shri mahakaivalyateja

आमचे संत विश्व सुखाचा विचार मांडतात त्यात अनंत सूर्यमाला , ग्रह गोल येतात त्यांना संकुचित करण्याचे दुष्कर्म होऊ नये . त्यांची विचाराची व्यापकता राष्ट्र , धर्म , पंथ या सर्वांना व्यापणाऱ्या सृष्टी सुखाची होती. म्हणून फक्त सच्चा वारकरी पंथीय कोणाचाही म्हणजेच अन्य धर्मियासह पशू - पक्षी , निर्जीवांचाही द्वेष करत नाही . आणि आपल्यातीलच काहीजण आपलाच द्वेष करतात , इतर पंथीय व धर्मीयांचा तर विचारच सोडा. म्हणून नम्रता पूर्वक हात जोडून विनंती की सद् विचार आणि सज्जन यांना जाती -धर्म , राष्ट्रीय _ परराष्ट्रीय , आपला- परका समजू नका. संत कबीर ,लतिफा यासारखे परधर्मिय आणि संत चोखामेळा सारखे वरिष्ठ समाजाने नाकारलेले स्वीकारणारा आमचा वारकरी सांपद्राय कोणा एका विशिष्ट विचारांचा नव्हे तर विश्वात्मक देवाला जाणणारा आहे . त्याला कोणाच्या आश्रयाची गरज नाही तर त्याच्याच विचारांची गरज आज जगाला आहे.तीच आम्हाला आचार -विचारातून समजून द्यावी लागेल . त्यासाठी आम्हालाही तेवढे व्यापक व्हावे लागेल .
कीर्तन,अभंग,कीर्तन चाली,शास्त्रीय गायन या साठी susbscribe करा