके, कॉ गजानन ताकसांडे यांचे नेतृत्वात करण्यात आले. त्या अनुषंगाने  वनजमीन कसणाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी यांना व्ययक्तिक अर्ज सादर करण्यात आले.
 
ह्या आंदोलनात वणी व मारेगाव तालुक्यातील वन जमीन कसणाऱ्या पुरुष व महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.  या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी प्रचंड नारेबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे  किसन मोहुर्ले,कवडू चांदेकर, बादल कोडापे, संजय वालकोंडे, सुधाकर सोनटक्के,हरिश्चंद्र चिकराम, अरुण चिंचोलकर, शंकर गौतरे, वसंता नागोसे, रामभाऊ जिद्देवार, श्रीकांत तांबेकर, सुदर्शन टेकाम, नेताजी गेडाम, संभाजी टांगे, सुभाष नांदेकर, अर्जुन शेडमाके, अमोल चटप आदींनी परिश्रम घेतले.

3 days ago | [YT] | 72

Bhumiputra

The fifth International Congress on Kerala Studies, organised by the AKG Centre for Research and Studies, concluded in Thiruvananthapuram on February 22, 2026, after two days of deliberations on the state’s future development trajectory. The event drew over 3,000 delegates from India and abroad, including scholars, policymakers, officials, students and citizens, following preparatory district-level conferences across all 14 districts.

Kerala Chief Minister and CPI(M) Polit Bureau member Pinarayi Vijayan inaugurated the congress and CPI(M) General Secretary M A Baby inaugurated the valedictory session. The congress featured 45 sessions and four symposia across 18 venues and produced recommendations to guide future state development strategies and AKG Centre’s work toward a resilient, secular and knowledge-based Kerala. Academic Committee Secretary and CPI(M) Central Committee member T M Thomas Isaac presented a consolidation of the discussions.

3 days ago | [YT] | 26

Bhumiputra

SKM National Council Meeting in Kurukshetra Decides to Oppose India US Trade Deal Tooth and Nail

The Samyukta Kisan Morcha (SKM) National Council meeting held on 24 February 2026 at Kurukshetra in Haryana decided to oppose the anti-national India US Trade Deal tooth and nail across the country.

On 9 March, on the first day of the coming Parliament session, the SKM and the Central Trade Unions (CTUs) will hold a large dharna at Jantar Mantar in Delhi to demand the cancellation of the India US Trade Deal. This dharna will also demand the repeal of the four Labour Codes and will oppose the pro-corporate and anti-people Electricity Amendment Bill and the Seed Bill, and the replacement of MNREGA by Gram-G. The SKM will also focus on its original demands of a remunerative MSP, liberation from debt of the peasantry, a revamped crop insurance scheme, and central old age pensions for agricultural workers and poor peasants.

From 10 March until Jallianwala Bagh day on 13 April, large Mahapanchayats will be held in all states across the country on all the above issues, with the main focus being on the disastrous India US Trade Deal. This campaign will begin with a massive Kisan Mahapanchayat at Barnala in Punjab. A series of thousands of village meetings will be held to create awareness on the grave danger to India.

23 March Martyrs' Day will be observed all over the country as Anti-Imperialist Day.

Other SKM decisions will be given in the official SKM press release.

The presidium of the SKM meeting comprised Joginder Singh Ugrahan, Rakesh Tikait, Dr Ashok Dhawale, Jagmohan Singh, Ashish Mittal, Rajan Kshirsagar, and Joginder Nain. They addressed the packed press conference at the end of the meeting.

The agenda of the meeting was placed by P Krishnaprasad. Inderjit Singh welcomed the participants on behalf of the Haryana SKM. Several SKM members took part in the discussion. They included Rakesh Singha, Abdul Rashid, and Balbir Master of the AIKS. Other AIKS leaders who attended were Manoj Kumar, Dharampal Singh Seal, Sumit Singh, Shubhojeet Dey, Bashir Abdul Wani, Ashok Arora, and Pratap Singh.

All the participants garlanded the statue of the prominent peasant leader Choudhari Chhotu Ram at the Jat Dharamshala in Kurukshetra, where the SKM meeting was held.

3 days ago | [YT] | 39

Bhumiputra

भव्य पायी लॉंग मार्च

4 days ago | [YT] | 57

Bhumiputra

भव्य पायी लॉंग मार्च

4 days ago | [YT] | 31